शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
2
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
3
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
4
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
6
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
7
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
8
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
9
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
10
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
11
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
12
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
13
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
14
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
15
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
16
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
17
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
18
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
19
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
20
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?

सांगली जिल्ह्यात पावणेतीन लाख हेक्टर्सवर होणार खरीप पेरणी, कृषी विभागाकडून तयारी सुरू 

By अशोक डोंबाळे | Updated: June 3, 2023 18:45 IST

सांगली : जिल्ह्यात यंदा दोन लाख ७२ हजार हेक्टर्सवर क्षेत्रावर खरिपाची पेरणी होणार आहे. यंदा ज्वारी, बाजरी, भुईमुगाच्या क्षेत्रात ...

सांगली : जिल्ह्यात यंदा दोन लाख ७२ हजार हेक्टर्सवर क्षेत्रावर खरिपाची पेरणी होणार आहे. यंदा ज्वारी, बाजरी, भुईमुगाच्या क्षेत्रात घट, तर मक्याचे क्षेत्र वाढणार आहे. खरिपाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने तयारी सुरू केली आहे. एक लाख ३८ हजार टन खत आणि ३८ हजार क्विंटल बियाणांची मागणी नोंदविली आहे. सरकारी आणि खासगी कंपन्यांकडून खते आणि बियाणांचा पुरवठा सुरू झाला आहे.मान्सूनला महिन्याभराचा अवधी असला तरी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने खरीप हंगामाची संपूर्ण तयारी केली आहे. शेतकऱ्यांसाठी प्रात्यक्षिके, पेरणीपूर्व मशागती, पीक प्रात्यक्षिक, पीक उत्पादन वाढीचे क्लस्टर, हुमणी कीड नियंत्रण मोहीम राबविली जात आहे. हंगामासाठी बियाणे, खते यांसह आवश्यक ती तयारी केली आहे. जिल्ह्यात खरिपाच्या पेरणीसाठी दोन लाख ७१ हजार ७०४ हेक्टर क्षेत्र आहे. ज्वारी, भात, बाजरीच्या क्षेत्रात घट, तर सोयाबीन, मक्याचे क्षेत्र वाढणार आहे. शिराळा तालुक्यात भात पिकाचे क्षेत्र जास्त आहे. यंदा मात्र त्यामध्ये घट होऊन १४ हजार ७३२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होईल. वाळवा, पलूस, कडेगाव, शिराळा, मिरज पश्चिम भागात सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. गतवर्षी सोयाबीनचे ५१ हजार हेक्टर क्षेत्र होते, त्यामध्ये वाढ होऊन ५४ हजार २०१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी सध्या खरीप पेरणीसाठी पेरणीपूर्व मशागती करून शेत तयार ठेवले आहे. मान्सून दाखल होताच शेतकरी पेरणीसाठी गडबड करण्याची शक्यता आहे.

अशी केली बियाणांची मागणीहंगामासाठी ‘महाबीज’ आणि खासगी कंपन्यांकडून सुमारे ३२ हजार ६०४ क्विंटल बियाणांची मागणी केली आहे. यामध्ये भात पाच हजार ६५७, ज्वारी तीन हजार ८७, बाजरी अडीच हजार, तूर ५३७, मूग १७७, उडीद एक हजार ३७, भुईमूग एक हजार २३७, सोयाबीन ११ हजार ६६८, सूर्यफूल २२१, मका सात हजार क्विंटल बियाणांची मागणी केली आहे.

खरीप पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)पीक - क्षेत्रज्वारी ३००००बाजरी ५६९४१सोयाबीन ५४२०१भात १४७३२मका ४६४९६सूर्यफूल २२१२तूर १०२३८मूग ५६१२उडीद १९७५६एकूण - २७१७०४

पाऊस चांगला पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणीसाठी गडबड करण्याची गरज नाही. पुरेसा पाऊस आणि जमिनीत ओलावा चांगला झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी खरीप पेरणी करण्याची गरज आहे. - विवेक कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली.

टॅग्स :Sangliसांगलीagricultureशेती