शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

काका-पुतण्यातील सुसंवादाने कासेगावकरांना सुखद धक्का

By admin | Updated: September 1, 2015 22:31 IST

जयंतराव-देवराज दादांची चर्चा : विधानसभेनंतर प्रथमच एकत्र

प्रताप बडेकर- कासेगाव माजी ग्रामविकास मंत्री, आमदार जयंत पाटील व त्यांचे पुतणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील यांच्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून मतभेद असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. विधानसभेवेळी मानसिंगराव नाईक यांना कासेगावातून कमी मतदान मिळाल्यामुळे जयंतराव पुतण्यावर नाराज असल्याचीही चर्चा होती, परंतु येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात काका-पुतण्याने व्यासपीठावर हसत हसत अनेक विषयांवर सुसंवाद साधला. हे पाहून उपस्थितांना सुखद धक्का बसला.कासेगाव (ता. वाळवा) हे जयंत पाटील यांचे गाव असल्याने जिल्ह्यात राजकीयदृष्ट्या गावाला विशेष महत्त्व आहे. जयंतरावांमुळेच सरपंच पदापासून जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदापर्यंत देवराज पाटील यांना झेप घेता आली. देवराज पाटील यांनीही या संधीचे सोने करत समतोल विकास साधण्याचा प्रयत्न केला. नम्र, संयमी स्वभावाने विरोधकांशीही चांगले संबंध निर्माण केले. परंतु लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कासेगावातून राष्ट्रवादीच्या उमेदवारांना अपेक्षित मतदान मिळाले नाही. विधानसभा निवडणुकीत मानसिंगराव नाईक यांच्या विरोधात असलेल्या शिवाजीराव नाईक यांना मताधिक्य मिळाले. यामुळे जयंतरावांना धक्का बसला. त्यातूनच ते देवराज पाटील यांच्यावर नाराज असल्याची चर्चा होती. त्यांच्यात मतभेद झाल्याचेही बोलले जात होते. जयंतरावांनी विविध कार्यक्रमातून नाराजी बोलून दाखवली होती. आपल्या गावानेच घात केल्याचे देवराज पाटील, लिंबाजी पाटील व रवींद्र बर्डे यांच्याकडे कटाक्ष टाकून ते बोलले होते. तथापि येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात दोघे काका-पुतणे व्यासपीठावर हसतहसत विविध विषयांवर चर्चा करताना दिसले. या दोघांमध्ये पूर्वीप्रमाणेच संबंध निर्माण झाल्याचे पाहून उपस्थित कासेगावकरांसह देवराज पाटील समर्थकांना सुखद धक्काच बसला.सबकुछ देवराज पाटीलज्येष्ठ नेते जनार्दनकाका पाटील यांच्या आजारपणामुळे व वाढत्या वयाने सार्वजनिक व राजकीय व्यासपीठावरील त्यांचा वावर कमी होऊ लागला आहे. त्यामुळे या परिसरातील कोणताही निर्णय घेताना त्यांचे पुत्र देवराज पाटील यांच्यावरच जयंतराव विश्वास टाकत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे देवराज पाटील यांची जबाबदारी वाढली आहे.जिल्हा परिषद अध्यक्ष असतांनाही देवराज पाटील यांनी चांगला कारभार करून राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांचे लक्षवेधून घेतले होते. सध्या ते अध्यक्ष नसले तरीही पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांमधील संवाद बिघडू नये याकडे त्यांचे लक्ष असते.