शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
4
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
5
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
6
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
7
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
8
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
9
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
10
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
11
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
12
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
13
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
14
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
15
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
16
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
17
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
18
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
19
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
20
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात पावणेतीन लाख हेक्टर्सवर होणार खरीप पेरणी, कृषी विभागाकडून तयारी सुरू 

By अशोक डोंबाळे | Updated: June 3, 2023 18:45 IST

सांगली : जिल्ह्यात यंदा दोन लाख ७२ हजार हेक्टर्सवर क्षेत्रावर खरिपाची पेरणी होणार आहे. यंदा ज्वारी, बाजरी, भुईमुगाच्या क्षेत्रात ...

सांगली : जिल्ह्यात यंदा दोन लाख ७२ हजार हेक्टर्सवर क्षेत्रावर खरिपाची पेरणी होणार आहे. यंदा ज्वारी, बाजरी, भुईमुगाच्या क्षेत्रात घट, तर मक्याचे क्षेत्र वाढणार आहे. खरिपाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने तयारी सुरू केली आहे. एक लाख ३८ हजार टन खत आणि ३८ हजार क्विंटल बियाणांची मागणी नोंदविली आहे. सरकारी आणि खासगी कंपन्यांकडून खते आणि बियाणांचा पुरवठा सुरू झाला आहे.मान्सूनला महिन्याभराचा अवधी असला तरी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने खरीप हंगामाची संपूर्ण तयारी केली आहे. शेतकऱ्यांसाठी प्रात्यक्षिके, पेरणीपूर्व मशागती, पीक प्रात्यक्षिक, पीक उत्पादन वाढीचे क्लस्टर, हुमणी कीड नियंत्रण मोहीम राबविली जात आहे. हंगामासाठी बियाणे, खते यांसह आवश्यक ती तयारी केली आहे. जिल्ह्यात खरिपाच्या पेरणीसाठी दोन लाख ७१ हजार ७०४ हेक्टर क्षेत्र आहे. ज्वारी, भात, बाजरीच्या क्षेत्रात घट, तर सोयाबीन, मक्याचे क्षेत्र वाढणार आहे. शिराळा तालुक्यात भात पिकाचे क्षेत्र जास्त आहे. यंदा मात्र त्यामध्ये घट होऊन १४ हजार ७३२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होईल. वाळवा, पलूस, कडेगाव, शिराळा, मिरज पश्चिम भागात सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. गतवर्षी सोयाबीनचे ५१ हजार हेक्टर क्षेत्र होते, त्यामध्ये वाढ होऊन ५४ हजार २०१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी सध्या खरीप पेरणीसाठी पेरणीपूर्व मशागती करून शेत तयार ठेवले आहे. मान्सून दाखल होताच शेतकरी पेरणीसाठी गडबड करण्याची शक्यता आहे.

अशी केली बियाणांची मागणीहंगामासाठी ‘महाबीज’ आणि खासगी कंपन्यांकडून सुमारे ३२ हजार ६०४ क्विंटल बियाणांची मागणी केली आहे. यामध्ये भात पाच हजार ६५७, ज्वारी तीन हजार ८७, बाजरी अडीच हजार, तूर ५३७, मूग १७७, उडीद एक हजार ३७, भुईमूग एक हजार २३७, सोयाबीन ११ हजार ६६८, सूर्यफूल २२१, मका सात हजार क्विंटल बियाणांची मागणी केली आहे.

खरीप पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)पीक - क्षेत्रज्वारी ३००००बाजरी ५६९४१सोयाबीन ५४२०१भात १४७३२मका ४६४९६सूर्यफूल २२१२तूर १०२३८मूग ५६१२उडीद १९७५६एकूण - २७१७०४

पाऊस चांगला पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणीसाठी गडबड करण्याची गरज नाही. पुरेसा पाऊस आणि जमिनीत ओलावा चांगला झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी खरीप पेरणी करण्याची गरज आहे. - विवेक कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली.

टॅग्स :Sangliसांगलीagricultureशेती