शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

कर्नाटकने अलमट्टी धरण १०० टक्के भरलेच, महापूर नियंत्रण समितीची तक्रार बेदखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 11:45 IST

कर्नाटक, महाराष्ट्राच्या जलसंपदाच्या अधिकाऱ्यांचे जल आयोगाच्या सूचनांकडे दुर्लक्ष

सांगली : कोणत्याही राज्याने १५ सप्टेंबरपर्यंत १०० टक्के धरणे भरू नयेत, असा केंद्रीय जल आयोगाचा नियम आहे. पण, हा नियम पायदळी तुडवीत कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागाने धरणे जवळपास ८५ ते १०० टक्केपर्यंत भरली आहेत. बहुचर्चित अलमट्टी धरण गुरुवारी १०० टक्के भरले असून १२२.४८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तसेच कोयना ७९ टक्के तर वारणा धरणात ८६ टक्के पाणीसाठा झाला आहे.अलमट्टी धरणाची पाणी साठवण्याची उंची ५१९.६० मीटर असून १२३ टीएमसी पाणी साठवण क्षमता आहे. सध्या अलमट्टी धरणामध्ये १२२.४८ टीएमसी पाणी साठलेले आहे. सांगली पाटबंधारे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी अलमट्टी धरण सध्या शंभर टक्के भरले आहे, असे सांगितले. वास्तविक दि. १५ सप्टेंबरपर्यंत कोणतेही धरण १०० टक्के भरता येत नाही. पण, सर्व नियम पायदळी तुडवित कर्नाटक जलसंपदा विभागाने अलमट्टी धरण १०० टक्के भरले आहे. याला महाराष्ट्राचा जलसंपदा विभागही अपवाद नाही. पश्चिम महाराष्ट्रातील कोयना ७९ टक्के तर वारणा ८६ टक्के भरले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण ९८ टक्के भरले आहे.कृष्णा महापूर नियंत्रण समितीने अलमट्टीसह महाराष्ट्राची धरणे १५ सप्टेंबरपर्यंत शंभर टक्के भरू नयेत, अशी मागणी केली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे निवेदनाद्वारे धरणातून विसर्ग वाढविण्याची मागणी केली होती. तरीही अलमट्टी धरण गुरुवारी १०० टक्के भरले असून धरणातून सध्या केवळ १५ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे.

केंद्रीय जल आयोगाचा नियमकेंद्रीय जल आयोगाने पावसाळ्यात धरणांमध्ये किती पाणीसाठा असावा, याचे नियम ठरविले आहेत. त्यानुसार दि. ३१ मे रोजी १० टक्के, दि. ३१ जुलैअखेर ५० टक्के, दि. ३१ ऑगस्ट ७७ टक्के आणि दि. १५ सप्टेंबरनंतर हवामानाचा अंदाज घेऊन धरणे पूर्ण क्षमतेने भरावीत, असे धोरण ठरले आहे.

टॅग्स :SangliसांगलीDamधरणKarnatakकर्नाटक