शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

जत तालुक्यात मातृभाषा मराठी, शिक्षण मात्र कानडीत! : मातृभाषेमधून शिक्षण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 20:26 IST

राज्य सरकारच्या कार्यालयातील इंग्रजीचा वापर बंद करून राजभाषा मराठीचा वापर करण्यात यावा, सर्व पत्रव्यवहार आणि कामकाज मराठीतूनच करण्यात यावे, असा आदेश राज्य सरकारने काढला आहे.

ठळक मुद्देआठ गावे ७४ वाड्या-वस्त्या वंचित

गजानन पाटील :संख : राज्य सरकारच्या कार्यालयातील इंग्रजीचा वापर बंद करून राजभाषा मराठीचा वापर करण्यात यावा, सर्व पत्रव्यवहार आणि कामकाज मराठीतूनच करण्यात यावे, असा आदेश राज्य सरकारने काढला आहे. मात्र दुसऱ्या बाजूला जत तालुक्यात कर्नाटक सीमावर्ती भागात मराठी माध्यमाच्या शाळाच नसल्याने मराठी भाषिकांना कन्नड शिकावे लागत आहे. तालुक्यातील ८ गावे, ७४ वाड्या-वस्त्यांवर प्राथमिक मराठी शाळाच नाहीत. २१ सीमावर्ती गावातील मराठी माध्यमांच्या शाळांना मंजुरी मिळूनसुद्धा त्या लालफितीत अडकून पडल्या आहेत.महाराष्टÑ राजभाषा अधिनियम १९६४ नुसार मंत्रालयीन विभाग व त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व विभागात मराठी अनिवार्य केले आहे. राज्य सरकारच्या प्रत्येक विभागात मराठी भाषेचा वापर होतो की नाही, याची पाहणी करण्यासाठी दक्षता अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहे. मात्र दुसºया बाजूला तालुक्यातील ८ गावे, ७४ वाड्या-वस्त्यांवर मराठी माध्यमांच्या शाळाच नाहीत. कन्नड माध्यमाच्या शाळा आहेत. ही गावे कन्नडबहुल असली तरी, त्या ठिकाणी मराठी भाषिकही आहेत. त्यांच्या मुलांना मराठीतून शिकण्यासाठी शाळाच नाहीत. मराठी शाळांबाबत तत्कालीन आ. प्रकाश शेंडगे यांनी २०१२ ला विधिमंडळात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर १ सप्टेंबर २०१२ रोजी राज्यातील सीमाभागातील १०१ गावे, वस्त्यांवर मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळा सुरू करण्यास मान्यता दिली. त्यामध्ये ८ गावे आणि ७४ वाड्या-वस्त्यांचा समावेश आहे. सीमावर्ती भागात सातवीपर्यंत शाळा असणाºया गावात माध्यमिक शाळा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. शासनाने प्रस्तावही मागवून घेतले; पण त्याची मंजुरी रखडली आहे.सीमावर्ती भागातील २१ गावांत मराठी माध्यमाच्या चौथी व सातवीपर्यंत प्राथमिक शाळा आहेत. यापैकी १३ गावात कन्नड माध्यमाची माध्यमिक शाळा आहे. मात्र मराठी माध्यमाची शाळा नाही. मुलांच्या शिक्षणाची सोय पाच-सहा किलोमीटर दूरवरच्या शाळेत, आश्रमशाळेत अथवा पै-पाहुण्यांकडे करावी लागते. मात्र मुलींच्या शिक्षणाचा खरा प्रश्न आहे. सातवीनंतर बहुसंख्य मुलींचे शिक्षण थांबते. मराठी भाषिक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची परवड थांबवण्यासाठी माध्यमिक शाळांची गरज आहे.जिल्हा परिषदेमार्फत प्राथमिक शाळा सुरू करण्यास मान्यता दिली. शाळा सुरू होणार म्हटल्यावर कन्नड शाळांचा पट कमी होण्याची भीती स्थानिक नेत्यांना आहे. त्यांच्या खासगी शाळा कार्यरत आहेत. त्यामुळे येथे मराठी शाळांची गरज नाही. पुरेशी पटसंख्या नाही. मराठी शाळा सुरू करण्यासाठी ग्रामशिक्षण समित्यांचे ठरावच येऊ शकले नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या प्रयत्नांना यश आले नाही.चौकट२१ गावांतील मराठी शाळांची मंजुरी लालफितीततालुक्यातील वज्रवाड, सिद्धनाथ, धुळकरवाडी, सिंदूर, गुगवाड, खोजानवाडी, तिकोंडी, भिवर्गी, जाडरबोबलाद, सुसलाद, तिल्याळ, सोनलगी, खंडनाळ, येळदरी, पांडोझरी, दरीकोणूर, साळमळगेवाडी, मोटेवाडी (आसंगी तुर्क), हळ्ळी, पांढरेवाडी, करेवाडी (कोंत्यावबोबलाद) या २१ गावांत मराठी माध्यमाच्या माध्यमिक शाळांसाठी २००८ मध्ये शासनाला प्रस्ताव गेलेले आहेत. ते मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.चौकटआठ गावांत प्राथमिक मराठी शाळाच नाहीतकागनरी, अंकलगी, मोरबगी, अक्कळवाडी, बेळोंडगी, बालगाव, करजगी, माणिकनाळ या गावांत प्राथमिक मराठी शाळाच नाहीत. मराठी भाषिक मुलांना कन्नडमध्ये नाईलाजाने शिक्षण घ्यावे लागत आहे. ‘घरात मराठी बोलायचे, शिक्षण मात्र कन्नड’ अशी चिमुकल्यांची स्थिती आहे.

 

टॅग्स :Karnatakकर्नाटकeducationशैक्षणिक