शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

जैन संघटनेमार्फत जिल्हयातील १२३ गावे पाणीदार : सुरेश पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 20:41 IST

सांगली : भारतीय जैन संघटना आणि पानी फाऊंडेशन यांच्यामार्फत महाराष्ट्रातील ७५ तालुक्यातील दीड हजार गावांमध्ये श्रमदान आणि यंत्रांच्या साहाय्याने तब्बल ५ हजार १०० कोटी लिटर पाणी साठवण क्षमता वाढविण्याचा

सांगली : भारतीय जैन संघटना आणि पानी फाऊंडेशन यांच्यामार्फत महाराष्ट्रातील ७५ तालुक्यातील दीड हजार गावांमध्ये श्रमदान आणि यंत्रांच्या साहाय्याने तब्बल ५ हजार १०० कोटी लिटर पाणी साठवण क्षमता वाढविण्याचा विक्रम केला आहे. सांगली जिल्'ातील १२३ गावात ३५० कोटी लिटर पाणीसाठा तयार झाला आहे, अशी माहिती दुष्काळमुक्त अभियानाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख व माजी महापौर सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले की, जैन संघटनेने शांतिलाल मुथा आणि पानी फौंडेशनचे संस्थापक अभिनेते आमीर खान यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविले. राज्यातील दीड हजार गावांमध्ये एकूण १,६२४ यंंत्रांचा वापर करण्यात आला. स्पर्धा २२ मे रोजी संपली आहे. त्यावेळी तीनशेहून अधिक गावांना श्रमदान करुन यंत्रेही मिळू शकली नाहीत. जैन संघटनेने अशा गावांना यंत्रे पुरवून प्रोत्साहित केले. यासाठी कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेश, झारखंड, गुजरात या राज्यातूनही यंत्रे पुरवण्यात आली.

संघटनेने यंत्रे जरी पुरवली असली तरी, यात श्रमदान करणारे नागरिक, नागरिकांच्या गावाच्या पाठीशी असणारे शासन, स्थानिक जिल्हा प्रशासन यांच्यामुळे हे अभियान यशस्वी होत आहे. शासनाने प्रत्येक गावाला दीड लाख रुपये डिझेलसाठी मंजूर केले. श्रमदान करणाऱ्या गावाला हे अनुदान मिळाले आहे.

गेल्या सहा-सात वर्षांपासून महाराष्ट्राला दुष्काळाने घेरले आहे. दरवर्षी हजारो टँकरने पाणीपुरवठा केला जातो, जनावरांसाठी चारा छावण्या निर्माण कराव्या लागल्या. या दुष्काळी स्थितीला सामोरे जाण्यासाठी जैन संघटना आणि पानी फौंडेशन यांनी मिळून दुष्काळमुक्त अभियान राबवले. या अभियानाअंतर्गत सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर जिल्हयात मोठे काम झाले आहे. सातारा, सोलापूर आणि सांगली हे कामाच्याबाबतीत राज्यात अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय स्थानावर आहेत. २ लाख ९८ हजार तास यंत्राच्या माध्यमातून १८० लाख घनमीटर काम करण्यात आले. सांगली जिल्ह्यात ५८ हजार ५६० तास यंत्राचे काम झाले आहे. यातून ३५लाख घनमीटर काम व साडेतीनशे कोटी लिटर पाणीसाठा तयार झाला आहे. यावेळी अभियानाचे समन्वयक राजगोंडा पाटील उपस्थित होते.

जिल्हयात मदतीची अपेक्षासातारा जिल्हयात ज्यापद्धतीने शरद पवारांच्या प्रयत्नामुळे विविध बॅँका व संस्थांकडून या चळवळीला मदत झाली, तेवढी मदत सांगली जिल्ह्यातून झाली नाही, असे पाटील म्हणाले.

 

टॅग्स :WaterपाणीSangliसांगली