शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
3
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
4
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
5
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
7
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
8
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
9
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
10
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
11
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
12
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
13
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
14
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
15
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
16
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
17
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
18
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
19
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
20
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पाणी पेटण्याची चिन्हे, सांगलीतील जत तालुक्यातील परिस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 17:48 IST

विस्तारित योजनेवरून आरोप-प्रत्यारोप रंगणार

विठ्ठल ऐनापुरेजत : लोकसभा, विधानसभा निवडणुकीचा अंदाज घेत राजकीय हालचाली गतिमान होऊ लागल्या आहेत. ज्वलंत प्रश्नांना त्यानिमित्ताने फुंकर घातली जाणार आहे. जत तालुक्याचा विचार केला तर वंचित गावांच्या पाण्याचा प्रश्न यानिमित्ताने उफाळणार आहे. राजकीय रणांगणात पाणी पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.जतचे विद्यमान आमदार विक्रम सावंत यांनी कर्नाटकातील तुबची-बबलेश्वर योजनेचे पाणी आणण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला असून दुसरीकडे राष्ट्रवादी व भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांचा गट म्हैसाळच्या विस्तारित योजनेवर ठाम आहे. दोन्हीपैकी कोणत्याही योजनेचे काम सुरू नाही. विस्तारित योजनेवर मंजुरी मिळाली आहे. मात्र, अद्याप प्रत्यक्षात कामास सुरुवात नाही. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पाण्याचाच मुद्दा चर्चेत येणार आहे.निवडणुका आल्या म्हटले, की पाण्याचा मुद्दा समोर येतोच. गेल्या कित्येक वर्षांचा अनुभव याठिकाणच्या लोकांना येत आहे. यापुढेही पाण्याचा राजकारणातील श्रेयवाद, पाणी पूजनासाठीची पक्षीय चढाओढ दिसून येईल. तालुक्यात हक्काचे पाणी मिळवण्यासाठी विविध नेतेमंडळी त्यांच्या ताकदीप्रमाणे प्रयत्न करतात. पाणी आल्यास त्याचे श्रेय जाहीरपणे घेतले जाते; परंतु वेळेवर पाणी न मिळाल्यामुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची जबाबदारी कोणीच घेत नाही.

पाण्यात मुरतेय राजकारणपाण्यातच खरे राजकारण मुरतेय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांत पुन्हा एकदा तालुक्यातील या म्हैसाळ विस्तारित प्रमुख उपसा सिंचन योजनेच्या प्रश्नाभोवतीच फिरणार असून, शेतकरीच याबाबत उमेदवारांना, सामान्य लोकप्रतिनिधींना जाब विचारतील, अशी परिस्थिती आहे.

पाण्याचे नियोजन कुठे आहे ?

सांगोला तालुक्यात सरासरीच्या फक्त ५o टक्केच पाऊस झाला आहे. मोठा पाऊस न झाल्यास शेतीच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण होणार आहे. कालव्याला आलेले पाणी मिळण्यासाठी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना आंदोलने करावी लागली होती. पाणी येत असले तरी ते नियोजनाप्रमाणे येत नसून ते नेहमीच कमी दाबाने मिळते. त्यामुळे हा राजकीय डावपेच तर नाही ना, अशी शंका शेतकऱ्यांतून उपस्थित होत आहे.

श्रेयवादाची किनारम्हैसाळ पाण्यासाठी, त्याच्या नियोजनासाठी अधिकारी तसेच मंत्र्यांसोबत कशा बैठका घेतल्या, तसेच पाण्याच्या पूजनाबाबत सध्या तालुक्यात पुन्हा श्रेयवादाचे राजकारण सुरू झाले आहे. निवडणुका जशा जवळ येतील तसा पाण्याबाबतचा श्रेयवाद उफाळून येणार आहे.

टॅग्स :Sangliसांगलीjat-acजाटPoliticsराजकारणWaterपाणी