शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

Sangli: गोटखिंडीत मशिदीमध्ये गणराय थाटात विराजमान, ४४ वर्षांचे ऐक्याचे सुवर्णपान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 19:23 IST

हिंदू-मुस्लीम बांधव साजरे करतात सर्व सणवार 

प्रतापसिंह मानेगोटखिंडी : गोटखिंडी (ता. वाळवा) गावात धर्मभेदांची दरी नाही, जाती-पाताींच्या भिंती नाहीत... अशी सुसंवादाचे वारे वाहणारे सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी गाव, गेली ४४ वर्षे एक अनोखी परंपरा जोपासत आहे. गावातील ऐतिहासिक मशिदीत दरवर्षी गणेशोत्सव उत्साहात साजरा होतो आणि ही प्रथा आज हिंदू-मुस्लीम ऐक्याचे तेजस्वी प्रतीक ठरली आहे.सन १९८१ मध्ये मुसळधार पावसामुळे गणपती प्रतिष्ठापनेसाठी निवारा न मिळाल्याने, गावातील हिंदू व मुस्लीम बांधवांनी मशिदीत पहिल्यांदाच श्री गणेशाची प्रतिमा विराजमान केली. त्या दिवशी पेरलेले सामंजस्याचे बीज आज एक भव्य वटवृक्ष बनले आहे. मिरवणुका, आरत्या, भजन-कीर्तन, रक्तदान शिबिरे आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून या गावाने महाराष्ट्रास एकात्मतेचा आदर्श घालून दिला आहे."गणपती बाप्पांच्या आगमनाने गावात केवळ धार्मिक वातावरण नव्हे, तर आनंद आणि आपुलकीचा नवा सण दरवर्षी उजाडतो," असे ज्येष्ठ नागरिक सांगतात. तर, मुस्लीम बांधवांचे म्हणणे आहे, "गणेशोत्सव आमच्यासाठीही घरचा सणच आहे. आयोजनात आम्हीही तितक्याच उत्साहाने सहभागी होतो." गोटखिंडीतील सामंजस्यपूर्ण सण साजरेपणाने ४४ वर्षांत एकदाही कुठलाही वाद निर्माण झालेला नाही. उलट येथे हिंदू-मुस्लीम बांधवांच्या घराघरांत एकमेकांचे सण तितक्याच श्रद्धेने साजरे केले जातात.

झुंझार चौकातील मशिदीत गणपती स्थापनेची परंपरा आमच्या गावासाठी अभिमानाची बाब आहे. हिंदू-मुस्लीम बंधुत्वाचे हे बीज आज एकतेच्या विशाल वटवृक्षात परावर्तित झाले आहे. गावातील प्रत्येक सण हा सर्वांसाठी असतो, हेच गोटखिंडीचे वैशिष्ट्य आहे. - दीपाली पाटील, सरपंच, गोटखिंडी