शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
6
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
7
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
8
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
10
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
11
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
12
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
13
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
14
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
15
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
16
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
17
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
18
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
19
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
20
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...

जैन संघटनेमार्फत जिल्हयातील १२३ गावे पाणीदार : सुरेश पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 20:41 IST

सांगली : भारतीय जैन संघटना आणि पानी फाऊंडेशन यांच्यामार्फत महाराष्ट्रातील ७५ तालुक्यातील दीड हजार गावांमध्ये श्रमदान आणि यंत्रांच्या साहाय्याने तब्बल ५ हजार १०० कोटी लिटर पाणी साठवण क्षमता वाढविण्याचा

सांगली : भारतीय जैन संघटना आणि पानी फाऊंडेशन यांच्यामार्फत महाराष्ट्रातील ७५ तालुक्यातील दीड हजार गावांमध्ये श्रमदान आणि यंत्रांच्या साहाय्याने तब्बल ५ हजार १०० कोटी लिटर पाणी साठवण क्षमता वाढविण्याचा विक्रम केला आहे. सांगली जिल्'ातील १२३ गावात ३५० कोटी लिटर पाणीसाठा तयार झाला आहे, अशी माहिती दुष्काळमुक्त अभियानाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख व माजी महापौर सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले की, जैन संघटनेने शांतिलाल मुथा आणि पानी फौंडेशनचे संस्थापक अभिनेते आमीर खान यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविले. राज्यातील दीड हजार गावांमध्ये एकूण १,६२४ यंंत्रांचा वापर करण्यात आला. स्पर्धा २२ मे रोजी संपली आहे. त्यावेळी तीनशेहून अधिक गावांना श्रमदान करुन यंत्रेही मिळू शकली नाहीत. जैन संघटनेने अशा गावांना यंत्रे पुरवून प्रोत्साहित केले. यासाठी कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेश, झारखंड, गुजरात या राज्यातूनही यंत्रे पुरवण्यात आली.

संघटनेने यंत्रे जरी पुरवली असली तरी, यात श्रमदान करणारे नागरिक, नागरिकांच्या गावाच्या पाठीशी असणारे शासन, स्थानिक जिल्हा प्रशासन यांच्यामुळे हे अभियान यशस्वी होत आहे. शासनाने प्रत्येक गावाला दीड लाख रुपये डिझेलसाठी मंजूर केले. श्रमदान करणाऱ्या गावाला हे अनुदान मिळाले आहे.

गेल्या सहा-सात वर्षांपासून महाराष्ट्राला दुष्काळाने घेरले आहे. दरवर्षी हजारो टँकरने पाणीपुरवठा केला जातो, जनावरांसाठी चारा छावण्या निर्माण कराव्या लागल्या. या दुष्काळी स्थितीला सामोरे जाण्यासाठी जैन संघटना आणि पानी फौंडेशन यांनी मिळून दुष्काळमुक्त अभियान राबवले. या अभियानाअंतर्गत सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर जिल्हयात मोठे काम झाले आहे. सातारा, सोलापूर आणि सांगली हे कामाच्याबाबतीत राज्यात अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय स्थानावर आहेत. २ लाख ९८ हजार तास यंत्राच्या माध्यमातून १८० लाख घनमीटर काम करण्यात आले. सांगली जिल्ह्यात ५८ हजार ५६० तास यंत्राचे काम झाले आहे. यातून ३५लाख घनमीटर काम व साडेतीनशे कोटी लिटर पाणीसाठा तयार झाला आहे. यावेळी अभियानाचे समन्वयक राजगोंडा पाटील उपस्थित होते.

जिल्हयात मदतीची अपेक्षासातारा जिल्हयात ज्यापद्धतीने शरद पवारांच्या प्रयत्नामुळे विविध बॅँका व संस्थांकडून या चळवळीला मदत झाली, तेवढी मदत सांगली जिल्ह्यातून झाली नाही, असे पाटील म्हणाले.

 

टॅग्स :WaterपाणीSangliसांगली