शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

कर्नाटकने अलमट्टी धरण १०० टक्के भरलेच, महापूर नियंत्रण समितीची तक्रार बेदखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 11:45 IST

कर्नाटक, महाराष्ट्राच्या जलसंपदाच्या अधिकाऱ्यांचे जल आयोगाच्या सूचनांकडे दुर्लक्ष

सांगली : कोणत्याही राज्याने १५ सप्टेंबरपर्यंत १०० टक्के धरणे भरू नयेत, असा केंद्रीय जल आयोगाचा नियम आहे. पण, हा नियम पायदळी तुडवीत कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागाने धरणे जवळपास ८५ ते १०० टक्केपर्यंत भरली आहेत. बहुचर्चित अलमट्टी धरण गुरुवारी १०० टक्के भरले असून १२२.४८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तसेच कोयना ७९ टक्के तर वारणा धरणात ८६ टक्के पाणीसाठा झाला आहे.अलमट्टी धरणाची पाणी साठवण्याची उंची ५१९.६० मीटर असून १२३ टीएमसी पाणी साठवण क्षमता आहे. सध्या अलमट्टी धरणामध्ये १२२.४८ टीएमसी पाणी साठलेले आहे. सांगली पाटबंधारे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी अलमट्टी धरण सध्या शंभर टक्के भरले आहे, असे सांगितले. वास्तविक दि. १५ सप्टेंबरपर्यंत कोणतेही धरण १०० टक्के भरता येत नाही. पण, सर्व नियम पायदळी तुडवित कर्नाटक जलसंपदा विभागाने अलमट्टी धरण १०० टक्के भरले आहे. याला महाराष्ट्राचा जलसंपदा विभागही अपवाद नाही. पश्चिम महाराष्ट्रातील कोयना ७९ टक्के तर वारणा ८६ टक्के भरले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण ९८ टक्के भरले आहे.कृष्णा महापूर नियंत्रण समितीने अलमट्टीसह महाराष्ट्राची धरणे १५ सप्टेंबरपर्यंत शंभर टक्के भरू नयेत, अशी मागणी केली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे निवेदनाद्वारे धरणातून विसर्ग वाढविण्याची मागणी केली होती. तरीही अलमट्टी धरण गुरुवारी १०० टक्के भरले असून धरणातून सध्या केवळ १५ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे.

केंद्रीय जल आयोगाचा नियमकेंद्रीय जल आयोगाने पावसाळ्यात धरणांमध्ये किती पाणीसाठा असावा, याचे नियम ठरविले आहेत. त्यानुसार दि. ३१ मे रोजी १० टक्के, दि. ३१ जुलैअखेर ५० टक्के, दि. ३१ ऑगस्ट ७७ टक्के आणि दि. १५ सप्टेंबरनंतर हवामानाचा अंदाज घेऊन धरणे पूर्ण क्षमतेने भरावीत, असे धोरण ठरले आहे.

टॅग्स :SangliसांगलीDamधरणKarnatakकर्नाटक