शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पहलगाम हल्ल्याबद्दल प्रश्न विचारणे देशद्रोह आहे का, खासदार विशाल पाटील यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 19:34 IST

आतंकवादी हल्ल्याचं उत्तर द्या; भाजप किती दिवस नेहरू, इंदिरा गांधींचं नाव घेणार?

सांगली : पहलगाम हल्ल्याला शंभर दिवस झाले; मात्र अद्याप हल्लेखोर आतंकवाद्यांचं काय झालं कळत नाही. विरोधकांनी प्रश्न विचारला की भाजप सरकार नेहरू आणि इंदिरा गांधी यांचं नाव घेतात. काँग्रेसनं काय केलं, असं विचारलं जातं. किती दिवस हे करणार? तुमची उत्तरं देण्याची जबाबदारी आहे, त्यावर बोला, अशी आक्रमक भूमिका खासदार विशाल पाटील यांनी मंगळवारी संसदेत मांडली. तसेच ‘काय झालं, काय चुकलं?’ हे विचारणं देशद्रोह आहे का? आमच्या बहिणींचा कुंकू पुसणाऱ्यांना पकडून भारतात आणा, असं म्हणणं चुकीचं आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.पहलगाममधील आतंकवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर संदर्भातील चर्चेत त्यांनी सहभाग घेतला. विशाल पाटील म्हणाले, सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये शौर्य गाजवले. त्यांचे आम्हाला कौतुक आहे. पाकिस्तान चीनच्या मागे लपला होता. ते म्हणत राहतील, आमचं काही नुकसान झालं नाही, त्यांना म्हणू द्या. आता उत्तर द्यायला हवं की युद्धविराम का केला? ट्रम्प म्हणतात, ‘मी युद्धविराम केला.’ सरकार म्हणतं, ‘आम्ही युद्धविराम केला.’ त्यानंतरही पाकिस्तान हल्ला करत राहतं. प्रश्न आहे की, ‘युद्धविराम कुणी केला.’युक्रेन युद्ध आपण थांबवलं असेल तर मग आपल्या युद्धाबाबत आपण निर्णय का घेऊ शकलो नाही. आपल्या देशात येऊन सामान्य भारतीयांना दहशतवाद्यांनी मारलं. आपल्या गुप्तचर यंत्रणेचे हे अपयश नाही का? त्याबाबत कारवाई का झाली नाही. १०० दिवसांनंतरही आतंकवादी मिळत नाहीत, हे सरकारचे अपयश नाही का? आपण कुणाचा राजीनामा मागितला नाही, सारे सरकारच्या पाठीशी उभे राहिले. विदेशात जायला सर्व पक्षांतील लोक पुढे आले. देशाचा आवाज बुलंद केला. आता उत्तर देण्याची सरकारची वेळ आहे. ‘काय झालं, काय चुकलं?’ हे विचारणं देशद्रोह आहे का? आमच्या बहिणींचा कुंकू पुसणाऱ्यांना पकडून भारतात आणा असं म्हणणं चुकीचं आहे का?’

तरतूद वाढवाविशाल पाटील म्हणाले, सुरक्षा क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात ९.५ टक्के वाढ केली आहे. हा निधी पगार आणि निवृत्ती वेतनात खर्च होतोय. पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटी म्हणते की अर्थसंकल्पाच्या तीन टक्के खर्च सुरक्षा व्यवस्थेसाठी गरजेचा आहे. तो दोन टक्के होतोय. त्यात पन्नास टक्के वाढीची गरज आहे.