शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

जैन संघटनेमार्फत जिल्हयातील १२३ गावे पाणीदार : सुरेश पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 20:41 IST

सांगली : भारतीय जैन संघटना आणि पानी फाऊंडेशन यांच्यामार्फत महाराष्ट्रातील ७५ तालुक्यातील दीड हजार गावांमध्ये श्रमदान आणि यंत्रांच्या साहाय्याने तब्बल ५ हजार १०० कोटी लिटर पाणी साठवण क्षमता वाढविण्याचा

सांगली : भारतीय जैन संघटना आणि पानी फाऊंडेशन यांच्यामार्फत महाराष्ट्रातील ७५ तालुक्यातील दीड हजार गावांमध्ये श्रमदान आणि यंत्रांच्या साहाय्याने तब्बल ५ हजार १०० कोटी लिटर पाणी साठवण क्षमता वाढविण्याचा विक्रम केला आहे. सांगली जिल्'ातील १२३ गावात ३५० कोटी लिटर पाणीसाठा तयार झाला आहे, अशी माहिती दुष्काळमुक्त अभियानाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख व माजी महापौर सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले की, जैन संघटनेने शांतिलाल मुथा आणि पानी फौंडेशनचे संस्थापक अभिनेते आमीर खान यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविले. राज्यातील दीड हजार गावांमध्ये एकूण १,६२४ यंंत्रांचा वापर करण्यात आला. स्पर्धा २२ मे रोजी संपली आहे. त्यावेळी तीनशेहून अधिक गावांना श्रमदान करुन यंत्रेही मिळू शकली नाहीत. जैन संघटनेने अशा गावांना यंत्रे पुरवून प्रोत्साहित केले. यासाठी कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेश, झारखंड, गुजरात या राज्यातूनही यंत्रे पुरवण्यात आली.

संघटनेने यंत्रे जरी पुरवली असली तरी, यात श्रमदान करणारे नागरिक, नागरिकांच्या गावाच्या पाठीशी असणारे शासन, स्थानिक जिल्हा प्रशासन यांच्यामुळे हे अभियान यशस्वी होत आहे. शासनाने प्रत्येक गावाला दीड लाख रुपये डिझेलसाठी मंजूर केले. श्रमदान करणाऱ्या गावाला हे अनुदान मिळाले आहे.

गेल्या सहा-सात वर्षांपासून महाराष्ट्राला दुष्काळाने घेरले आहे. दरवर्षी हजारो टँकरने पाणीपुरवठा केला जातो, जनावरांसाठी चारा छावण्या निर्माण कराव्या लागल्या. या दुष्काळी स्थितीला सामोरे जाण्यासाठी जैन संघटना आणि पानी फौंडेशन यांनी मिळून दुष्काळमुक्त अभियान राबवले. या अभियानाअंतर्गत सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर जिल्हयात मोठे काम झाले आहे. सातारा, सोलापूर आणि सांगली हे कामाच्याबाबतीत राज्यात अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय स्थानावर आहेत. २ लाख ९८ हजार तास यंत्राच्या माध्यमातून १८० लाख घनमीटर काम करण्यात आले. सांगली जिल्ह्यात ५८ हजार ५६० तास यंत्राचे काम झाले आहे. यातून ३५लाख घनमीटर काम व साडेतीनशे कोटी लिटर पाणीसाठा तयार झाला आहे. यावेळी अभियानाचे समन्वयक राजगोंडा पाटील उपस्थित होते.

जिल्हयात मदतीची अपेक्षासातारा जिल्हयात ज्यापद्धतीने शरद पवारांच्या प्रयत्नामुळे विविध बॅँका व संस्थांकडून या चळवळीला मदत झाली, तेवढी मदत सांगली जिल्ह्यातून झाली नाही, असे पाटील म्हणाले.

 

टॅग्स :WaterपाणीSangliसांगली