शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

राष्ट्रवादीच्या उभारीसाठी इस्लामपूरमध्ये खलबते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 3:21 PM

अशोक पाटील  इस्लामपूर : राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. परंतु इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे ...

ठळक मुद्देराष्ट्रवादीच्या उभारीसाठी इस्लामपूरमध्ये खलबते इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील यांचे वलय कायम

अशोक पाटील इस्लामपूर : राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. परंतु इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांचे वलय कायम आहे. त्यामागचे गमक जाणून घेण्यासाठी आणि राष्ट्रवादीला उभारी देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि आ. पाटील, आ. जितेंद्र आव्हाड यांच्यात गुरुवारी खलबते झाली.लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यासाठी शरद पवार इस्लामपुरात आले होते. राजारामबापूप्रेमींची गर्दीने भरपावसातही सभामंडप खचाखच भरला होता, राष्ट्रवादीच्या पडझडीमध्येही जयंत पाटील यांचे वलय कायम असल्याचे पाहून शरद पवार भावूक झाले. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या भावनिक भाषणामुळे सारा सभामंडप स्तब्ध झाला. यावेळी पवार यांचेही डोळे पाणावले. त्यानंतर राष्ट्रवादीला पुन्हा उभारी देता येईल का, याबाबत पवार, आ. पाटील आणि आ. आव्हाड यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेतही इस्लामपूर मतदारसंघात आ. जयंत पाटील यांच्या वर्चस्वाला धक्का लागला नाही.

जिल्ह्यात राष्ट्रवादीला ग्रहण लागले. स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्थांमध्येही भाजपने पाय रोवले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला खीळ बसली. लोकसभा निवडणुकीत इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात आ. पाटील यांच्या विरोधकांची मोट बांधण्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना यश मिळाले. येथून काँग्रेस आघाडीचे उमेदवार राजू शेट्टी यांचा पराभव झाला असला तरी, इस्लामपूर आणि शिराळा मतदारसंघातून शेट्टी यांना चांगले मताधिक्य मिळाले आहे. शेट्टींचा पराभव लक्षात घेता आता आ. पाटील यांनी विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे.आ. जयंत पाटील यांच्याकडे भविष्यात राज्याचे नेतृत्व येईल, असे सूतोवाच राजारामबापूंच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात शरद पवार यांनी केले. पश्चिम महाराष्ट्रात चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीमधील खासदार, आमदार भाजपकडे वळवण्याचा सपाटा लावला आहे. यात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी खासदार धनंजय महाडिक यांचा समावेश आहे. राष्ट्रवादीतील ही गळती थांबविण्याची जबाबदारी आमदार पाटील यांच्यावर आली आहे. ही जबाबदारी ते कितपत पेलतात, हे येत्या दोन महिन्यांत समजणार आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणJayant Patilजयंत पाटीलSharad Pawarशरद पवारSangliसांगली