शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

दराची कोंडी न फोडल्यास रविवारी महामार्ग रोखणारच; स्वाभीमानीचा इशारा

By अशोक डोंबाळे | Updated: December 7, 2023 14:53 IST

‘स्वाभिमानी’चा जिल्हा प्रशासनासह कारखानदारांना इशारा

अशोक डोंबाळे/सांगली

सांगली : इस्लामपूरचे प्रांताधिकारी अर्जुन श्रीनिवासन यांनी दि. ८ डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयात साखर कारखानदारांची बैठक घेऊन तोडगा काढण्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांना आश्वासन दिले आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने शब्द पाळवा, अन्यथा दि. १० डिसेंबरला पेठ (ता. वाळवा) येथे पुणे ते बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात येणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी दिली आहे.

संदीप राजोबा म्हणाले, राजारामबापू साखर कारखाना साखराळे येथे १ डिसेंबरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलन केले होते. मागील गळीत हंगामाला गेलेल्या उसाला ज्या कारखान्यांनी प्रतिटन तीन हजार रुपयांपेक्षा जास्त दर दिला असेल तर त्यांनी प्रतिटन ५० रुपये द्यावेत. तीन हजार रुपयांपेक्षा कमी दर दिलेल्या कारखानदारांनी प्रतिटन १०० रुपये द्यावेत. तसेच यावर्षीच्या गळीत हंगामासाठी एकरकमी तीन हजार १०० रुपये दर दिला पाहिजे. या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आंदोलन केले होते. शेतकरी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजारामबापू कारखान्याच्या उसाच्या गव्हाणीमध्ये जीवावर उदार होऊन उड्या घेतल्या होत्या. सांगलीचे जिल्हाधिकारी बाहेरगावी असल्याने इस्लामपूरचे प्रांताधिकारी अर्जुन श्रीनिवासन हे जिल्हाधिकारी यांचा निरोप घेऊन आले होते. जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्याचे अध्यक्ष व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची दि. ८ डिसेंबरला बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. बैठकीपूर्वी एक दिवस अगोदर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना निरोप देण्यात येणार आहे. आश्वासनाची जिल्हा प्रशासनाच्या पातळीवरती अजून कोणतीही हालचाल दिसत नाही. प्रशासनाला दिलेली मुदत शुक्रवारी संपत आहे. जिल्हा प्रशासनाने ऊस दराची कोंडी फोडली नाही तर रविवार, दि. १० रोजी पेठ येथे राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. ऊस दराचा तोडगा निघेपर्यंत आंदोलन चालूच असणार आहे, असेही राजोबा म्हणाले.

जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाकडे लक्षजिल्ह्यातील साखर कारखानदारांनी कोल्हापूर पॅटर्ननुसार दर देण्यास नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी शुक्रवार, दि. ८ रोजी बैठक साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधीची बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. या बैठकीत जिल्हाधिकारी कोणता तोडगा काढणार आहेत, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :SangliसांगलीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना