शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

जत तालुक्यात मातृभाषा मराठी, शिक्षण मात्र कानडीत! : मातृभाषेमधून शिक्षण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 20:26 IST

राज्य सरकारच्या कार्यालयातील इंग्रजीचा वापर बंद करून राजभाषा मराठीचा वापर करण्यात यावा, सर्व पत्रव्यवहार आणि कामकाज मराठीतूनच करण्यात यावे, असा आदेश राज्य सरकारने काढला आहे.

ठळक मुद्देआठ गावे ७४ वाड्या-वस्त्या वंचित

गजानन पाटील :संख : राज्य सरकारच्या कार्यालयातील इंग्रजीचा वापर बंद करून राजभाषा मराठीचा वापर करण्यात यावा, सर्व पत्रव्यवहार आणि कामकाज मराठीतूनच करण्यात यावे, असा आदेश राज्य सरकारने काढला आहे. मात्र दुसऱ्या बाजूला जत तालुक्यात कर्नाटक सीमावर्ती भागात मराठी माध्यमाच्या शाळाच नसल्याने मराठी भाषिकांना कन्नड शिकावे लागत आहे. तालुक्यातील ८ गावे, ७४ वाड्या-वस्त्यांवर प्राथमिक मराठी शाळाच नाहीत. २१ सीमावर्ती गावातील मराठी माध्यमांच्या शाळांना मंजुरी मिळूनसुद्धा त्या लालफितीत अडकून पडल्या आहेत.महाराष्टÑ राजभाषा अधिनियम १९६४ नुसार मंत्रालयीन विभाग व त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व विभागात मराठी अनिवार्य केले आहे. राज्य सरकारच्या प्रत्येक विभागात मराठी भाषेचा वापर होतो की नाही, याची पाहणी करण्यासाठी दक्षता अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहे. मात्र दुसºया बाजूला तालुक्यातील ८ गावे, ७४ वाड्या-वस्त्यांवर मराठी माध्यमांच्या शाळाच नाहीत. कन्नड माध्यमाच्या शाळा आहेत. ही गावे कन्नडबहुल असली तरी, त्या ठिकाणी मराठी भाषिकही आहेत. त्यांच्या मुलांना मराठीतून शिकण्यासाठी शाळाच नाहीत. मराठी शाळांबाबत तत्कालीन आ. प्रकाश शेंडगे यांनी २०१२ ला विधिमंडळात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर १ सप्टेंबर २०१२ रोजी राज्यातील सीमाभागातील १०१ गावे, वस्त्यांवर मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळा सुरू करण्यास मान्यता दिली. त्यामध्ये ८ गावे आणि ७४ वाड्या-वस्त्यांचा समावेश आहे. सीमावर्ती भागात सातवीपर्यंत शाळा असणाºया गावात माध्यमिक शाळा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. शासनाने प्रस्तावही मागवून घेतले; पण त्याची मंजुरी रखडली आहे.सीमावर्ती भागातील २१ गावांत मराठी माध्यमाच्या चौथी व सातवीपर्यंत प्राथमिक शाळा आहेत. यापैकी १३ गावात कन्नड माध्यमाची माध्यमिक शाळा आहे. मात्र मराठी माध्यमाची शाळा नाही. मुलांच्या शिक्षणाची सोय पाच-सहा किलोमीटर दूरवरच्या शाळेत, आश्रमशाळेत अथवा पै-पाहुण्यांकडे करावी लागते. मात्र मुलींच्या शिक्षणाचा खरा प्रश्न आहे. सातवीनंतर बहुसंख्य मुलींचे शिक्षण थांबते. मराठी भाषिक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची परवड थांबवण्यासाठी माध्यमिक शाळांची गरज आहे.जिल्हा परिषदेमार्फत प्राथमिक शाळा सुरू करण्यास मान्यता दिली. शाळा सुरू होणार म्हटल्यावर कन्नड शाळांचा पट कमी होण्याची भीती स्थानिक नेत्यांना आहे. त्यांच्या खासगी शाळा कार्यरत आहेत. त्यामुळे येथे मराठी शाळांची गरज नाही. पुरेशी पटसंख्या नाही. मराठी शाळा सुरू करण्यासाठी ग्रामशिक्षण समित्यांचे ठरावच येऊ शकले नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या प्रयत्नांना यश आले नाही.चौकट२१ गावांतील मराठी शाळांची मंजुरी लालफितीततालुक्यातील वज्रवाड, सिद्धनाथ, धुळकरवाडी, सिंदूर, गुगवाड, खोजानवाडी, तिकोंडी, भिवर्गी, जाडरबोबलाद, सुसलाद, तिल्याळ, सोनलगी, खंडनाळ, येळदरी, पांडोझरी, दरीकोणूर, साळमळगेवाडी, मोटेवाडी (आसंगी तुर्क), हळ्ळी, पांढरेवाडी, करेवाडी (कोंत्यावबोबलाद) या २१ गावांत मराठी माध्यमाच्या माध्यमिक शाळांसाठी २००८ मध्ये शासनाला प्रस्ताव गेलेले आहेत. ते मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.चौकटआठ गावांत प्राथमिक मराठी शाळाच नाहीतकागनरी, अंकलगी, मोरबगी, अक्कळवाडी, बेळोंडगी, बालगाव, करजगी, माणिकनाळ या गावांत प्राथमिक मराठी शाळाच नाहीत. मराठी भाषिक मुलांना कन्नडमध्ये नाईलाजाने शिक्षण घ्यावे लागत आहे. ‘घरात मराठी बोलायचे, शिक्षण मात्र कन्नड’ अशी चिमुकल्यांची स्थिती आहे.

 

टॅग्स :Karnatakकर्नाटकeducationशैक्षणिक