शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

कर्नाटकने पाणी सोडले; महाराष्ट्राला डिवचले! जतमधील लोकभावनेला हात घालण्याचा कर्नाटकचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 14:26 IST

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि माजी जलसंपदामंत्री एम.बी. पाटील यांनी जतच्या ४० गावांवर दावा करून महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे.

संख : सीमाप्रश्नावरून महाराष्ट्राला डिवचणाऱ्या कर्नाटकने बुधवारी पुन्हा कुरापत काढली. तुबची- बबलेश्वर योजनेचे पाणी जत पूर्व भागात सोडून कर्नाटकने लोकभावनेला हात घालण्याचा प्रयत्न केला. यतनाळ येथील ओढापात्रातून सोडलेल्या या पाण्यामुळे तिकोंडी येथील साठवण तलाव एका दिवसात तुडुंब भरून वाहू लागला आहे.कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि माजी जलसंपदामंत्री एम.बी. पाटील यांनी जतच्या ४० गावांवर दावा करून महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर जत तालुक्यासह महाराष्ट्रातून प्रचंड संताप व्यक्त होतानाच पूर्व भागाला पाण्यापासून वंचित ठेवल्याने महाराष्ट्र सरकारबाबतही नाराजी व्यक्त होत आहे.राज्य सरकार एकीकडे म्हैसाळ विस्तारित योजना पूर्ण करण्यासाठी तातडीने निर्णय घेत आहे, तर याचवेळी कर्नाटकने सीमाभागातील लोकभावनेला हात घालत थेट तुबची- बबलेश्वर योजना सुरू करून जत तालुक्यात नैसर्गिक प्रवाहातून पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कर्नाटकच्या सीमेपासून तीन किलोमीटरवर असलेला तिकोंडी तलाव गुरुवारी भरून वाहू लागला आहे.

कर्नाटकातून नैसर्गिक उताराने जतमध्ये पाणी येऊ शकते, हे दाखविण्याचा प्रयत्न याद्वारे केल्याचे दिसत आहे. जतच्या सीमावर्ती भागातील ४० गावांवर दावा करणाऱ्या कर्नाटक शासनाचे तिकोंडी गावाने समर्थन केल्याने हे पाणी सोडून या परिसराला कर्नाटकात येण्याचे निमंत्रण दिल्याची चर्चा आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचा दौरा सुरू असतानाच कुरापत काढलीसांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी गुरुवारी जत पूर्वभागाच्या दौऱ्यावर होते. म्हैसाळ योजनेच्या मायथळ कालव्यातून पूर्वभागातील वंचित गावांना पाणी देऊ, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी रात्री जाहीर केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण सहा तलावांची पाहणी केली. लोकांची मतेही जाणून घेतली. या पार्श्वभूमीवर कर्नाटकने महाराष्ट्राला पुन्हा डिवचले आहे.

टॅग्स :Sangliसांगलीjat-acजाटMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटक