शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

कर्नाटकने पाणी सोडले; महाराष्ट्राला डिवचले! जतमधील लोकभावनेला हात घालण्याचा कर्नाटकचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 14:26 IST

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि माजी जलसंपदामंत्री एम.बी. पाटील यांनी जतच्या ४० गावांवर दावा करून महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे.

संख : सीमाप्रश्नावरून महाराष्ट्राला डिवचणाऱ्या कर्नाटकने बुधवारी पुन्हा कुरापत काढली. तुबची- बबलेश्वर योजनेचे पाणी जत पूर्व भागात सोडून कर्नाटकने लोकभावनेला हात घालण्याचा प्रयत्न केला. यतनाळ येथील ओढापात्रातून सोडलेल्या या पाण्यामुळे तिकोंडी येथील साठवण तलाव एका दिवसात तुडुंब भरून वाहू लागला आहे.कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि माजी जलसंपदामंत्री एम.बी. पाटील यांनी जतच्या ४० गावांवर दावा करून महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर जत तालुक्यासह महाराष्ट्रातून प्रचंड संताप व्यक्त होतानाच पूर्व भागाला पाण्यापासून वंचित ठेवल्याने महाराष्ट्र सरकारबाबतही नाराजी व्यक्त होत आहे.राज्य सरकार एकीकडे म्हैसाळ विस्तारित योजना पूर्ण करण्यासाठी तातडीने निर्णय घेत आहे, तर याचवेळी कर्नाटकने सीमाभागातील लोकभावनेला हात घालत थेट तुबची- बबलेश्वर योजना सुरू करून जत तालुक्यात नैसर्गिक प्रवाहातून पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कर्नाटकच्या सीमेपासून तीन किलोमीटरवर असलेला तिकोंडी तलाव गुरुवारी भरून वाहू लागला आहे.

कर्नाटकातून नैसर्गिक उताराने जतमध्ये पाणी येऊ शकते, हे दाखविण्याचा प्रयत्न याद्वारे केल्याचे दिसत आहे. जतच्या सीमावर्ती भागातील ४० गावांवर दावा करणाऱ्या कर्नाटक शासनाचे तिकोंडी गावाने समर्थन केल्याने हे पाणी सोडून या परिसराला कर्नाटकात येण्याचे निमंत्रण दिल्याची चर्चा आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचा दौरा सुरू असतानाच कुरापत काढलीसांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी गुरुवारी जत पूर्वभागाच्या दौऱ्यावर होते. म्हैसाळ योजनेच्या मायथळ कालव्यातून पूर्वभागातील वंचित गावांना पाणी देऊ, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी रात्री जाहीर केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण सहा तलावांची पाहणी केली. लोकांची मतेही जाणून घेतली. या पार्श्वभूमीवर कर्नाटकने महाराष्ट्राला पुन्हा डिवचले आहे.

टॅग्स :Sangliसांगलीjat-acजाटMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटक