शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पाणी पेटण्याची चिन्हे, सांगलीतील जत तालुक्यातील परिस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 17:48 IST

विस्तारित योजनेवरून आरोप-प्रत्यारोप रंगणार

विठ्ठल ऐनापुरेजत : लोकसभा, विधानसभा निवडणुकीचा अंदाज घेत राजकीय हालचाली गतिमान होऊ लागल्या आहेत. ज्वलंत प्रश्नांना त्यानिमित्ताने फुंकर घातली जाणार आहे. जत तालुक्याचा विचार केला तर वंचित गावांच्या पाण्याचा प्रश्न यानिमित्ताने उफाळणार आहे. राजकीय रणांगणात पाणी पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.जतचे विद्यमान आमदार विक्रम सावंत यांनी कर्नाटकातील तुबची-बबलेश्वर योजनेचे पाणी आणण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला असून दुसरीकडे राष्ट्रवादी व भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांचा गट म्हैसाळच्या विस्तारित योजनेवर ठाम आहे. दोन्हीपैकी कोणत्याही योजनेचे काम सुरू नाही. विस्तारित योजनेवर मंजुरी मिळाली आहे. मात्र, अद्याप प्रत्यक्षात कामास सुरुवात नाही. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पाण्याचाच मुद्दा चर्चेत येणार आहे.निवडणुका आल्या म्हटले, की पाण्याचा मुद्दा समोर येतोच. गेल्या कित्येक वर्षांचा अनुभव याठिकाणच्या लोकांना येत आहे. यापुढेही पाण्याचा राजकारणातील श्रेयवाद, पाणी पूजनासाठीची पक्षीय चढाओढ दिसून येईल. तालुक्यात हक्काचे पाणी मिळवण्यासाठी विविध नेतेमंडळी त्यांच्या ताकदीप्रमाणे प्रयत्न करतात. पाणी आल्यास त्याचे श्रेय जाहीरपणे घेतले जाते; परंतु वेळेवर पाणी न मिळाल्यामुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची जबाबदारी कोणीच घेत नाही.

पाण्यात मुरतेय राजकारणपाण्यातच खरे राजकारण मुरतेय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांत पुन्हा एकदा तालुक्यातील या म्हैसाळ विस्तारित प्रमुख उपसा सिंचन योजनेच्या प्रश्नाभोवतीच फिरणार असून, शेतकरीच याबाबत उमेदवारांना, सामान्य लोकप्रतिनिधींना जाब विचारतील, अशी परिस्थिती आहे.

पाण्याचे नियोजन कुठे आहे ?

सांगोला तालुक्यात सरासरीच्या फक्त ५o टक्केच पाऊस झाला आहे. मोठा पाऊस न झाल्यास शेतीच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण होणार आहे. कालव्याला आलेले पाणी मिळण्यासाठी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना आंदोलने करावी लागली होती. पाणी येत असले तरी ते नियोजनाप्रमाणे येत नसून ते नेहमीच कमी दाबाने मिळते. त्यामुळे हा राजकीय डावपेच तर नाही ना, अशी शंका शेतकऱ्यांतून उपस्थित होत आहे.

श्रेयवादाची किनारम्हैसाळ पाण्यासाठी, त्याच्या नियोजनासाठी अधिकारी तसेच मंत्र्यांसोबत कशा बैठका घेतल्या, तसेच पाण्याच्या पूजनाबाबत सध्या तालुक्यात पुन्हा श्रेयवादाचे राजकारण सुरू झाले आहे. निवडणुका जशा जवळ येतील तसा पाण्याबाबतचा श्रेयवाद उफाळून येणार आहे.

टॅग्स :Sangliसांगलीjat-acजाटPoliticsराजकारणWaterपाणी