शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

जत नगरपालिका त्रिशंकू, नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या शुभांगी बन्नेनवार विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 16:35 IST

जत नगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीत मतदारांनी एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत दिले नसल्यामुळे त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेस व मित्रपक्ष सात, भाजप सात आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सहा जागा मिळाल्या आहेत. अत्यंत चुरशीच्या झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या शुभांगी अशोक बन्नेनवार यांनी ७२१९ मते घेऊन भाजपच्या उमेदवार डॉ. रेणुका आरळी यांचा १२८ मतांनी पराभव केला.

ठळक मुद्देजत नगरपालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीचीकाँग्रेस ७, भाजप ७, राष्ट्रवादीला ६ जागाभविष्यातील लोकसभा, विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम

सांगली : जत नगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीत मतदारांनी एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत दिले नसल्यामुळे त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेस व मित्रपक्ष सात, भाजप सात आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सहा जागा मिळाल्या आहेत. अत्यंत चुरशीच्या झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या शुभांगी अशोक बन्नेनवार यांनी ७२१९ मते घेऊन भाजपच्या उमेदवार डॉ. रेणुका आरळी यांचा १२८ मतांनी पराभव केला.

जत नगरपालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. भाजपचे आमदार विलासराव जगताप, जतचे काँग्रेसचे नेते, जिल्हा परिषद सदस्य विक्रम सावंत, राष्ट्रवादीचे सुरेश शिंदे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.

या निवडणुकीकडे भविष्यातील लोकसभा, विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात होते. लोकनियुक्त नगराध्यक्षपदामुळे भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राजकीय शक्ती पणाला लावली होती.

रविवारी सर्वत्र सरासरी ७५.५५ टक्के मतदान झाले होते. सोमवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासूनच काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शुभांगी बन्नेनवार आणि भाजपच्या डॉ. रेणुका आरळी यांच्यात चुरस निर्माण झाली होती.

शुभांगी बन्नेनवार यांनी तिसऱ्या फेरीपासून आघाडी घेत ती शेवटच्या फेरीपर्यंत कायम ठेवली. शेवटच्या फेरीमध्ये त्यांनी भाजपच्या डॉ. रेणुका आरळी यांचा १२८ मतांनी पराभव करून विजय खेचून आणला. रेणुका आरळी यांना ७०४१, राष्ट्रवादीच्या शबाना इनामदार यांना ३८६१, शिवसेनेच्या शांताबाई राठोड यांना २४६ मते मिळाली.

जत नगरपालिकेतील एकूण २० जागांसाठी मतदान झाले होते. यापैकी काँग्रेसने मित्र पक्षासह सात जागांवर विजय मिळविला. पण, बहुमताची संख्या त्यांना गाठता आली नाही. तरीही नगराध्यक्षांसह आठ जागांवर विजय मिळविल्यामुळे कार्यकर्त्यांनी फटाक्याची आताषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला.

काँग्रेसचे विजयी उमेदवार आणि कंसात त्यांना पडलेली मते.संतोष कोळी (१०५८), गायत्रीदेवी शिंदे (७०१), अश्विनी माळी (९९५), इकबाल गवंडी (१०५३), नामदेव काळे (१०८८), कोमल शिंदे (७३०) या सहा जागांबरोबरच त्यांचा मित्र पक्ष असलेल्या बसपला एक जागा मिळाली आहे. संतोष कांबळे (११६६) यांनी विजय मिळवून बसपचे जतमध्ये खाते उघडले आहे.भाजपच्या नेत्यांनी जत नगरपालिकेवर भगवा फडकविण्यासाठी खूप प्रयत्न केले. मंत्र्यांच्या सभांसह जिल्ह्यातील आमदार, खासदारांच्याही सभा झाल्या होत्या. तरीही नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. रेणुका आरळी यांना १२८ मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले. 

भाजपचे सात नगरसेवक विजयी झाले. यामध्ये प्रमोद हिरवे (६३३), दीप्ती सावंत (९७२), श्रीदेवी सगरे (१०३३), जयश्री शिंदे (८८६), विजय ताड (८६८), प्रकाश माने (३९९), जयश्री मोटे (७८०) यांचा समावेश आहे. भाजपला पराभवाला सामोरे जावे लागल्यामुळे आमदार विलासराव जगताप यांनाही मोठा धक्का बसला आहे.राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार- वनिता साळे (८७१), आप्पासाहेब पवार (९५२), बाळाबाई मळगे (५८८), स्वप्नील शिंदे (६४७), भारती जाधव (८७६), लक्ष्मण एडके (९२१) यांचा समावेश आहे. या निकालाने जत शहरावरील सुरेश शिंदे यांच्या वर्चस्वाला धक्का पोहोचला आह. 

टॅग्स :SangliसांगलीElectionनिवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेस