शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

शंभूराज देसाई कोयना धरणाचे मालक आहेत का?, खासदार संजय पाटील यांचा सवाल 

By अविनाश कोळी | Updated: November 25, 2023 18:34 IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली तक्रार 

सांगली : कोयना धरणातील पाणी अडविणारे साताराचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे मालक लागून गेले का, असा सवाल भाजपचे सांगलीचे खासदार संजय पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान पाण्याच्या प्रश्नासाठी प्रसंगी खासदारकीचा राजीनामा देऊ, असा इशाराही त्यांनी दिला.पाटील म्हणाले की, कोयना धरण शंभूराज यांच्या सात-बाऱ्यावर नोंदलेले नाही. त्यांनी मालकीहक्क गाजवू नये. अशा अडेलतट्टू भूमिकेचा आम्ही निषेध करीत आहोत. कोयना धरणाच्या पाण्यावरुन कधीच असा वाद इतिहासात घडला नाही. देसाईंचा या पाण्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळे जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आम्ही पाणी सोडण्याबाबत अधिकाऱ्यांना सक्त ताकीद देण्याची मागणी केली आहे. देसाई यांचे ऐकून पाणी अडविणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे, यासाठी आम्ही आग्रही राहू.सांगली जिल्ह्यातील जनतेने मला खासदार बनविले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रश्नासाठी खासदारकी पणाला लावू. सांगली जिल्ह्याच्या वाट्याला एकूण ३२ टीएमसी पाणी आहे. पुढील जून महिन्यापर्यंत टप्प्याटप्प्याने पाणी सोडणे अधिकाऱ्यांना क्रमप्राप्त आहे. त्यामुळे अशी आडकाठी यापुढे आम्ही चालू देणार नाही. पालकमंत्र्यांना पाणी अडविण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे त्यांनी अशी कृती केल्यास योग्य त्या पद्धतीने उत्तर देऊ, असा इशारा पाटील यांनी दिला.

अमित शहांकडे तक्रारपाटील म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे नेते अमित शहा यांच्याकडे देसाई यांच्याबाबत तक्रार केली आहे. तक्रारीनुसार त्यांना ताकीद दिली नाही, तर खासदारकीचा राजीनामा देऊ. टोकाची भूमिका घेण्याचीही माझी तयारी आहे. देसाई यांच्याकडून पालकमंत्रीपद काढून घेण्याची मागणीही केली आहे.

बाबर यांच्यावरही टीकाआमदार अनिल बाबर यांनी पाणी सोडण्याची मागणी करण्याची मुख्यमंत्री वाट पहात होते का, असा सवाल पाटील यांनी केला. सांगलीला पाणी सोडण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची चर्चा सुरु आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी पाण्याचे दान दिलेले नाही. हक्काच्या पाण्यासाठी अशा आदेशाची गरजच काय, असा सवालही पाटील यांनी केला.

टॅग्स :SangliसांगलीSatara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरणShambhuraj Desaiशंभूराज देसाई