शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

सांगलीत १ टक्काही उद्योग सुरू होणे मुश्कील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 17:03 IST

हा मालही अन्य जिल्ह्यात, राज्यात, परदेशात जात असतो. याशिवाय कामगारांच्या उपलब्धतेचा प्रश्नही मोठा आहे. त्यामुळे अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना येथील उद्योजकांना करावा लागतो. स्थानिक पातळीवर माल तयार करून तो स्थानिक बाजारपेठेत विक्री करणाºया उद्योगांची संख्या एक टक्काच आहे. त्यांनाही कामगारांच्या अडचणीस तोंड द्यावे लागणार आहे.

अविनाश कोळी ।सांगली : जिल्हानिहाय परिस्थितीचा आढावा घेऊन काही प्रमाणात लॉकडाऊन शिथिल होण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. सांगली जिल्ह्यातील परिस्थितीचा विचार केला तर, शिथिलता मिळाल्यानंतरही येथील एक टक्काही उद्योग सुरू होणे मुश्किल आहे. कच्च्या मालाची आयात आणि उत्पादित मालाची निर्यात तसेच कामगारांचा प्रश्न अडचणीचा बनला आहे.

काही जिल्ह्यांमध्ये परिस्थितीनुसार निर्बंध कमी करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केल्यानंतर सांगली जिल्ह्यातील उद्योजकांमध्ये याविषयीच्या अडचणींची चर्चा सुरू झाली आहे. सांगली जिल्ह्यातील उद्योगांसमोर देशातील लॉकडाऊन हटेपर्यंत अनेक अडचणी निर्माण होणार आहे. सांगली, मिरज, कुपवाड या शहरी भागात तीन मोठ्या औद्योगिक वसाहती आहेत. याठिकाणी सुमारे १ हजार २०० कारखाने आहेत.

मोठ्या उद्योगांवर अवलंबून असलेल्या छोट्या उद्योगांनीही या वसाहती भरल्या आहेत. अ‍ॅटोमोबाईल उद्योगांसाठी लागणाºया स्पेअर पार्टस्चे कारखाने, फाऊंड्री (धातू वितळविणारे कारखाने), यंत्रमाग, फूड इंडस्ट्री, सिमेंट आर्टिकल्स, अ‍ॅनिमल फूड अशाप्रकारचे उद्योग याठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहेत. या उद्योगांना लागणारा कच्चा माल हा राजस्थान, पंजाब, कोलकाता, सूरत, लुधियाना, रायपूर, चेन्नई, मुंबई येथून येत असतो. आता कच्च्या मालाची उपलब्धता नाही. तयार केलेल्या मालाला पुन्हा बाजारपेठेचा प्रश्न येणार आहे.

हा मालही अन्य जिल्ह्यात, राज्यात, परदेशात जात असतो. याशिवाय कामगारांच्या उपलब्धतेचा प्रश्नही मोठा आहे. त्यामुळे अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना येथील उद्योजकांना करावा लागतो. स्थानिक पातळीवर माल तयार करून तो स्थानिक बाजारपेठेत विक्री करणाºया उद्योगांची संख्या एक टक्काच आहे. त्यांनाही कामगारांच्या अडचणीस तोंड द्यावे लागणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस