शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

'संत तुकाराम आज असते, तर त्यांच्यामागेही ईडी लावली असती'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 14:36 IST

सध्याच्या काळात प्रबाेधन करणे गुन्हा ठरत आहे

सांगली : सध्याच्या काळात प्रबाेधन करणे गुन्हा ठरत आहे. संत तुकाराम विद्रोही संत होते. ते जर आजच्या काळात असते तर समाजाला शहाणे का करता म्हणून लोकांनी त्यांच्या मागे ईडीची चौकशी लावली असती, असे मत ज्येष्ठ साहित्यिक वसंत केशव पाटील यांनी व्यक्त केले.

जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या सांगली शाखेच्यावतीने रविवारी ‘जगद्गुरू तुकोबाराय जीवनगौरव पुरस्कार’ने वसंत केशव पाटील यांना सन्मानित करण्यात आले. सांगलीच्या मराठा सेवा संघाच्या सांस्कृतिक भवनमध्ये हा सोहळा पार पडला. यावेळी ‘संगीतसूर्य केशवराव भोसले गौरव पुरस्कार’ शाहीर बजरंग आंबी, ‘डॉ. रखमाबाई राऊत गौरव पुरस्कार’ डॉ. तन्वी रवीराज शिंदे, ‘डॉ. सरोजिनी बाबर गौरव पुरस्कार’ साहित्यिका मनीषा पाटील, ‘छात्रवीर संभाजीराजे साहित्य गौरव पुरस्कार’ दिवंगत साहित्यिक चारूता सागर यांचे चिरंजीव साहित्यसेवक राजेंद्र भोसले आणि कवी वसंत दादू पाटील यांना प्रदान करण्यात आले.

वसंत केशव पाटील म्हणाले, सांस्कृतिक आणि साहित्यिकदृष्ट्या आपण पंगू बनत चाललो आहोत. ग्रामीण माणसाची दु:खे हा विनोदाचा विषय असू शकत नाही. साहित्यिकांनी ग्रामीण भागाचं अर्थकारण आणि शेतकऱ्यांची व्यथा लक्षात घेऊन लिहिले पाहिजे. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा मी अध्यक्ष व्हावा, यासाठी माझ्या काही साहित्यिक मित्रांनी माझ्यावर पुस्तक प्रकाशित केले. परंतु, मला संमेलनाचे अध्यक्ष व्हायचे नाही. माझ्या सडेतोड स्वभावामुळे साहित्यक्षेत्रात माझे शत्रूच जास्त आहेत. म्हणूनच माझे साहित्य कोणत्याही विद्यापीठाला नाही.

मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सचिन पवार, अमृत सूर्यवंशी, उद्योजक राजेंद्रसिंह पाटील, जगद्गुरू तुकोबाराय परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष डॉ. निर्मला पाटील, प्रदेश महासचिव बालाजी जाधव यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. जिल्हाध्यक्ष तानाजी जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मनीषा पाटील यांनी आभार मानले. मनीषा रायजादे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी डॉ. संजय पाटील, नितीन चव्हाण, अपर्णा खांडेकर, विनायक कदम, उद्योजक सुनील कांबळे, रामराव सुळे, सुधाकर पाटील उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगलीsant tukaramसंत तुकारामEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय