शहरं
Join us  
Trending Stories
1
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
2
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
3
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
4
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
5
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
6
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
7
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
8
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
9
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
10
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
11
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
12
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
13
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
14
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
16
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
17
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
18
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
19
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
20
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल

शेतकऱ्यांना भूमिहीन करून 'शक्तिपीठ'मधून ठेकेदारांचे हित, काँग्रेस नेत्यांचा आरोप 

By अशोक डोंबाळे | Updated: June 21, 2024 16:11 IST

शक्तिपीठ महामार्गबाधित कृती समितीच्या लढ्यास काँग्रेसचा पाठींबा

सांगली : राज्यातील १२ हजार ५८९ शेतकऱ्यांना भूमिहीन करून केवळ काही ठेकेदारांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या माथी शक्तिपीठ महामार्ग लादला जात आहे. या शक्तिपीठास आमचा तीव्र विरोध असून, शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृतीच्या लढ्यास काँग्रेसचा पाठिंबा आहे. सर्व आंदोलनात काँग्रेस सक्रिय असणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत आणि शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी शुक्रवारी सांगलीत पत्रकार परिषदेत दिली.यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, काँग्रेसच्या नेत्या आणि जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, प्रा. सिकंदर जमादार, शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीचे सतीश साखळकर, उमेश देशमुख, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर कांबळे आदी उपस्थित होते.प्रतीक पाटील म्हणाले, शक्तिपीठ महामार्गाची कुणाचीही मागणी नसताना राज्यातील १२ हजार ५८९ शेतकऱ्यांची २७ एकर जमीन जाणार आहे. या शेतकऱ्यांना भूमिहीन करून सरकारला केवळ ठेकेदारांचेच हित साधायचे आहे का? जमिनीच संपल्या तर कोट्यवधी जनतेचे पोट कसे भरणार, असा सवालही त्यांनी केला.पृथ्वीराज पाटील म्हणाले, शक्तिपीठ महामार्गामुळे सांगली जिल्ह्यातील एक हजार ४०० एकर जमीन संपादित करून पाच हजार ३७० शेतकऱ्यांना भूमिहीन व्हावे लागणार आहे. म्हणूनच शक्तिपीठ महामार्गाला कडाडून विरोध केला जात आहे. नुकतेच कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शक्तिपीठ महामार्ग कामाला स्थगिती दिल्याचे जाहीर केली आहे. पण, शेतकऱ्यांना स्थगिती नको तर महामार्गच रद्द करा, अशी काँग्रेसची मागणी आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्रासदायक ठरणाऱ्या शक्तिपीठ महामार्ग आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा दर्शविला आहे. शक्तिपीठ महामार्ग शक्तिपीठविरोधी कृती समितीसोबत काँग्रेस आंदोलनात उतरणार आहे.

अधिकारी कार्यालयास घेराव घालणार : पाटीलकाँग्रेसने पाठिंबा दिल्यामुळे शक्तिपीठ महामार्ग आंदोलनाची ताकद आणखी वाढणार आहे. शक्तिपीठ महामार्ग रद्दच करावा, या मागणीसाठी आज, शनिवारी काँग्रेसकडून जिल्हा नियोजन समिती सभेच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घातला जाणार आहे. तसेच सांगली जिल्ह्यातील आमदारांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही काँग्रेस नेत्यांनी केले आहे.

अधिवेशनात आवाज उठविणारशक्तिपीठ महामार्गामुळे अनेक शेतकऱ्यांना भूमिहीन व्हावे लागणार आहे. म्हणून शक्तिपीठ महामार्ग रद्दचा मुद्दा अधिवेशनात मांडणार आहे, असे आश्वासन आमदार विक्रमसिंह सावंत यांनी शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

टॅग्स :Sangliसांगलीhighwayमहामार्गcongressकाँग्रेस