शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

कर्नाटकने अलमट्टी धरण १०० टक्के भरलेच, महापूर नियंत्रण समितीची तक्रार बेदखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 11:45 IST

कर्नाटक, महाराष्ट्राच्या जलसंपदाच्या अधिकाऱ्यांचे जल आयोगाच्या सूचनांकडे दुर्लक्ष

सांगली : कोणत्याही राज्याने १५ सप्टेंबरपर्यंत १०० टक्के धरणे भरू नयेत, असा केंद्रीय जल आयोगाचा नियम आहे. पण, हा नियम पायदळी तुडवीत कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागाने धरणे जवळपास ८५ ते १०० टक्केपर्यंत भरली आहेत. बहुचर्चित अलमट्टी धरण गुरुवारी १०० टक्के भरले असून १२२.४८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तसेच कोयना ७९ टक्के तर वारणा धरणात ८६ टक्के पाणीसाठा झाला आहे.अलमट्टी धरणाची पाणी साठवण्याची उंची ५१९.६० मीटर असून १२३ टीएमसी पाणी साठवण क्षमता आहे. सध्या अलमट्टी धरणामध्ये १२२.४८ टीएमसी पाणी साठलेले आहे. सांगली पाटबंधारे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी अलमट्टी धरण सध्या शंभर टक्के भरले आहे, असे सांगितले. वास्तविक दि. १५ सप्टेंबरपर्यंत कोणतेही धरण १०० टक्के भरता येत नाही. पण, सर्व नियम पायदळी तुडवित कर्नाटक जलसंपदा विभागाने अलमट्टी धरण १०० टक्के भरले आहे. याला महाराष्ट्राचा जलसंपदा विभागही अपवाद नाही. पश्चिम महाराष्ट्रातील कोयना ७९ टक्के तर वारणा ८६ टक्के भरले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण ९८ टक्के भरले आहे.कृष्णा महापूर नियंत्रण समितीने अलमट्टीसह महाराष्ट्राची धरणे १५ सप्टेंबरपर्यंत शंभर टक्के भरू नयेत, अशी मागणी केली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे निवेदनाद्वारे धरणातून विसर्ग वाढविण्याची मागणी केली होती. तरीही अलमट्टी धरण गुरुवारी १०० टक्के भरले असून धरणातून सध्या केवळ १५ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे.

केंद्रीय जल आयोगाचा नियमकेंद्रीय जल आयोगाने पावसाळ्यात धरणांमध्ये किती पाणीसाठा असावा, याचे नियम ठरविले आहेत. त्यानुसार दि. ३१ मे रोजी १० टक्के, दि. ३१ जुलैअखेर ५० टक्के, दि. ३१ ऑगस्ट ७७ टक्के आणि दि. १५ सप्टेंबरनंतर हवामानाचा अंदाज घेऊन धरणे पूर्ण क्षमतेने भरावीत, असे धोरण ठरले आहे.

टॅग्स :SangliसांगलीDamधरणKarnatakकर्नाटक