शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

पतंगरावांचा राजकीय सत्तासंघर्ष अन् दबदबा तब्बल सहावेळा आमदार; अठरा वर्षे मंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 02:21 IST

पूर्वाश्रमीचा भिलवडी-वांगी, तर पुनर्रचित पलूस-कडेगाव मतदारसंघ नेहमीच संवेदनशील राहिला आहे. या मतदारसंघातील जनतेने पतंगराव कदम यांना १९८५, १९९०, १९९९, २००४, २००९ आणि २०१४ अशा तब्बल सहा निवडणुकांत विजयी केले.

पूर्वाश्रमीचा भिलवडी-वांगी, तर पुनर्रचित पलूस-कडेगाव मतदारसंघ नेहमीच संवेदनशील राहिला आहे. या मतदारसंघातील जनतेने पतंगराव कदम यांना १९८५, १९९०, १९९९, २००४, २००९ आणि २०१४ अशा तब्बल सहा निवडणुकांत विजयी केले. या मतदारसंघाचे प्रतिनिधी पतंगराव कदम जवळपास २९ वर्षे आमदार राहिले. यात तब्बल २० वर्षे मंत्रिमंडळात विविध खात्यांची जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पतंगराव कदम या नावाचा दबदबा राहिला. प्रचंड विकासकामांतून त्यांनी या मतदार संघाचा कायापालट केला.मुख्यमंत्रिपदाची हुलकावणी२००४ च्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात आघाडीझाली. डॉ. पतंगराव कदम यांनी तब्बल एक लाखाहून अधिक मताधिक्यानेविजय मिळविला. यावेळी ते मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार होते. मात्र, त्यांना मुख्यमंत्रिपदाने पुन्हा हुलकावणी दिली आणि विलासराव देशमुख पुन्हा मुख्यमंत्री झाले. यावेळी कदम यांना सहकारमंत्रिपद देण्यात आले.यशवंतरावांच्या जन्मशताब्दी वर्षात शंभर कोटींचा निधीनवमहाराष्ट्राच्या विकासासाठी दूरदृष्टीने नियोजन करणारे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षात १०० कोटींचा निधी विविध योजनांवर आघाडी शासनाच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंजूर केला होता. विशेष म्हणजे यापैकी २५ कोटींहून अधिक निधी पतंगरावांनी सांगली जिल्ह्यात खेचून आणला होता. या निधीतून यशवंतरावांच्या जन्मगावात म्हणजे देवराष्टÑे आणि सागरेश्वर अभयारण्यात विकासकामे झाली. पतंगरावांचा दबदबाच तेवढा होता.१९९० ला काँग्रेसच्या तिकिटावर विजयीपाच वर्षांत मतदारसंघात केलेल्या कामांचा अफाट आवाका आणि तिकीट न मिळूनही काँग्रेस पक्षाविषयी दाखविलेली अढळ निष्ठा बघून त्यांना १९९० च्या निवडणुकीत काँग्रेसचे तिकीट मिळाले. त्यावेळी पहिल्यांदा ते काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले. २९ जून १९९२ रोजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात शिक्षण राज्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. त्यांच्या आवडीच्या शिक्षण क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाल्याने त्यांनी या संधीचे सोने केले. आदिवासींच्या मुलांसाठी आश्रमशाळा, त्यांना मोफत पुस्तके, शाळेतला दुपारचा आहार यासाठी तरतूद केली. एकशिक्षकी शाळा द्विशिक्षकी केल्या.१९६८ मध्ये एस. टी. महामंडळाचे संचालक१९६८ मध्ये यशवंतराव मोहिते परिवहन मंत्री झाले. त्यावेळी मोहिते यांनी कदम यांना १ जुलै १९६८ रोजी एस. टी. महामंडळाचे संचालक केले. २३ वर्षे वयाच्या तरुणाला मोहिते यांनी मोठी संधी दिली. त्यांना महामंडळाची इम्पाला गाडी दिली. या संधीचे सोने करीत पतंगरावांनी गाव तिथे एसटी सुरू केली. ग्रामीण व दुष्काळी भागातील हजारो तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या. १९६८ ते १९७३ अशी पाच वर्षे ते संचालक राहिले.अपक्ष म्हणून १९८०ला रिंगणात१९८० मध्ये पतंगराव कदम यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. मात्र त्यांचा पोस्टाच्या मतात पराभव झाला.१९८५ च्या  निवडणुकीत आमदारभिलवडी-वांगी विधानसभा मतदारसंघातून पतंगराव कदम यांनी पुन्हा १९८५ ची विधानसभा निवडणूक लढविली आणि ३० हजार मताधिक्याने विजयी झाले. ते महाराष्ट्रात दुसºया क्रमांकाची मते घेऊन विजयी झाले. आपला माणूस आमदार झाल्याच्या आनंदात भिलवडी-वांगी मतदारसंघात त्यावेळी अक्षरश: दिवाळी साजरी झाली.१९९५ ला पराभवाचा सामनाभिलवडी-वांगी विधानसभा मतदारसंघातून १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत आणि त्यानंतर १९९६ च्या पोटनिवडणुकीत मात्र कदम यांना पराभवाचा सामना करावा लागला.१९९९ च्या निवडणुकीत विजय आणि उद्योगमंत्री१९९९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. मात्र पतंगराव कदम काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले. यावेळी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना झाला. कदम विजयी झाले. यावेळी त्यांना उद्योग व जलसंधारण खात्याचे मंत्री म्हणून राज्याच्या मंत्रिमंडळात संधी मिळाली. १९९९ ते २००३ या कालखंडात विलासराव देशमुख व २००३ ते २००४ सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते. शिंदे मुख्यमंत्री झाले, त्यावेळी पतंगराव कदम यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत होते.वन, मदत व पुनर्वसन खाते२००९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदारसंघाच्या पुनर्रचनेत भिलवडी-वांगी मतदारसंघाचे नाव पलूस-कडेगाव असे झाले. यावेळी कदम यांनी ३५ हजार ५८५ मताधिक्याने विजय मिळविला. यावेळी अशोक चव्हाण पुन्हा मुख्यमंत्री झाले. कदम यांच्याकडे वन, मदत व पुनर्वसन खाते आले. या खात्यालाही कदम यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली. वन विभागातील रोजंदारीवरील सात हजार कर्मचाºयांना त्यांनी कायम केले. १०० कोटी वृक्षलागवड कार्यक्रम यशस्वीपणे राबविला. 

१२ हजार ५०० कोटींची मदतपतंगराव कदम मदत, पुनर्वसन मंत्री असताना गारपीट, अतिवृष्टी, दुष्काळ अशी संकटे आली. त्यावेळी कदम यांच्या अध्यक्षतेखाली शासनाने मंत्रिमंडळाची उपसमिती नेमली होती. या उपसमितीत नऊ मंत्री आणि सचिव होते. दर मंगळवारी तीन वाजता या उपसमितीची बैठक होत असे. या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार बुधवारी परिपत्रक निघत असे. या काळात १२ हजार ५०० कोटींची मदत कदम यांनी अतिवृष्टी व दुष्काळात दिली.महसूलमंत्रीपदी संधीडिसेंबर २००८ मध्ये अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाले. त्यावेळी पतंगराव कदम यांना महसूलमंत्री हे सर्वाधिक महत्त्वपूर्ण खाते मिळाले. अर्थात यावेळीही त्यांची मुख्यमंत्री पदाची संधी हुकली.२०१४ मध्ये गड राखला२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेत संपूर्ण राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे पानिपत झाले. परंतु, कदम यांनी मात्र मतदारसंघात केलेल्या विकासकामांच्या जोरावर आपला गड कायम राखला. त्यांचा २४ हजार इतक्या मताधिक्याने विजय झाला. राज्यात काँग्रेसची सत्ता गेली; मात्र कदम यांनी मात्र विकासकामांची गती कायम ठेवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सर्व मंत्रिमंडळात त्यांचे सलोख्याचे संबंध होते. पतंगराव कदम या नावाचा दबदबाही कायम होता.संकलन : प्रताप महाडिक, कडेगाव

टॅग्स :Patangrao Kadamपतंगराव कदमPoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्र