शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

इस्लामपुरातील सुधारित रस्ते म्हणजे दिवास्वप्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:18 IST

आझाद चौक ते झरी नाका या मुख्य बसस्थानक रस्त्याची झालेली दुरवस्था. अशोक पाटील लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : गेल्या ...

आझाद चौक ते झरी नाका या मुख्य बसस्थानक रस्त्याची झालेली दुरवस्था.

अशोक पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : गेल्या तीस वर्षांत तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादीने शहरातील नागरिकांना विकासाची स्वप्ने दाखविली. मात्र बहुतांशी स्वप्ने अर्ध्यावरच आहेत. सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीने तर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विकासाच्या घोषणेचे गाजर दाखविले आहे. चौकाचौकांतील मुख्य रस्त्यांची अवस्था पाहता नागरिकांना सुधारित रस्त्यांचे दिवास्वप्न ठरणार आहे. पावसाळ्याच्या तोंडावर सुरू असलेली कामे ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत.

सत्ताधारी विकास आघाडीने शहरातील सुधारित रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला असल्याचे सांगतात. रस्ते होण्याअगोदर भुयारी गटारीची कामे आजही अपूर्ण आहेत. त्यामुुळे रस्तेही केले नाहीत. जे रस्ते झाले आहेत, ते निकृष्ट झाले आहेत. चौकातील मुख्य रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. हे खड्डे बुजवून तात्पुरती डागडुजी नेहमी केली जाते. परंतु एकाच पावसात पुन्हा खड्डे निर्माण होतात. काही उपनगरातील रस्ते केले आहेत, मात्र तेही अर्धवट आहेत. प्रशासकीय इमारत ते शिराळा नाका या रस्त्याचे काम अर्ध्यावरच सोडण्यात आले आहे. याबाबत लोकप्रतिनिधींना विचारले असता पावसाळा सुरू झाल्याने काम बंद आहे, असे सांगण्यात आले. त्यामुळे नागरिकांना हाल सोसावे लागणार आहेत. या परिसरातील विशालनगर येथील नागरिकांनी अनेकवेळा तक्रारी करूनही रस्ता झाला नाही. सत्ताधारी आणि विरोधकांकडून फक्त आश्वासने दिली जातात. या परिसरातील ज्येष्ठ नगरसेवक संजय कोरे आणि विक्रम पाटील यांनी आपल्या प्रभागातील रस्ते चकाचक केले आहेत. आष्टा नाका ते पोस्ट ऑफिस, शिवाजी पुतळा ते जुन्या बहे नाक्यापर्यंत रस्त्याची अवस्था खडतर बनली आहे. चौकांतच मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. या खड्ड्यांची अनेकवेळा डागडुजी केली तरी रस्त्याची अवस्था जैसे थे असते. आझाद चौक ते झरी नाका या मुख्य बसस्थानक रस्त्यावर गटारीचे काम सुरू आहे. या रस्त्यावरील व्यापाऱ्यांनी आपला विक्री होणारा माल गटारीवरच मांडला आहे. त्यामुळे या रस्त्याचे रूंदीकरण तर सोडाच गटारी नेहमीच तुंबलेल्या असतात. काहींनी तर गटारीवरच अतिक्रमणे केली आहेत. परिणामी या रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. सावकर कॉलनीतील रस्ता झाला असला तरी बसस्थानक पाठीमागील रस्त्याची अनेक वर्षांपासून दुरवस्था आहे. तत्कालीन राष्ट्रवादीने विकासाची दाखवलेली स्वप्ने तर धुळीस मिळाली आाहेत, तर सत्ताधारी विकास आघाडीने घोषणांचा पाऊस पाडून नागरिकांच्या स्वप्नातील रस्ते दाखविण्याचा नवीन पायंडा पाडला आहे.