शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

निकृष्ट फळ, जेवणात आळ्या; सांगलीतील आंबेडकर वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांकडून अन्नत्याग

By अशोक डोंबाळे | Updated: October 14, 2023 18:47 IST

निकृष्ट जेवणासह ठेकेदार बदलण्याची मागणी 

सांगली : येथील विश्रामबागमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहामधील विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत आहे. ठेकेदार शासनाच्या नियमानुसार जेवण देत नाहीत. जेवणात आळ्या ही सापडत असूनही त्याकडे समाजकल्याणचे अधिकारीही लक्ष देत नाहीत. या घटनेच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी शनिवारी अन्नत्याग आंदोलन केले. दरम्यान, समाजकल्याणचे सहायक आयुक्तांच्या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.सांगलीतील विश्रामबाग येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह असून या वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. या आंदोलकांनी दिलेल्या माहितीनुसार वसतिगृहाची ७५ विद्यार्थ्यांची क्षमता आहे. सध्या वसतिगृहात ६० ते ७० विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना फळांचा निकृष्ट पुरवठा होत आहे. जेवणात आळ्या सापडत आहेत. ६० ते ७० विद्यार्थ्यांसाठी अडीच लीटर दुधाचा ठेकेदारांकडून पुरवठा होत आहे. या दुधात पाणीच जास्त असते. या समस्यांबाबत अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करुन ही त्यांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे ठेकेदार दिवसेंदिवस निकृष्ट जेवण देत आहे. म्हणून संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करुन दर्जेदार जेवण मिळावे, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केले होते. या आंदोलनानंतर लगेच समाजकल्याणचे सहायक आयुक्त चाचरकर यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन निकृष्ट जेवणाबद्दल संबंधित शक्ती महिला बचत गटावर कारवाई करण्यात येणार आहे. येत्या दहा दिवसात ठेका रद्द करण्याचे आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले. आंदोलन मागे घेऊन विद्यार्थी जेवणाला गेल्यानंतर एका विद्यार्थ्याच्या ताटात आळी सापडली. त्यानंतर वसतिगृहाच्या कर्मचाऱ्यास विद्यार्थ्यांनी जेवणातील आळ्या दाखवत कसे जेवण करायचे तुम्हीच सांगा, असा सवाल केला. यावर संबंधित कर्मचारी गप्प बसले, त्यांनी एकही शब्द काढला नाही.

दहा दिवसात ठेकेदारांवर कारवाई : जयंत चाचरकरडॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील मुलांना दर्जेदार जेवण मिळत नाहीत. याबद्दल विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर विद्यार्थ्यांना भेटून संबंधित ठेकेदारावर दहा दिवसात कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले आहे, अशी प्रतिक्रिया समाजकल्याणचे सहायक आयुक्त जयंत चाचरकर यांनी दिली.

मुलांना दर्जेदार जेवणाचा पुरवठा : संगीता पाखरेबाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील मुलांना दर्जेदार जेवण देत आहे. फळे, अंडी, भाजीपाला रोज खरेदी करुन देत आहे. मुले अचानक गैरहजर असल्यानंतर दुधाचे नुकसान होत आहे. तरीही आम्ही प्रशासनाकडे तक्रार केली नाही. काही मुले स्वयंपाक करणाऱ्या महिलांना उद्धट बोलत आहेत. त्याकडेही आम्ही दुर्लक्ष करुन मुलांना चांगले जेवण देत आहे, अशी प्रतिक्रिया शक्ती महिला बचत गटाच्या अध्यक्षा संगीता पाखरे यांनी दिली.

टॅग्स :SangliसांगलीStudentविद्यार्थीagitationआंदोलन