शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पाणी पेटण्याची चिन्हे, सांगलीतील जत तालुक्यातील परिस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 17:48 IST

विस्तारित योजनेवरून आरोप-प्रत्यारोप रंगणार

विठ्ठल ऐनापुरेजत : लोकसभा, विधानसभा निवडणुकीचा अंदाज घेत राजकीय हालचाली गतिमान होऊ लागल्या आहेत. ज्वलंत प्रश्नांना त्यानिमित्ताने फुंकर घातली जाणार आहे. जत तालुक्याचा विचार केला तर वंचित गावांच्या पाण्याचा प्रश्न यानिमित्ताने उफाळणार आहे. राजकीय रणांगणात पाणी पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.जतचे विद्यमान आमदार विक्रम सावंत यांनी कर्नाटकातील तुबची-बबलेश्वर योजनेचे पाणी आणण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला असून दुसरीकडे राष्ट्रवादी व भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांचा गट म्हैसाळच्या विस्तारित योजनेवर ठाम आहे. दोन्हीपैकी कोणत्याही योजनेचे काम सुरू नाही. विस्तारित योजनेवर मंजुरी मिळाली आहे. मात्र, अद्याप प्रत्यक्षात कामास सुरुवात नाही. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पाण्याचाच मुद्दा चर्चेत येणार आहे.निवडणुका आल्या म्हटले, की पाण्याचा मुद्दा समोर येतोच. गेल्या कित्येक वर्षांचा अनुभव याठिकाणच्या लोकांना येत आहे. यापुढेही पाण्याचा राजकारणातील श्रेयवाद, पाणी पूजनासाठीची पक्षीय चढाओढ दिसून येईल. तालुक्यात हक्काचे पाणी मिळवण्यासाठी विविध नेतेमंडळी त्यांच्या ताकदीप्रमाणे प्रयत्न करतात. पाणी आल्यास त्याचे श्रेय जाहीरपणे घेतले जाते; परंतु वेळेवर पाणी न मिळाल्यामुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची जबाबदारी कोणीच घेत नाही.

पाण्यात मुरतेय राजकारणपाण्यातच खरे राजकारण मुरतेय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांत पुन्हा एकदा तालुक्यातील या म्हैसाळ विस्तारित प्रमुख उपसा सिंचन योजनेच्या प्रश्नाभोवतीच फिरणार असून, शेतकरीच याबाबत उमेदवारांना, सामान्य लोकप्रतिनिधींना जाब विचारतील, अशी परिस्थिती आहे.

पाण्याचे नियोजन कुठे आहे ?

सांगोला तालुक्यात सरासरीच्या फक्त ५o टक्केच पाऊस झाला आहे. मोठा पाऊस न झाल्यास शेतीच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण होणार आहे. कालव्याला आलेले पाणी मिळण्यासाठी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना आंदोलने करावी लागली होती. पाणी येत असले तरी ते नियोजनाप्रमाणे येत नसून ते नेहमीच कमी दाबाने मिळते. त्यामुळे हा राजकीय डावपेच तर नाही ना, अशी शंका शेतकऱ्यांतून उपस्थित होत आहे.

श्रेयवादाची किनारम्हैसाळ पाण्यासाठी, त्याच्या नियोजनासाठी अधिकारी तसेच मंत्र्यांसोबत कशा बैठका घेतल्या, तसेच पाण्याच्या पूजनाबाबत सध्या तालुक्यात पुन्हा श्रेयवादाचे राजकारण सुरू झाले आहे. निवडणुका जशा जवळ येतील तसा पाण्याबाबतचा श्रेयवाद उफाळून येणार आहे.

टॅग्स :Sangliसांगलीjat-acजाटPoliticsराजकारणWaterपाणी