शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
5
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
6
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
7
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
8
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
9
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
10
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
11
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
12
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
13
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
14
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
15
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
16
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
17
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
18
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
19
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
20
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो

‘अलमट्टी’त ३१ जुलैपर्यंत ५० टक्केच पाणीसाठा ठेवा, मेधा पाटकर यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 17:33 IST

पाणी वळविण्याची भूमिका चुकीची

सांगली : अलमट्टी धरणामध्ये ३१ जुलैपर्यंत ५० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा करू नये, अशी विनंती सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना अलमट्टी धरण कारणीभूत असल्यामुळे उंचीही वाढवू नये, अशी मागणी पाटकर यांनी केली आहे.मेधा पाटकर यांनी पत्रात म्हटले की, अलमट्टी धरणाची उंची आणि त्याचा महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांना धोका होत आहे. धरणातील पाणीसाठा करताना केंद्रीय जल आयोगाच्या नियमाचे कर्नाटकच्या जलसंपदा विभागाने पालन केले पाहिजे. ३१ जुलैपर्यंत अलमट्टी धरण ५० टक्क्यांपेक्षा जास्त भरू नये. अलमट्टी धरणातील पाण्याचा प्रवाह, विसर्ग, पाण्याची पातळी, हिप्परगी बंधाऱ्याशी संबंधित निर्णय आणि कारवाई तातडीने करण्याची विनंती आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील तीनशेपेक्षा जास्त गावे आणि शहरांचे काही भाग वाचविण्यासाठी अलमट्टी धरणात मर्यादित पाणीसाठा ठेवणे गरजेचे आहे. महाराष्ट्र सरकारने अलमट्टीची उंची आणि पाण्याची पातळी ५२४ मीटरपर्यंत वाढविण्यास आपला विरोध जाहीर केला आहे. २००५ पासून कृष्णा नदीच्या खोऱ्यातील लोकांनीदेखील अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्यास विरोधच केला आहे. त्यांना पूर्णपणे भरपाई मिळालेली नाही किंवा पुनर्वसनदेखील झाले नाही. जर यावर्षी पूर आला, तर हवामान बदल आणि त्याअनुषंगाने, अनियमित पावसाच्या सध्याच्या संदर्भात, तुमच्या नेतृत्वाखालील सरकारने काही अपरिहार्य कृती करायच्या आहेत. त्यामध्ये हिप्परगी बंधाऱ्याचे सर्व दरवाजे पावसाळ्याच्या अखेरीपर्यंत उघडे ठेवणे आवश्यक आहे.

जल आयोगाच्या नियमाचे पालन कराकेंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अलमट्टीसह प्रत्येक जलाशय ३१ जुलैपर्यंत साठवण क्षमतेच्या ५० टक्क्यांपर्यंत आणि ऑगस्टअखेर २३ टक्क्यांपर्यंत रिकामे ठेवणे आवश्यक आहे. १५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण जलाशय भरता येणार नाही. हवामानातील बदलांमुळे मान्सून १५ सप्टेंबरच्या पुढेही वाढू शकतो. म्हणूनच, ही अंतिम मुदत आणखी वाढवावी लागेल. आतापासूनच पावसाळ्याच्या संपूर्ण कालावधीत पुरेसा विसर्ग चालू ठेवणे आवश्यक आहे, असेही मेधा पाटकर म्हणाल्या.

पाणी वळविण्याची भूमिका चुकीचीमेधा पाटकर म्हणाल्या, महाराष्ट्र सरकारने पुराचे पाणी दुसऱ्या नदीच्या खोऱ्यात वळविण्याची केलेली घोषणादेखील कायदेशीर नाही. पर्यावरणाच्या दृष्टीने सरकारची भूमिका पूर्णत: चुकीची आहे, कारण ती कृष्णा नदी जल न्यायाधिकरणाच्या निकालाचे उल्लंघन करेल. त्यामुळे महापुराचे पाणी दुसऱ्या नदीत वळविता येणार नाही.