शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूरच्या नगराध्यक्षांकडून मुख्यमंत्र्यांची दिशाभूल, कोणती विकास कामे केली? याचा हिशेब द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 17:16 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इस्लामपूर येथे केलेले विधान त्यांना इस्लामपूरच्या नगराध्यक्षांनी दिलेल्या चुकीच्या माहितीवरुन केलेले आहे. जर तुम्ही इस्लामपूर शहराच्या विकासासाठी १०७ कोटींचा निधी आणला असेल, तर त्यातून आपण कोणती विकास कामे केली? याचा हिशेब नगराध्यक्षांनी इस्लामपूरच्या जनतेला द्यावा, असे आवाहन इस्लामपूरचे उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष, नगरसेवक शहाजी पाटील यांनी केले.

ठळक मुद्देकोणती विकास कामे केली? याचा हिशेब नगराध्यक्षांनी इस्लामपूरच्या जनतेला द्यावाउपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, शहाजी पाटील यांनी केले आवाहन

इस्लामपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इस्लामपूर येथे केलेले विधान त्यांना इस्लामपूरच्या नगराध्यक्षांनी दिलेल्या चुकीच्या माहितीवरुन केलेले आहे. जर तुम्ही इस्लामपूर शहराच्या विकासासाठी १०७ कोटींचा निधी आणला असेल, तर त्यातून आपण कोणती विकास कामे केली? याचा हिशेब नगराध्यक्षांनी इस्लामपूरच्या जनतेला द्यावा, असे आवाहन इस्लामपूरचे उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष, नगरसेवक शहाजी पाटील यांनी केले.याचवेळी त्यांनी कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी वाळवा तालुक्यातील जनतेला गुलाम म्हणून वाळवा तालुक्यातील जनतेचा अपमान केला आहे. त्यांनी तालुक्यातील जनतेची जाहीर माफी मागायला पाहिजे, अशी मागणीही केली.

इस्लामपूर येथील जिल्हा कृषी महोत्सव व दख्खन जत्रा उदघाटन समारंभात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही सत्ता असताना इस्लामपूर शहराच्या विकासासाठी ३१ वर्षांत ११५ कोटी आणले, मात्र आम्ही ११ महिन्यांत १०७ कोटी दिले असून, पाणी पुरवठा योजनेसाठी २५ कोटी देणार आहोत, असे जाहीर केले.

राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आम्ही वाळवा तालुक्यातील जनतेची गुलामगिरीतून सुटका केल्याचे विधान केले आहे. या विधानांवर पाटील द्वयींनी जोरदार आक्षेप घेतला. पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान राजकीय, तर सदाभाऊ खोत यांचे विधान दुदैवी आहे.राज्याचे माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी इस्लामपूर शहर व वाळवा तालुक्याला आपले कुटुंब समजून हे शहर व तालुक्याचा सर्वांगीण विकास केलेला आहे.

हे या शहरातील व तालुक्यातील जनता चांगलेच जाणते. त्यांनी आणलेल्या निधीतून पाणी पुरवठ्याची योजना, ४-५ लहान मोठे बगीचे, २ नाट्यगृहे, रस्ते, गटारी तसेच २ प्रशासकीय इमारती, न्यायालय, पोलीस स्टेशन, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अशी किती तरी विकासकामे या शहरात उभा राहिलेली दिसतात. मात्र त्यांनी ही कामे करताना कधी डांगोरा पिटला नाही.

काहीवेळा गानकोकिळा लता मंगेशकर, तत्कालीन खासदार पी. अलेक्झांडर तसेच अनेक आमदार, खासदारांकडून निधी उपलब्ध केला आहे. आपण आणलेल्या १०७ कोटींच्या निधीतून कोणती विकास कामे केली? या निधीचे काय केले? हे जनतेला सांगावे लागेल.

गेल्या ११ महिन्यांत राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून दि. २७ नोव्हेंबर २०१७ रोजी फक्त २ कोटी मंजूर झाले आहेत. राज्य शासनाने राज्यातील नगरपरिषदांना ३१० कोटी ४२ लाखांचा निधी मंजूर केला. त्याचा एक भाग म्हणून इस्लामपूरला हा निधी मिळाला आहे. त्यात आपले कर्तृत्व काय? ही मंडळी धादांत खोटे बोलून जनतेची दिशाभूल करीत आहेत.

टॅग्स :Devendra Fadnvisदेवेंद्र फडणवीसSangliसांगलीPoliticsराजकारण