शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

..आता कर्नाटकने महाराष्ट्राच्या मदतीची परतफेड करावी; सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2022 16:39 IST

कर्नाटकने तुबची-बबलेश्वर योजनेतून जतसाठी पाणी सोडावे. महाराष्ट्राच्या मदतीची परतफेड करावी.

सांगली : टंचाई काळात महाराष्ट्राने म्हैसाळ योजनेतून कर्नाटकलापाणी दिले होते, त्याच धर्तीवर कर्नाटकनेही जत तालुक्यासाठी पाणी सोडावे, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी व्यक्त केली. कोल्हापुरात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या संयुक्त बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या विविध समस्या व मागण्या मांडल्या.जिल्हाधिकारी म्हणाले, सन २०१६-१७ मध्ये कर्नाटकच्या विनंतीनुसार सीमावर्ती गावांतील तीव्र पाणीटंचाई कमी करण्यासाठी म्हैसाळ उपसा योजनेतून ६.८६५ टीएमसी पाणी सोडले होते. सांगली जिल्ह्यातही जतच्या सीमावर्ती गावांत उन्हाळ्यात तीव्र टंचाईचा सामना करावा लागतो. त्यावेळी कर्नाटकने तुबची-बबलेश्वर योजनेतून जतसाठी पाणी सोडावे. महाराष्ट्राच्या मदतीची परतफेड करावी.ते म्हणाले, दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था परस्परांशी निगडीत आहे. याचा विचार करून कर्नाटक महामंडळाच्या बसेसना सांगली, मिरजेसह विविध बसस्थानकांवर प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले जातात. तसाच सकारात्मक प्रतिसाद सांगली जिल्ह्यातील बसेसनाही कर्नाटक महामंडळाने द्यावा. अथणी, चिक्कोडी, विजयपूर आदी स्थानकांत पुरेसे प्लॅटफार्म द्यावेत.अवैध गर्भलिंग निदानाविषयी चर्चाया बैठकीत सीमाभागातील अवैध गर्भलिंग चाचणी व गर्भपात या विषयावरही चर्चा झाली. सांगली जिल्ह्यात म्हैसाळसह सीमावर्ती गावांत गर्भलिंग निदानाची अवैध प्रकरणे गेल्या काही वर्षांत उघडकीस आली. म्हैसाळचे खिद्रापुरे प्रकरण तर राज्यभर गाजले. सीमेवरील काही गावांत कायद्यातील पळवाटांचा गैरफायदा घेत गर्भलिंग निदान केंद्रे चालविली जातात. तेथे पीसीपीएनडीटी कायद्याच्या कडक अंमलबजावणीची मागणी करण्यात आली.व्यापाराला अडथळा नकोकर्नाटकातून महाराष्ट्रात होणारी व्यापारी वाहतूक, पर्यटनविषयक वाहतुकीला सांगली जिल्ह्यात होणारे अडथळे सार्वत्रिक चर्चेत आहेत. विशेषत: कर्नाटकच्या वाहनांची मिरजेत होणारी जाचक तपासणी अवघ्या कर्नाटकात कुप्रसिद्ध आहे. त्यावर अप्रत्यक्ष चर्चा बैठकीत झाली. बेळगावीचे जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले, व्यापाराला चालना देण्यासाठी आंबोली घाटमार्गे बेळगावी आणि महाराष्ट्रादरम्यान दर्जेदार रस्ते जोडणीची गरज आहे.

महाराष्ट्रातील शहरांमध्ये माल पोहोचविण्यासाठी बेळगावी येथील मालवाहू वाहनांची अडवणूक होऊ नये, विनाअडथळा प्रवेश मिळावा. विजयपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विजयमहानंदेश दनम्मानवर यांनीही दोन्ही राज्यांच्या धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांना आणि यात्रेकरूंना पुरवल्या जाणाऱ्या दळणवळण आणि मूलभूत सुविधांमधील अडथळे मांडले

टॅग्स :SangliसांगलीKarnatakकर्नाटकWaterपाणी