शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
4
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
5
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
6
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
7
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
8
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
9
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
10
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
11
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
12
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
13
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
14
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
15
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
16
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
17
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
18
टीम इंडियाच्या ' या ' स्टार क्रिकेटरसोबत केलेला 'वन नाईट स्टँड'; बॉबी डार्लिंगचा खुलासा
19
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
20
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात

सांगली जिल्ह्यात ३.६६ हेक्टरवर होणार खरिपाची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 11:27 IST

एक लाख २६ हजार २३१ टन रासायनिक खते आणि ३२ हजार ४०९ क्विंटल बियाणांची मागणी केली आहे. त्यापैकी खते ४८ हजार ८४० टन, तर बियाणे २३ हजार ५७१ क्विंटल उपलब्ध आहेत.

ठळक मुद्दे सव्वालाख टन रासायनिक खते, ३२४०९ क्विंटल बियाणांची मागणी : पेरणीपूर्व मशागती पूर्ण

सांगली : मान्सून पावसाची चाहूल लागल्यामुळे शेतकरी पेरणीपूर्व मशागती करुन खरीप पेरणीसाठी सज्ज झाला आहे. जिल्ह्यात तीन लाख ६६ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी होणार असून सरासरीच्या १८ हजार ३५० हेक्टरवर पेरणी जास्त होण्याचा कृषी विभागाच्या अधिकाºयांचा अंदाज आहे. एक लाख २६ हजार २३१ टन रासायनिक खते आणि ३२ हजार ४०९ क्विंटल बियाणांची मागणी केली आहे. त्यापैकी खते ४८ हजार ८४० टन, तर बियाणे २३ हजार ५७१ क्विंटल उपलब्ध आहेत.

जिल्ह्यात खरीप पेरणीचे सरासरी तीन लाख ४८ हजार ४५० हेक्टर क्षेत्र आहे. वेळेत मान्सूनचा पाऊस दाखल होणार, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यानुसार जिल्हा परिषद आणि राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या अधिकाºयांनी नियोजन केले आहे. मान्सून वेळेत दाखल झाल्यास खरीप हंगामामध्ये १८ हजार ३५० हेक्टरने पेरणीचे क्षेत्र वाढणार आहे. २०२० च्या खरीप हंगामात जिल्ह्यात तीन लाख ६६ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याची शक्यता आहे. या क्षेत्रासाठी एक लाख २६ हजार २३१ टन रासायनिक खतांची गरज आहे. कोरोनाचा फैलाव असतानाही जिल्ह्यात ४८ हजार ८४० टन खताची उपलब्धता झाली आहे. यामध्ये युरिया ११ हजार ७५० टन, डीएपी १२ हजार २४० टन, एमओपी ११ हजार टन, एनपीकेएस ११ हजार ४६० टन, एसएसपी सहा हजार ७९० टन खत उपलब्ध आहे. खरीप ज्वारी, बाजरी, भात, मका, भुईमूग, सोयाबीन, सूर्यफूल, उडीद, मूग आदीच्या ३२ हजार ४०९ क्विंटल बियाणांची मागणी केली आहे. महाबीजसह अन्य कंपन्यांकडून सध्या जिल्ह्यात २३ हजार ५७१ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. महापुरात गेल्यावर्षी सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले होते. या ठिकाणी काही शेतकºयांनी स्वत:हून बदली करुन उसाची लागण केली आहे. कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या परिसरात सोयाबीन पेरणीचे क्षेत्र घटण्याची शक्यता कृषी विभागाच्या अधिकाºयांचा अंदाज आहे.खरिपातील बियाणांची मागणी (क्विंटल)बियाणे प्रकार मागणी उपलब्ध बियाणेखरीप ज्वारी ३७९५ १०१८बाजरी १४०० ७९५भात २४५४ ३९३२मका ५५६५ ३९६७भुईमूग १९३२ ९३२सोयाबीन १५४८८ १०७९९मूग ४०४ २५०उडीद ९१८ ६९२तूर ३५९ २१सूर्यफूल ९१ २०एकूण ३२४०९ २३५७१

जादा दराने खत विक्री केल्यास परवाने रद्द : विवेक कुंभारकृषी सेवा केंद्र चालकांनी नियमानुसार दर घ्यावेत. जादा दराने पैसे घेतल्याची तक्रार आल्यास तात्काळ परवाना रद्द करण्यात येणार आहे. खते आणि बियाणांमधील बोगसगिरी रोखण्यासाठी कृषी सेवा केंद्र चालकांकडून खते व बियाणे खरेदी करताना पावती घ्यावी. जे ती देणार नाहीत, त्यांच्याबद्दल कृषी विभागाकडे तक्रार केल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी विवेक कुंभार यांनी दिला आहे. 

गैरकारभार रोखण्यासाठी ११ भरारी पथकेखरीप हंगामात खते व बियाणांची बोगसगिरी रोखण्यासाठी कृषी विभागाने प्रत्येक तालुक्याला एक आणि जिल्हास्तरावर एक अशी ११ भरारी पथके तयार केली आहेत. प्रत्येक कृषी सेवा केंद्राची तपासणी केली जाणार आहे. प्रत्येक दुकानदाराने दुकानामध्ये दरफलक लावले पाहिजेत, खताचे लिंकिंग करु नये, आदी प्रश्नांवर पथक लक्ष ठेवणार आहे, असेही विवेक कुंभार म्हणाले.

टॅग्स :FarmerशेतकरीSangliसांगली