शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

त्यांच्याकडे सातबारा असेल तर माझ्याकडे फेरफार!, अनिल बाबरांचा जयंत पाटलांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 14:03 IST

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सुसंस्कारी नेते आहेत. त्यांच्या पक्षात आता बगलबच्च्यांची संख्या वाढली आहे. त्यांनीच हे शब्द जयंतरावांच्या तोंडी घातले असावेत

विटा : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सुसंस्कारी नेते आहेत. ते एका मोठ्या नेत्यांचे चिरंजीव आहेत. गेल्या ३० वर्षांपासून माझे व त्यांचे संबंध आहेत. ते स्वत: मंत्री होते, त्यामुळे त्यांच्या तोंडून मंत्री, संत्री असे शब्द येणार नाहीत, याची मला खात्री आहे. त्यांच्या पक्षात आता बगलबच्च्यांची संख्या वाढली आहे. त्यांनीच हे शब्द जयंतरावांच्या तोंडी घातले असावेत; पण त्यांच्याकडे सातबारा असेल तर माझ्याकडे तुमचा फेरफार आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा इशारा मुख्यमंत्री शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांनी दिला.येथे सोमवारी माजी मंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना, ‘घाबरू नका, मंत्री, संत्री कोणीही होऊ द्या, माझ्याकडे सगळ्यांचा सातबारा आहे,’ असे जयंत पाटील बोलल्याचे आ. बाबर यांना माध्यमातून समजले. त्यावर त्यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले.आ. बाबर म्हणाले, जी पदे घटनेने दिली आहेत, ती मंत्रिपदे जयंत पाटील यांनी स्वत: भोगलेली आहेत. त्या पदाबद्दल ते या पध्दतीने बोलतील, असे मला वाटत नाही. सध्या त्यांच्या पक्षात काही नवीन विद्वान लोक आले आहेत. त्यांना सत्ता मिळावी, यासाठी त्यांनी जयंतरावांचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनीच हे सर्व पसरविले आहे; परंतु मी कुजक्या मनोवृत्तीचा नाही. जयंतरावांसारख्या चांगल्या माणसाच्या तोंडी असे शब्द घालणे हे राजकीयदृष्ट्या शोभनीय नाही. त्यामुळे ज्यांनी हे केले, त्यांनी लक्षात ठेवावे, तुमच्याकडे माझा सातबारा असेल तर माझ्याकडे तुमचा फेरफार आहे.स्वत:च्या पायाखालची वाळू घसरू लागल्याने अशी निर्मिती सुरू आहे; परंतु असे करून निवडणूक जिंकता येत नाही. आता तुम्हाला लोकांनीच घरी पाठवायचे ठरविले असल्याचा टोला आ. बाबर यांनी विटा नगरपालिकेच्या सत्ताधारी गटाला लगावला.

टॅग्स :Sangliसांगली