शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

अल्पवयीनांची गुन्हेगारीत एंट्री; शिक्षा होणार नाही सांगून करवून घेतले जाताहेत गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2021 18:08 IST

शरद जाधव सांगली : अजाणत्या वयात नको ती संगत आणि उच्च राहणीमानाच्या आकर्षणामुळे अनेक अल्पवयीन मुले गुन्हेगारीत अडकत आहेत. ...

शरद जाधवसांगली : अजाणत्या वयात नको ती संगत आणि उच्च राहणीमानाच्या आकर्षणामुळे अनेक अल्पवयीन मुले गुन्हेगारीत अडकत आहेत. अल्पवयीन मुलांकडून गुन्हेगारी कृत्य करून घेण्याचेही प्रमाण वाढले असून शिक्षा होणार नाही असे सांगून त्यांना यात ओढले जात आहे. मात्र, १६ वर्षांवरील मुलांकडून गुन्हा घडल्यास व तो न्यायालयात सिद्ध झाल्यास शिक्षेची तरतूद २०१५ पासून लागू झाली आहे.

अल्पवयीन मुलांकडून गुन्हे करून घेतल्यास त्यांना शिक्षा होणार नाही अथवा झाली तरी ती कमी स्वरूपाची असल्याने अनेकजण आपला हेतू साध्य करण्यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर करून घेतात. पौगंडावस्थेत असलेले हे तरुण क्षणिक आकर्षणापोटीच गुन्हेगारीत अडकत चालल्याने बाल न्याय मंडळाच्या माध्यमातून समुपदेशनाचे काम सुरू आहे.

गंभीर गुन्ह्यातही अल्पवयीनांचा सहभाग

खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी यासह इतर गंभीर गुन्ह्यांतही अल्पवयीनांचा सहभाग करून घेतला जातो. गेल्याच आठवड्यात पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर दोघा अल्पवयीनांनी हल्ला केला. यातील मुख्य संशयिताने अल्पवयीनांकडून हे कृत्य करून घेतले होते.

आकड्यांबाबत गोपनीयता

सन २०१५ मध्ये झालेल्या कायद्यातील तरतुदी आणि बदलानुसार जिल्ह्यातील अल्पवयीन गुन्हेगारांची संख्या, त्यांनी केलेले गुन्हे आणि त्यांना झालेली शिक्षा याची कोणतीही माहिती देण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

शब्दातील बदलही आश्वासक

अल्पवयीन मुलांकडून गुन्ह्यात अटक केल्यानंतर त्यास बालसुधारगृहात दाखल केले जाते. यास पूर्वी ‘रिमांड होम’ असे म्हटले जात असे. आता नवीन कायद्यानुसार ‘रिमांड होम’ शब्दाचा वापर करणे गुन्हा असून, त्याऐवजी सुधारगृह म्हणण्याच्या सूचना आहेत. याशिवाय अल्पवयीन गुन्हेगारांना ‘बाल गुन्हेगार’ असे न म्हणता ‘विधिसंघर्षग्रस्त बालक’ म्हणावे अशीही सूचना आहे.

मोबाईल, टीव्ही आणि कौटुंबिक वातावरण

कमी वयात गुन्हेगारीत मुलांचे वाढलेले प्रमाण यासाठी सभोवतालचे वातावरणही तितकेच कारणीभूत आहे. टीव्हीवरील हिंसक मालिका आणि कार्यक्रम पाहून अनेक मुले प्रेरित होतात, तर घरातील पालकांचे आपला मुलगा काय करतो याकडे लक्ष नसल्यास ही मुले गुन्हेगारीकडे वळतात. त्यात मुलांचे व्यक्तिमत्त्व घडण्याच्या वयात मुलांना मिळणारी संगत महत्त्वाची ठरते.

मंडळ करते अभ्यास

- अल्पवयीन गुन्हेगारांना प्रवाहात आणण्यासाठी बाल न्याय मंडळ काम करते.- पोलिसांकडून अल्पवयीनास मंडळासमोर हजर केले जाते. यावेळी ते समुपदेशकामार्फत समुपदेशन करून त्याचे पुनर्वसन करण्यात येते.

मुलांच्या पुनर्वसनास प्राधान्य- गंभीर गुन्ह्यात ‘प्रिलिमिनरी असेसमेंट’ द्वारे मुलाचे कृत्य सज्ञानाप्रमाणे आहे का याची तपासणी केली जाते व त्याच्यावर खटला दाखल केला जातो. यातून शिक्षाही होते.

- गुन्हेगारीत ओढलेल्या मुलांच्या पुनर्वसनासाठीही मंडळाकडून प्रयत्न केले जातात.

बाल न्याय मंडळाकडून गुन्हेगारीत आलेल्या बालकांचे समुपदेशन करून त्यांना पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्यांच्या आवडीनुसार त्यांना मार्गदर्शनही केले जाते. - ॲड. एस. एम. पखाली, सदस्य, बाल न्याय मंडळ, सांगली

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी