शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नाट्य स्पर्धेचा दुर्लक्षित इतिहास उजेडात आणायला हवा ! राज्य नाट्य स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 23:36 IST

अभिराम भडकमकर, आशुतोष पोतदार ही कोल्हापुरात घडलेल्या आणि बाहेर पोहोचलेल्या, यशस्वी ठरलेल्या नाटककारांची आणखी काही नावे. खरं तर आणखीही खूप नावे आहेत; पण त्यांना मिळालेले यश एका मर्यादेत राहिले.

ठळक मुद्देइतिहास असे सांगतो की, १८५१ च्या सुमारास विष्णुदास भावे यांनी परगावात जाऊन नाटकांचे प्रयोग करणे सुरू केले. राज्य नाट्य स्पर्धेतील अशा यश संपादनाला सुरुवात झाली ती ‘पूल’ नावाच्या नाटकापासून.

- उदय कुलकर्णी -

अभिराम भडकमकर, आशुतोष पोतदार ही कोल्हापुरात घडलेल्या आणि बाहेर पोहोचलेल्या, यशस्वी ठरलेल्या नाटककारांची आणखी काही नावे. खरं तर आणखीही खूप नावे आहेत; पण त्यांना मिळालेले यश एका मर्यादेत राहिले. राज्य नाट्य स्पर्धेत कोल्हापुरात यशस्वी ठरली आणि नंतर राज्यात नावलौकिकास पात्र ठरली अशीही अनेक नाटके सांगता येतील. दोन ठळक उदाहरणंच द्यायची तर ‘किंग लिअर’, ‘आर्य चाणक्य’ ही नावे सांगता येतील. राज्य नाट्य स्पर्धेतील अशा यश संपादनाला सुरुवात झाली ती ‘पूल’ नावाच्या नाटकापासून.

इतिहास असे सांगतो की, १८५१ च्या सुमारास विष्णुदास भावे यांनी परगावात जाऊन नाटकांचे प्रयोग करणे सुरू केले. त्यांनी प्रथम कोल्हापुरात आणि नंतर पुण्यात आपली नाटक मंडळी नेली. थोडक्यात सांगली, इचलकरंजी, कोल्हापूर परिसरात मराठी रंगभूमीची मूळं आधी रुजली आणि त्यानंतर आठ-नऊ वर्षांनी पुणे, मुंबई ही शहरे मराठी रंगभूमीशी निगडित झाली.

महादेवशास्त्री कोल्हटकर यांनी १८५७ मध्ये ‘आॅथेल्लो’, विनायक कीर्तने यांनी १८६१ मध्ये ‘थोरले माधवराव’, आनंद सखाराम बर्वे व सखाराम परशुराम पंडित यांनी अनुक्रमे ‘हिम्मत बहाद्दूर’ व ‘शेराला सव्वाशेर’ ही नाटके १८६७ मध्ये लिहिली. ‘आॅथेल्लो’ हे नाटक आधी लिहिले गेले असले तरी पहिले स्वतंत्र मराठी नाटक म्हणून विनायक कीर्तने यांच्या ‘थोरले माधवराव’ या नाटकाला नाट्यरसिकांनी विशेष मान द्यायला हवा, असे बडोदा येथील अभ्यासक गणेश दंडवते यांचे मत होते.

कोल्हापूरकरांसाठी अभिमानाची बाब अशी की, ‘थोरले माधवराव’ या नाटकाचे त्या काळात जे प्रयोग झाले ते सर्व ‘इचलकरंजीकर नाटक मंडळीं’नी सादर केले होते. विष्णुदास भावेंच्याच काळात पुढे आलेली कोल्हापूरकर नाटक मंडळी, नंतर अनेक पौराणिक नाटके गाजविणारी ‘शाहूनगरवासी नाटक मंडळी’ तसेच ‘इचलकरंजीकर नाटक मंडळी’ या नाटक मंडळींची प्रेरणास्थाने, त्यातील कलाकार, त्यांनी सादर केलेले कलाप्रयोग हा सगळा इतिहास नीटपणे शोधून नव्या पिढीसमोर मांडण्याची आवश्यकता आहे. मी शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा शाहूनगरवासी नाटक मंडळींनी प्रा. वा. बा. केळकर लिखित ‘त्राटिका’ नावाचा नाट्यप्रयोग सादर केल्याची आठवण लिहून ठेवलेली मिळाली. बळवंतराव जोग, गणपतराव जोशी, गोविंंदराव सुपेकर, अशी शाहूनगरवासी नाटक मंडळीतील काही कलाकारांची नावेही हाती लागली; पण त्यापेक्षा अधिक संदर्भ माझ्या हाती लागले नाहीत.

कोल्हापुरातील दिवंगत रसिक प्रकाश फार्मसीचे प्रकाश पुरोहित यांच्या संग्रहातील काही कात्रणे पाहायला मिळाली. या कात्रणातून एक गोष्ट स्पष्ट झाली की, ‘कोल्हापूरकर नाटक मंडळी’ या नावाने जी नाटक कंपनी ओळखली जात होती तिलाच ‘चित्तचक्षुचमत्कारिक’ असे विशेषण जोडण्यात येत असे. कै. नारायणराव कारखानीस यांनी कोल्हापुरात पहिल्यांदा नाटक कंपनी काढली. महालक्ष्मी मंदिरातील गरूड मंडप व मान्यवरांच्या वाड्यामध्ये या नाटक मंडळींचे आख्यानवजा पौराणिक खेळ होत असत. १८४० मध्ये जन्मलेले नरहर गोपाळ सरडे कारखानीसांच्या नाटक मंडळीत सहभागी होते. सरडे १८६१ मध्ये त्या नाटक मंडळीतून बाहेर पडले आणि त्यांनी ‘चित्तचक्षुचमत्कारिक’ नावाची नाटक कंपनी स्थापन केली.

नरहरबुवांनी जशी गद्य नाटके रंगमंचावर आणली तशी संगीत नाटकेही रंगमंचावर आणली. नरहरबुवांनीच १८७१ मध्ये ‘स्वरसकेशा’ नावाचे सामाजिक नाटक रंगभूमीवर आणल्याची नोंद मिळते. ‘पारिजात’, ‘द्रौपदी वस्रहरण’, ‘शुक-रंभासंवाद’, ‘संगीत संभाजी’, ‘राधाविलास’ ही नाटकेही रंगभूमीवर आणणाऱ्या नरहरबुवांचे १८९८ साली निधन झाले; पण तत्पूर्वी अण्णासाहेब किर्लोस्करांनी लिहिलेले ‘शांकर दिग्विजय’ नावाचे नाटकही नरहरबुवांनी रंगमंचावर आणले म्हणजे नाटककार अण्णासाहेब किर्लोस्करांना रंगभूमीशी जोडण्याचा पहिला मान नरहरबुवांकडे जातो. या दुर्लक्षित इतिहासाकडे कोण आणि कधी पाहणार?राज्य हौशी नाट्य स्पर्धा ही खरे तर रंगभूमीवर नवनवे प्रयोग करू पाहणाºया तरुणाईसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली संधी. या संधीचा लाभ घेऊन काळाच्या ओघात अनेक नाटककार आणि कलाकार पुढे आले. कोल्हापुरातीलही अशी अनेक नावे सांगता येतील. अर्थात त्यामध्ये नव्या नाटककारांची संख्या कमी आहे; पण कोल्हापुरातून जे नवे नाटककार पुढे आले त्यांची नाटके महाराष्ट्रातील अन्य ठिकाणच्या किंवा व्यावसायिक नाट्य संस्थांनाही सादर करावीशी वाटली हे महत्त्वाचे. अशा नाटककारांपैकी हिमांशु स्मार्त आणि विद्यासागर अध्यापक यांच्या संहिता यावर्षीही स्पर्धेमध्ये सादर होत आहेत.आजचे नाटक--- सिगारेट्स --   संस्था : भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर