शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
4
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
5
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
6
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
7
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
8
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

इस्लामपुरात जयंतराव-सदाभाऊंची खलबते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 12:57 AM

राज्यात शिवसेना, कॉँग्रेस व राष्टÑवादीच्या महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होण्याचे संकेत असतानाच खानापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचे विरोधक माजी आमदार सदाशिवराव पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, राष्टÑवादीचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक, सुशांत देवकर यांनी इस्लामपूर येथे राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांची भेट घेतली. त्यांच्यात १५ मिनिटे खलबते झाली.

विटा : राज्यात शिवसेना, कॉँग्रेस व राष्टÑवादीच्या महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होण्याचे संकेत असतानाच खानापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचे विरोधक माजी आमदार सदाशिवराव पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, राष्टÑवादीचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक, सुशांत देवकर यांनी इस्लामपूर येथे राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांची भेट घेतली. त्यांच्यात १५ मिनिटे खलबते झाली.विधानसभा निवडणुकीत खानापूर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सदाशिवराव पाटील यांना राष्टÑवादीने पाठिंबा दिला होता. परंतु, शिवसेना आणि भाजप युतीमुळे राजेंद्रअण्णा देशमुख, गोपीचंद पडळकर यांनी आ. बाबर यांना ताकद दिली. परिणामी, बाबर यांचा २६ हजार मतांनी विजय झाला. निकालानंतर सेना-भाजपमध्ये सत्तासंघर्ष सुरू झाल्याने शिवसेनेने राष्टÑवादी व कॉँग्रेसचा पाठिंबा घेऊन महाशिवआघाडीचे सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शिवसेनेतून बाबर यांच्या मंत्रिपदाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यात राष्टÑवादीचीही भूमिका महत्त्वाची आहे. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांची सदाशिवराव पाटील, वैभव पाटील, बाबासाहेब मुळीक, सुशांत देवकर, किरण तारळेकर, विश्वनाथ कांबळे, किसन जानकर या नेत्यांनी इस्लामपूर येथे जाऊन भेट घेतली. दिल्लीला जाण्यासाठी आ. पाटील यांची घाई सुरू असतानाही पंधरा मिनिटे खलबते झाली.या चर्चेचा तपशील समजू शकला नाही. ही भेट राजकीय नसून, आ. पाटील यांना केवळ शुभेच्छा देण्यासाठी झाल्याचे राष्टÑवादीचे तालुकाध्यक्ष मुळीक यांनी सांगितले.