शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

जलविद्युत प्रकल्प खासगी कंपन्यांच्या घशात घालण्याचा जयंत पाटील यांचा डाव- राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 20:02 IST

उद्या सांगलीत मोर्चा

सांगली: राज्यातील २७ जलविद्युत प्रकल्प खासगी कंपन्यांच्या घशात घालण्याचा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा डाव आहे. जलसंपदा खाते त्यांच्याकडे असल्यामुळे तेच या घोटाळ्यास जबाबदार आहेत, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत केली. विजेचे खासगीकरण, एकरकमी एफआरपीसाठी दि. १८ रोजी शेतकऱ्यांचा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शेट्टी म्हणाले की, महानिर्मितीच्या जलविद्युत प्रकल्पातून प्रतियुनिट एक रुपयाला वीज तयार होते. याउलट सध्या महावितरण कंपनी खासगी कंपन्यांकडून पाच ते सहा रुपये युनिटने वीज खरेदी करते. सरकारी कंपनीच्या पाचपटीने जादा दराने खासगी कंपन्यांकडून वीज खरेदी सुरू आहे.

जलविद्युत प्रकल्पांना ३५ वर्षे झाल्याचे कारण देऊन राज्यातील २७ प्रकल्प खासगी कंपन्यांच्या घशात घालण्याचा जलसंपदामंत्री पाटील यांचा डाव आहे. या प्रकल्पांच्या खासगीकरणात मोठा घोटाळा आहे. या प्रश्नावर संघटना राज्यभर आवाज उठविणार आहे. कोणत्याही परिस्थितीत एकाही जलविद्युत प्रकल्पाचे खासगीकरण होऊ देणार नाही. वीज घोटाळ्यातील बोक्यांना ‘करंट’ दिल्याशिवाय गप्प बसणार नाही.

ते म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी एकरकमी एफआरपी दिली आहे; पण सांगली जिल्ह्यातील कारखान्यांकडे ३०० कोटी रुपये एफआरपी थकीत आहेत. साखर उद्योगाला सध्या सुगीचे दिवस आहेत. एकरकमी एफआरपी देऊनही त्यांच्याकडे क्विंटलला २०० ते ३०० रुपये राहतात, तरीही कारखानदार एकरकमी एफआरपी देत नाहीत. विजेचे खासगीकरण, एकरकमी एफआरपीसाठी दि. १८ रोजी शेतकऱ्यांचा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहोत.

आंदोलकांच्या मागण्या-

  • वजनातील काटामारी थांबवा
  • द्राक्षपीक विमा योजना सक्षम करा
  • द्राक्षबागांना आवरण कागदासाठी अनुदान द्या
  • रासायनिक खते, कृषी साहित्य व पशुखाद्य दरवाढ मागे घ्या
  • वीज कनेक्शन तोडणे बंद करून १० तास दिवसा वीज द्या
  • भूमी अधिग्रहण कायदा पूर्वीप्रमाणे लागू करानियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार अनुदान द्या
टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीmahavitaranमहावितरणJayant Patilजयंत पाटील