शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

..आता कर्नाटकने महाराष्ट्राच्या मदतीची परतफेड करावी; सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2022 16:39 IST

कर्नाटकने तुबची-बबलेश्वर योजनेतून जतसाठी पाणी सोडावे. महाराष्ट्राच्या मदतीची परतफेड करावी.

सांगली : टंचाई काळात महाराष्ट्राने म्हैसाळ योजनेतून कर्नाटकलापाणी दिले होते, त्याच धर्तीवर कर्नाटकनेही जत तालुक्यासाठी पाणी सोडावे, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी व्यक्त केली. कोल्हापुरात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या संयुक्त बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या विविध समस्या व मागण्या मांडल्या.जिल्हाधिकारी म्हणाले, सन २०१६-१७ मध्ये कर्नाटकच्या विनंतीनुसार सीमावर्ती गावांतील तीव्र पाणीटंचाई कमी करण्यासाठी म्हैसाळ उपसा योजनेतून ६.८६५ टीएमसी पाणी सोडले होते. सांगली जिल्ह्यातही जतच्या सीमावर्ती गावांत उन्हाळ्यात तीव्र टंचाईचा सामना करावा लागतो. त्यावेळी कर्नाटकने तुबची-बबलेश्वर योजनेतून जतसाठी पाणी सोडावे. महाराष्ट्राच्या मदतीची परतफेड करावी.ते म्हणाले, दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था परस्परांशी निगडीत आहे. याचा विचार करून कर्नाटक महामंडळाच्या बसेसना सांगली, मिरजेसह विविध बसस्थानकांवर प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले जातात. तसाच सकारात्मक प्रतिसाद सांगली जिल्ह्यातील बसेसनाही कर्नाटक महामंडळाने द्यावा. अथणी, चिक्कोडी, विजयपूर आदी स्थानकांत पुरेसे प्लॅटफार्म द्यावेत.अवैध गर्भलिंग निदानाविषयी चर्चाया बैठकीत सीमाभागातील अवैध गर्भलिंग चाचणी व गर्भपात या विषयावरही चर्चा झाली. सांगली जिल्ह्यात म्हैसाळसह सीमावर्ती गावांत गर्भलिंग निदानाची अवैध प्रकरणे गेल्या काही वर्षांत उघडकीस आली. म्हैसाळचे खिद्रापुरे प्रकरण तर राज्यभर गाजले. सीमेवरील काही गावांत कायद्यातील पळवाटांचा गैरफायदा घेत गर्भलिंग निदान केंद्रे चालविली जातात. तेथे पीसीपीएनडीटी कायद्याच्या कडक अंमलबजावणीची मागणी करण्यात आली.व्यापाराला अडथळा नकोकर्नाटकातून महाराष्ट्रात होणारी व्यापारी वाहतूक, पर्यटनविषयक वाहतुकीला सांगली जिल्ह्यात होणारे अडथळे सार्वत्रिक चर्चेत आहेत. विशेषत: कर्नाटकच्या वाहनांची मिरजेत होणारी जाचक तपासणी अवघ्या कर्नाटकात कुप्रसिद्ध आहे. त्यावर अप्रत्यक्ष चर्चा बैठकीत झाली. बेळगावीचे जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले, व्यापाराला चालना देण्यासाठी आंबोली घाटमार्गे बेळगावी आणि महाराष्ट्रादरम्यान दर्जेदार रस्ते जोडणीची गरज आहे.

महाराष्ट्रातील शहरांमध्ये माल पोहोचविण्यासाठी बेळगावी येथील मालवाहू वाहनांची अडवणूक होऊ नये, विनाअडथळा प्रवेश मिळावा. विजयपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विजयमहानंदेश दनम्मानवर यांनीही दोन्ही राज्यांच्या धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांना आणि यात्रेकरूंना पुरवल्या जाणाऱ्या दळणवळण आणि मूलभूत सुविधांमधील अडथळे मांडले

टॅग्स :SangliसांगलीKarnatakकर्नाटकWaterपाणी