शहरं
Join us  
Trending Stories
1
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
2
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
3
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
4
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
5
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
6
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
7
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
8
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
9
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
10
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
11
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
12
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
13
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
14
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
15
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
16
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
17
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
18
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
19
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
20
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 

कवलापुरातील तलाव ४६ वर्षांत प्रथमच आटला..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 11:09 PM

सचिन लाड । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कवलापूर (ता. मिरज) येथील तलाव गेल्या ४६ वर्षांत प्रथमच आटले आहे. ...

सचिन लाड ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : कवलापूर (ता. मिरज) येथील तलाव गेल्या ४६ वर्षांत प्रथमच आटले आहे. तलावात पाण्याचा थेंबही नसल्याने खर्चाच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तलाव पूर्णपणे आटल्याने विहिरींनी तळ गाठला आहे. कूपनलिकांना पाणी बंद झाले आहे. जनवारांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता आहे.कवलापूरचा तलाव प्रसिद्ध आहे. हा तलाव कधी आणि कोणी काढला, याबद्दल जुन्या लोकांनाही माहीत नाही. गावाबाहेर विमानतळालगत तलाव आहे. तो आकाराने खूप मोठा आहे. येथे नेहमीच महिलांची कपडे धुण्यासाठी गर्दी असते. जनवारांनाही पाणी पाजण्यासाठी आणले जाते. काहीजण वाहने धुवायला येतात. अगदी बुधगावचे ग्रामस्थ या तलावाचा उपयोग करुन घेतात. गणेश मूर्तींचे विसर्जनही केले जाते. घटस्थापना तसेच सिद्धेश्वर यात्रेपूर्वी मोठी धुणी धुण्यासाठी संपूर्ण गाव या तलावावर येते. मध्यंतरी तळ्यातील मासेमारीचा ठेकाही देण्यात आला होता. सांगलीपासून अवघ्या दहा किलोमीटरवर कवलापूर गाव आहे. तरीही कित्येक वर्षांपासून या गावचा पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. अनेकदा महिना, पंधरा दिवस नळाला पाणी येत नाही. त्यावेळी ग्रामस्थांना या तलावाचा खूप आधार मिळतो. विशेषत: महिला कपडे धुण्यासाठी येतात. बहुतांश गावातील जनावरांना पाणी पाजण्यास आणले जाते.यावर्षी ऐन उन्हाळ्यात तलाव आटल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. सध्या ग्रामपंचायतीकडून पाच ते सहा दिवसांतून एकवेळ पाणी पुरवठा केला जात आहे. नळाच्या पाण्यावरच अवलंबून रहावे लागत आहे. जनवारांना पाणी खूप लागते. यासाठी तलावाचा आधार होतो. मात्र गेल्या ४५ वर्षांत यंदा तो प्रथमच आटला आहे. १९७२ ला दुष्काळ पडला होता. त्यावेळीही तलाव आटला होता. दुष्काळी परिस्थितीत याच तलावाने ग्रामस्थांना तारले होते. ग्रामस्थांनी गाळही काढला होता. तलाव, विहीर आणि कूपनलिका असे एक आगळे-वेगळे समीकरण आहे. तलाव आटले की, परिसरातील विहिरी तळ गाठतात. कूपनलिकांना अजिबात पाणी येत नाही. धुळगाव रस्त्यावर पिराचा मळा येथे एक खूप खोल विहीर आहे. उन्हाळ्यात तलावातील पाणी कमी झाले, तर या विहिरीतील पाणीही कमी होत असे. आताही तशीच परिस्थिती आहे. दरम्यान ग्रामस्थ शरद पाटील यांनी तलावातील गाळ काढण्याची तयारी दर्शविली आहे.