शहरं
Join us  
Trending Stories
1
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
2
Video - किरण सामंत यांचे स्वतंत्र वाटचालीचे संकेत?; उदय सामंत यांचे बॅनर, फोटो हटवले
3
शरद पवार यांच्या सुनबाई यावेळी दिल्लीला जाणार हे नक्की; चित्रा वाघ यांना विश्वास
4
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
5
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
6
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
7
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
8
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
9
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
10
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
11
चुकीला माफी नाही! आता WhatsApp ही देणार शिक्षा; 24 तासांसाठी बॅन होणार अकाऊंट
12
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
13
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
14
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
15
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
18
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
19
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

जत तालुक्यामध्ये तुरीची वाढ खुंटली : शेतकरी आर्थिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2018 11:19 PM

परतीच्या पावसाने दिलेली दडी, प्रतिकूल हवामान यामुळे जत तालुक्यातील तूर पीक पाण्याअभावी वाळू लागले आहे. शेंगा कमी लागल्या आहेत. शेंगांमध्ये भरीव दाणे भरलेले नाहीत.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने पाण्याअभावी पिके वाळू लागली आहेत. कर्नाटकात ५९५० रुपये क्विंटल दराने सरकार तूर खरेदी करते.

गजानन पाटील ।संख : परतीच्या पावसाने दिलेली दडी, प्रतिकूल हवामान यामुळे जत तालुक्यातील तूर पीक पाण्याअभावी वाळू लागले आहे. शेंगा कमी लागल्या आहेत. शेंगांमध्ये भरीव दाणे भरलेले नाहीत. त्यामुळे दर हेक्टरी उत्पादन कमी होणार आहे. उत्पादनात ८० टक्क्याने घट होणार आहे.

तालुक्यातील उटगी येथील शेतकऱ्यांना दोन एकरात ३० किलो तुरीचे उत्पादन मिळाले. ज्या प्रमाणात खर्च केला, त्या प्रमाणात उत्पादन न मिळाल्याने निराश होऊन शेतकºयाने आत्महत्या केली. त्यामुळे तुरीच्या उत्पादनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

तालुक्यात कडधान्य म्हणून तूर पीक घेतले जाते. कमी खर्चात, कमी पावसावर, कमी भांडवलात व माळरानावर तूर पीक येत असल्याने शेतकºयांचा हे पीक घेण्याकडे गेल्या पाच वर्षापासून कल वाढला आहे. तूर, तीळ, करडई, भुईमूग, सोयाबीन, मटकी ही गळीत व कडधान्य पिके घेतात. यंदा पाऊस पडेल, या आशेवर ५ हजार ३२ हेक्टर क्षेत्रावर तूर लागवड करण्यात आली आहे. पण परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने पाण्याअभावी पिके वाळू लागली आहेत. पावसाअभावी प्रतिकूल हवामानामुळे फूलगळही झाली आहे. यामुळे तुरीच्या उत्पादनात ८० टक्के घट होणार आहे.

तालुक्यातील पहिल्या पावसावर शेतकºयांनी तुरीची पेरणी केली होती. हवामान खात्याने चांगला पाऊस पडेल असे सांगितले होते. पण पाऊस कमी झाल्याने अपेक्षित वाढ झाली नाही.सरकार सवलत का देत नाही?तुरीची आधारभूत किंमत क्विंटलला ५४५० रुपये आहे. कर्नाटक सरकार शेतकºयांना क्विंटलला ५०० रुपये अनुदान देते, तर राज्य शासन तुरीला का अनुदान देत नाही. कर्नाटकात ५९५० रुपये क्विंटल दराने सरकार तूर खरेदी करते. गावातील सेवा सोसायटीला खरेदी करण्याचे अधिकार दिलेले आहेत. तर मग आमचे शासन शेतकºयांना सवलत का देत नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

तूर उत्पादक शेतकºयाची आत्महत्यातालुक्यात प्रथमच उटगी येथील लायाप्पा रायगोंडा इंचूरया शेतकºयाने तुरीचे उत्पादन कमी आल्याने आत्महत्या केली आहे. त्यांना दोन एकरातून २५ ते ३० किलो उत्पादन मिळाले.एकरी खर्चावर दृष्टिक्षेप...मशागत : २१०० रुपये, पेरणी : ५०० रुपयेबियाणे : ५०० रुपये, दोन वेळा कोळपणी : १००० रुपयेचार फवारण्या : १६०० रुपये, काढणी : २००० रुपये

तूर पेरणी क्षेत्र...गेल्यावर्षी झालेली पेरणी : ७ हजार १०० हेक्टरयावर्षी झालेली पेरणी : ५ हजार ३२ हेक्टर 

तीन एकर तूर पेरणी केली आहे. पाऊस नसल्याने अपेक्षित उत्पन्न नाही. सध्या तूर वाळू लागली आहे. काहीच उत्पादन मिळणार नसल्याने घातलेला खर्च मिळणेही मुश्किल झाले आहे. तुरीच्या उत्पादनातही घट येणार असल्यामुळे शेतकºयांना लाखो रुपयांचा फटका बसणार आहे. शासनाने मदत करावी.- प्रशांत जामगोंड, तूर उत्पादक

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस