शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

दराची कोंडी न फोडल्यास रविवारी महामार्ग रोखणारच; स्वाभीमानीचा इशारा

By अशोक डोंबाळे | Updated: December 7, 2023 14:53 IST

‘स्वाभिमानी’चा जिल्हा प्रशासनासह कारखानदारांना इशारा

अशोक डोंबाळे/सांगली

सांगली : इस्लामपूरचे प्रांताधिकारी अर्जुन श्रीनिवासन यांनी दि. ८ डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयात साखर कारखानदारांची बैठक घेऊन तोडगा काढण्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांना आश्वासन दिले आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने शब्द पाळवा, अन्यथा दि. १० डिसेंबरला पेठ (ता. वाळवा) येथे पुणे ते बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात येणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी दिली आहे.

संदीप राजोबा म्हणाले, राजारामबापू साखर कारखाना साखराळे येथे १ डिसेंबरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलन केले होते. मागील गळीत हंगामाला गेलेल्या उसाला ज्या कारखान्यांनी प्रतिटन तीन हजार रुपयांपेक्षा जास्त दर दिला असेल तर त्यांनी प्रतिटन ५० रुपये द्यावेत. तीन हजार रुपयांपेक्षा कमी दर दिलेल्या कारखानदारांनी प्रतिटन १०० रुपये द्यावेत. तसेच यावर्षीच्या गळीत हंगामासाठी एकरकमी तीन हजार १०० रुपये दर दिला पाहिजे. या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आंदोलन केले होते. शेतकरी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजारामबापू कारखान्याच्या उसाच्या गव्हाणीमध्ये जीवावर उदार होऊन उड्या घेतल्या होत्या. सांगलीचे जिल्हाधिकारी बाहेरगावी असल्याने इस्लामपूरचे प्रांताधिकारी अर्जुन श्रीनिवासन हे जिल्हाधिकारी यांचा निरोप घेऊन आले होते. जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्याचे अध्यक्ष व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची दि. ८ डिसेंबरला बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. बैठकीपूर्वी एक दिवस अगोदर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना निरोप देण्यात येणार आहे. आश्वासनाची जिल्हा प्रशासनाच्या पातळीवरती अजून कोणतीही हालचाल दिसत नाही. प्रशासनाला दिलेली मुदत शुक्रवारी संपत आहे. जिल्हा प्रशासनाने ऊस दराची कोंडी फोडली नाही तर रविवार, दि. १० रोजी पेठ येथे राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. ऊस दराचा तोडगा निघेपर्यंत आंदोलन चालूच असणार आहे, असेही राजोबा म्हणाले.

जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाकडे लक्षजिल्ह्यातील साखर कारखानदारांनी कोल्हापूर पॅटर्ननुसार दर देण्यास नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी शुक्रवार, दि. ८ रोजी बैठक साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधीची बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. या बैठकीत जिल्हाधिकारी कोणता तोडगा काढणार आहेत, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :SangliसांगलीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना