शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

सांगली जिल्ह्यात ३.६६ हेक्टरवर होणार खरिपाची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 11:27 IST

एक लाख २६ हजार २३१ टन रासायनिक खते आणि ३२ हजार ४०९ क्विंटल बियाणांची मागणी केली आहे. त्यापैकी खते ४८ हजार ८४० टन, तर बियाणे २३ हजार ५७१ क्विंटल उपलब्ध आहेत.

ठळक मुद्दे सव्वालाख टन रासायनिक खते, ३२४०९ क्विंटल बियाणांची मागणी : पेरणीपूर्व मशागती पूर्ण

सांगली : मान्सून पावसाची चाहूल लागल्यामुळे शेतकरी पेरणीपूर्व मशागती करुन खरीप पेरणीसाठी सज्ज झाला आहे. जिल्ह्यात तीन लाख ६६ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी होणार असून सरासरीच्या १८ हजार ३५० हेक्टरवर पेरणी जास्त होण्याचा कृषी विभागाच्या अधिकाºयांचा अंदाज आहे. एक लाख २६ हजार २३१ टन रासायनिक खते आणि ३२ हजार ४०९ क्विंटल बियाणांची मागणी केली आहे. त्यापैकी खते ४८ हजार ८४० टन, तर बियाणे २३ हजार ५७१ क्विंटल उपलब्ध आहेत.

जिल्ह्यात खरीप पेरणीचे सरासरी तीन लाख ४८ हजार ४५० हेक्टर क्षेत्र आहे. वेळेत मान्सूनचा पाऊस दाखल होणार, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यानुसार जिल्हा परिषद आणि राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या अधिकाºयांनी नियोजन केले आहे. मान्सून वेळेत दाखल झाल्यास खरीप हंगामामध्ये १८ हजार ३५० हेक्टरने पेरणीचे क्षेत्र वाढणार आहे. २०२० च्या खरीप हंगामात जिल्ह्यात तीन लाख ६६ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याची शक्यता आहे. या क्षेत्रासाठी एक लाख २६ हजार २३१ टन रासायनिक खतांची गरज आहे. कोरोनाचा फैलाव असतानाही जिल्ह्यात ४८ हजार ८४० टन खताची उपलब्धता झाली आहे. यामध्ये युरिया ११ हजार ७५० टन, डीएपी १२ हजार २४० टन, एमओपी ११ हजार टन, एनपीकेएस ११ हजार ४६० टन, एसएसपी सहा हजार ७९० टन खत उपलब्ध आहे. खरीप ज्वारी, बाजरी, भात, मका, भुईमूग, सोयाबीन, सूर्यफूल, उडीद, मूग आदीच्या ३२ हजार ४०९ क्विंटल बियाणांची मागणी केली आहे. महाबीजसह अन्य कंपन्यांकडून सध्या जिल्ह्यात २३ हजार ५७१ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. महापुरात गेल्यावर्षी सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले होते. या ठिकाणी काही शेतकºयांनी स्वत:हून बदली करुन उसाची लागण केली आहे. कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या परिसरात सोयाबीन पेरणीचे क्षेत्र घटण्याची शक्यता कृषी विभागाच्या अधिकाºयांचा अंदाज आहे.खरिपातील बियाणांची मागणी (क्विंटल)बियाणे प्रकार मागणी उपलब्ध बियाणेखरीप ज्वारी ३७९५ १०१८बाजरी १४०० ७९५भात २४५४ ३९३२मका ५५६५ ३९६७भुईमूग १९३२ ९३२सोयाबीन १५४८८ १०७९९मूग ४०४ २५०उडीद ९१८ ६९२तूर ३५९ २१सूर्यफूल ९१ २०एकूण ३२४०९ २३५७१

जादा दराने खत विक्री केल्यास परवाने रद्द : विवेक कुंभारकृषी सेवा केंद्र चालकांनी नियमानुसार दर घ्यावेत. जादा दराने पैसे घेतल्याची तक्रार आल्यास तात्काळ परवाना रद्द करण्यात येणार आहे. खते आणि बियाणांमधील बोगसगिरी रोखण्यासाठी कृषी सेवा केंद्र चालकांकडून खते व बियाणे खरेदी करताना पावती घ्यावी. जे ती देणार नाहीत, त्यांच्याबद्दल कृषी विभागाकडे तक्रार केल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी विवेक कुंभार यांनी दिला आहे. 

गैरकारभार रोखण्यासाठी ११ भरारी पथकेखरीप हंगामात खते व बियाणांची बोगसगिरी रोखण्यासाठी कृषी विभागाने प्रत्येक तालुक्याला एक आणि जिल्हास्तरावर एक अशी ११ भरारी पथके तयार केली आहेत. प्रत्येक कृषी सेवा केंद्राची तपासणी केली जाणार आहे. प्रत्येक दुकानदाराने दुकानामध्ये दरफलक लावले पाहिजेत, खताचे लिंकिंग करु नये, आदी प्रश्नांवर पथक लक्ष ठेवणार आहे, असेही विवेक कुंभार म्हणाले.

टॅग्स :FarmerशेतकरीSangliसांगली