आधुनिक तंत्रज्ञानातून शेतीचे उत्पन्न वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:21 IST2021-01-14T04:21:18+5:302021-01-14T04:21:18+5:30
कामेरी : शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती व्हावी व युवकांच्या हाताला काम मिळावे म्हणून राजारामबापू पाटील यांनी साखर कारखाना सुरू केला. ...

आधुनिक तंत्रज्ञानातून शेतीचे उत्पन्न वाढवा
कामेरी : शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती व्हावी व युवकांच्या हाताला काम मिळावे म्हणून राजारामबापू पाटील यांनी साखर कारखाना सुरू केला. पश्चिम महाराष्ट्रातील चांगला कारखाना म्हणून त्याचा नावलौकिक आहे. आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी पाण्यात व कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मत सांगली जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे नूतन अध्यक्ष युवा नेते प्रतीक जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
कामेरी (ता. वाळवा) येथे राजारामबापू पाटील कारखान्याच्यावतीने उच्चतंत्रज्ञान गटशेती व ठिबक सिंचन योजना शेतकरी परिसंवाद व ड्रोनद्वारे औषध फवारणीचे तंत्रज्ञान मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राजारामबापू ग्रुप ऑफ कंपनीचे उपाध्यक्ष सुभाष जमदाडे यांनी गट शेतीबाबत मार्गदर्शन केले.
कामेरी येडेनिपाणी पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष रणजित पाटील यांनी प्रायोगिक तत्त्वावर विठ्ठलवाडी येथे २ वर्षांपासून सुरू असणाऱ्या गटशेतीची माहिती दिली व ऊस उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी मागणी केल्यास पाणी पुरवठा योजनेद्वारे ठिबक सिंचन व शेततळे ही संकल्पना राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी कारखाना संचालक भीमराव पाटील, भगवान पाटील, सुभाष जमदाडे, छाया पाटील, सुनील पाटील, शेती अधिकारी प्रशांत पाटील, डी. एम. पाटील, संजय पाटील, विलास बाळू माने, प्रा. अनिल पाटील, तानाजी माने उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य पोपट कुंभार यांनी स्वागत केले. रवींद्र पाटील व मारुती पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
फोटो ओळी- १३०१२०२१-आयएसएलएम- कामेरी न्यूज
कामेरी येथे उच्चतंत्रज्ञान गटशेती व ठिबक सिंचन योजना शेतकरी परिसंवादात प्रतीक जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रणजित पाटील, सुभाष जमदाडे, भीमराव पाटील, छाया पाटील, सुनील पाटील, प्रशांत पाटील उपस्थित होते.