शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

जलविद्युत प्रकल्प खासगी कंपन्यांच्या घशात घालण्याचा जयंत पाटील यांचा डाव- राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 20:02 IST

उद्या सांगलीत मोर्चा

सांगली: राज्यातील २७ जलविद्युत प्रकल्प खासगी कंपन्यांच्या घशात घालण्याचा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा डाव आहे. जलसंपदा खाते त्यांच्याकडे असल्यामुळे तेच या घोटाळ्यास जबाबदार आहेत, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत केली. विजेचे खासगीकरण, एकरकमी एफआरपीसाठी दि. १८ रोजी शेतकऱ्यांचा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शेट्टी म्हणाले की, महानिर्मितीच्या जलविद्युत प्रकल्पातून प्रतियुनिट एक रुपयाला वीज तयार होते. याउलट सध्या महावितरण कंपनी खासगी कंपन्यांकडून पाच ते सहा रुपये युनिटने वीज खरेदी करते. सरकारी कंपनीच्या पाचपटीने जादा दराने खासगी कंपन्यांकडून वीज खरेदी सुरू आहे.

जलविद्युत प्रकल्पांना ३५ वर्षे झाल्याचे कारण देऊन राज्यातील २७ प्रकल्प खासगी कंपन्यांच्या घशात घालण्याचा जलसंपदामंत्री पाटील यांचा डाव आहे. या प्रकल्पांच्या खासगीकरणात मोठा घोटाळा आहे. या प्रश्नावर संघटना राज्यभर आवाज उठविणार आहे. कोणत्याही परिस्थितीत एकाही जलविद्युत प्रकल्पाचे खासगीकरण होऊ देणार नाही. वीज घोटाळ्यातील बोक्यांना ‘करंट’ दिल्याशिवाय गप्प बसणार नाही.

ते म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी एकरकमी एफआरपी दिली आहे; पण सांगली जिल्ह्यातील कारखान्यांकडे ३०० कोटी रुपये एफआरपी थकीत आहेत. साखर उद्योगाला सध्या सुगीचे दिवस आहेत. एकरकमी एफआरपी देऊनही त्यांच्याकडे क्विंटलला २०० ते ३०० रुपये राहतात, तरीही कारखानदार एकरकमी एफआरपी देत नाहीत. विजेचे खासगीकरण, एकरकमी एफआरपीसाठी दि. १८ रोजी शेतकऱ्यांचा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहोत.

आंदोलकांच्या मागण्या-

  • वजनातील काटामारी थांबवा
  • द्राक्षपीक विमा योजना सक्षम करा
  • द्राक्षबागांना आवरण कागदासाठी अनुदान द्या
  • रासायनिक खते, कृषी साहित्य व पशुखाद्य दरवाढ मागे घ्या
  • वीज कनेक्शन तोडणे बंद करून १० तास दिवसा वीज द्या
  • भूमी अधिग्रहण कायदा पूर्वीप्रमाणे लागू करानियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार अनुदान द्या
टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीmahavitaranमहावितरणJayant Patilजयंत पाटील