शहरं
Join us  
Trending Stories
1
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
2
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
3
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
5
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
6
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
7
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
9
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
10
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
11
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
12
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
13
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
14
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
15
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
16
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
17
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
18
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
19
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
20
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित

सांगली जिल्ह्यात ३.६६ हेक्टरवर होणार खरिपाची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 11:27 IST

एक लाख २६ हजार २३१ टन रासायनिक खते आणि ३२ हजार ४०९ क्विंटल बियाणांची मागणी केली आहे. त्यापैकी खते ४८ हजार ८४० टन, तर बियाणे २३ हजार ५७१ क्विंटल उपलब्ध आहेत.

ठळक मुद्दे सव्वालाख टन रासायनिक खते, ३२४०९ क्विंटल बियाणांची मागणी : पेरणीपूर्व मशागती पूर्ण

सांगली : मान्सून पावसाची चाहूल लागल्यामुळे शेतकरी पेरणीपूर्व मशागती करुन खरीप पेरणीसाठी सज्ज झाला आहे. जिल्ह्यात तीन लाख ६६ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी होणार असून सरासरीच्या १८ हजार ३५० हेक्टरवर पेरणी जास्त होण्याचा कृषी विभागाच्या अधिकाºयांचा अंदाज आहे. एक लाख २६ हजार २३१ टन रासायनिक खते आणि ३२ हजार ४०९ क्विंटल बियाणांची मागणी केली आहे. त्यापैकी खते ४८ हजार ८४० टन, तर बियाणे २३ हजार ५७१ क्विंटल उपलब्ध आहेत.

जिल्ह्यात खरीप पेरणीचे सरासरी तीन लाख ४८ हजार ४५० हेक्टर क्षेत्र आहे. वेळेत मान्सूनचा पाऊस दाखल होणार, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यानुसार जिल्हा परिषद आणि राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या अधिकाºयांनी नियोजन केले आहे. मान्सून वेळेत दाखल झाल्यास खरीप हंगामामध्ये १८ हजार ३५० हेक्टरने पेरणीचे क्षेत्र वाढणार आहे. २०२० च्या खरीप हंगामात जिल्ह्यात तीन लाख ६६ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याची शक्यता आहे. या क्षेत्रासाठी एक लाख २६ हजार २३१ टन रासायनिक खतांची गरज आहे. कोरोनाचा फैलाव असतानाही जिल्ह्यात ४८ हजार ८४० टन खताची उपलब्धता झाली आहे. यामध्ये युरिया ११ हजार ७५० टन, डीएपी १२ हजार २४० टन, एमओपी ११ हजार टन, एनपीकेएस ११ हजार ४६० टन, एसएसपी सहा हजार ७९० टन खत उपलब्ध आहे. खरीप ज्वारी, बाजरी, भात, मका, भुईमूग, सोयाबीन, सूर्यफूल, उडीद, मूग आदीच्या ३२ हजार ४०९ क्विंटल बियाणांची मागणी केली आहे. महाबीजसह अन्य कंपन्यांकडून सध्या जिल्ह्यात २३ हजार ५७१ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. महापुरात गेल्यावर्षी सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले होते. या ठिकाणी काही शेतकºयांनी स्वत:हून बदली करुन उसाची लागण केली आहे. कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या परिसरात सोयाबीन पेरणीचे क्षेत्र घटण्याची शक्यता कृषी विभागाच्या अधिकाºयांचा अंदाज आहे.खरिपातील बियाणांची मागणी (क्विंटल)बियाणे प्रकार मागणी उपलब्ध बियाणेखरीप ज्वारी ३७९५ १०१८बाजरी १४०० ७९५भात २४५४ ३९३२मका ५५६५ ३९६७भुईमूग १९३२ ९३२सोयाबीन १५४८८ १०७९९मूग ४०४ २५०उडीद ९१८ ६९२तूर ३५९ २१सूर्यफूल ९१ २०एकूण ३२४०९ २३५७१

जादा दराने खत विक्री केल्यास परवाने रद्द : विवेक कुंभारकृषी सेवा केंद्र चालकांनी नियमानुसार दर घ्यावेत. जादा दराने पैसे घेतल्याची तक्रार आल्यास तात्काळ परवाना रद्द करण्यात येणार आहे. खते आणि बियाणांमधील बोगसगिरी रोखण्यासाठी कृषी सेवा केंद्र चालकांकडून खते व बियाणे खरेदी करताना पावती घ्यावी. जे ती देणार नाहीत, त्यांच्याबद्दल कृषी विभागाकडे तक्रार केल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी विवेक कुंभार यांनी दिला आहे. 

गैरकारभार रोखण्यासाठी ११ भरारी पथकेखरीप हंगामात खते व बियाणांची बोगसगिरी रोखण्यासाठी कृषी विभागाने प्रत्येक तालुक्याला एक आणि जिल्हास्तरावर एक अशी ११ भरारी पथके तयार केली आहेत. प्रत्येक कृषी सेवा केंद्राची तपासणी केली जाणार आहे. प्रत्येक दुकानदाराने दुकानामध्ये दरफलक लावले पाहिजेत, खताचे लिंकिंग करु नये, आदी प्रश्नांवर पथक लक्ष ठेवणार आहे, असेही विवेक कुंभार म्हणाले.

टॅग्स :FarmerशेतकरीSangliसांगली