शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

वीजनिर्मितीच्या नावाखाली कोयनेत अतिरिक्त पाणीसाठ्याचा अट्टाहास नको, अन्यथा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 14:28 IST

पश्चिम महाराष्ट्रातील महापुरांविषयी स्वतंत्र महापूर प्राधीकरण स्थापन करावे

सांगली : धरणांतील पाणीसाठ्यांविषयी केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन केले नाही, तर प्रसंगी न्यायालयात जनहीत याचिका दाखल करण्याचा इशारा कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीने दिला आहे. वीजनिर्मितीच्या अट्टाहासापोटी कोयना धरणात अतिरिक्त पाणी साठविण्याचा अट्टाहास कशासाठी असा सवालही समितीने केला आहे.समितीचे सदस्य विजयकुमार दिवाण, हणमंत पवार, प्रभाकर केंगार, संजय मोरे, प्रदीप वायचळ यांनी पत्रकार बैठकीत माहिती दिली. ते म्हणाले, धरणातील पाणीसाठ्याच्या व्यवस्थापनाचे नियम शासनाकडून पाळले जात नाहीत. ३१ मे रोजी सर्व धरणांत क्षमतेच्या १० टक्केच पाणीसाठा असावा अशी जल आयोगाची सूचना आहे. त्याकडे दुर्लक्ष करुन अतिरिक्त पाणीसाठा केला जातो.त्यामुळे सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्हे महापुरात लोटले जातात. २०१९ च्या महापुरात यामुळे ५५ हजार कोटींचे नुकसान झाल्याचे शासनाचाच अहवाल सांगतो. त्यामुळे पाणीसाठ्याविषयी कडक धोरणाची गरज आहे. ३१ मे रोजी १० टक्क्यांपेक्षा जादा पाणीसाठा ठेवल्यास प्रसंगी जनहीत याचिकेद्वारे कायदेशीर दाद मागू.पश्चिम महाराष्ट्रातील महापुरांविषयी स्वतंत्र महापूर प्राधीकरण स्थापन करावे. त्यामध्ये अशासकीय सदस्य म्हणून अभ्यासू व्यक्तींचा समावेश करावा. सर्व धरणांतील पाणीसाठ्याचे व्यवस्थापन एकात्मिक पद्धतीने व्हावे. वीजनिर्मितीसाठी पाणी साठवून ठेवण्याचा अट्टाहास धरु नये.संपूर्ण सांगली जिल्ह्याला सिंचन, असिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी ३७.५० टीएमसी पाण्याची गरज आहे. त्यापेक्षा कितीतरी अधिक पाणी जिल्ह्याकडे उपलब्ध आहे. या स्थितीत धरणांत अवास्तव पाणीसाठा करणे म्हणजे संकटाला आमंत्रण देण्यासारखे आहे.कोयनेची वीज म्हणजे सर्वस्व नव्हेदिवाण म्हणाले, कोयनेतील वीज म्हणजे सर्वस्व नाही हे लक्षात घ्यावे लागेल. कोयना धरण बांधल्यापासून वीजनिर्मितीचे अन्य अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे विजेच्या हव्यासापोटी कोयनेत अवास्तव पाणीसाठा करणे धोकादायक आहे. कोयना आणि चांदोली धरणे निर्मितीपासून  आजवर एकदाही रिकामी राहिलेली नाहीत. प्रत्येक वर्षी पुरेसा पाऊस झाला आहे, त्यामुळे ३१ मे रोजी १० टक्केच पाणीसाठा ठेवावा यासाठी समिती आग्रही आहे.

टॅग्स :SangliसांगलीKoyana Damकोयना धरणelectricityवीजfloodपूर