शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
3
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
4
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
5
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
6
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
7
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
8
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
9
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
10
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
11
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
12
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
13
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
14
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
15
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
16
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
17
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
18
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
19
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
20
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?

अस्वच्छता दिसल्यास खाते प्रमुखांवर कारवाई करणार

By admin | Updated: November 18, 2014 23:27 IST

अंजली मरोड : दहा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे वॉच

विटा : स्वच्छ भारत अभियानाचा उपक्रम विटा येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात येत असून, १४ सरकारी विभागांची कार्यालये असलेल्या येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत आता अस्वच्छता दिसल्यास थेट खातेप्रमुखांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. याबाबत तहसीलदार सौ. अंजली मरोड यांनी सर्व खात्यांच्या अधिकाऱ्यांना एकत्रित बोलावून स्वच्छतेबाबत सक्त सूचना दिल्या आहेत. दरम्यान, पान, तंबाखू व गुटखा खाऊन प्रशासकीय इमारतीचे कोपरे रंगविणाऱ्या नागरिकांवर आता इमारतीत बसविण्यात आलेल्या दहा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे ‘वॉच’ ठेवण्यात येणार आहे.संपूर्ण देशभर स्वच्छ भारत अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून विटा येथील टोलेजंग मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या इमारतीत १४ शासकीय विभागांची कार्यालये आहेत. त्यामुळे नागरिकांचा वावरही मोठ्या प्रमाणात आहे. या इमारतीचे सर्वच कोपरे पान, तंबाखू, गुटखा, मावा खाणाऱ्या नागरिकांनी रंगवून टाकले होते. त्यामुळे इमारतीत अत्यंत दुर्गंधी व अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले होते.या पार्श्वभूमीवर विट्यातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी अंजली मरोड, निवासी नायब तहसीलदार चंद्रकांत महाजन, महादेव पाटील यांच्यासह तहसील, कृषी, सामाजिक वनीकरण, वजन-मापे, उपविभागीय कृषी, सहायक निबंधक, दुय्यम निबंधक, उत्पादन शुल्क या विविध विभागांच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला. यावेळी कार्यालयाच्या आवारातील कचरा बाहेर काढून नागरिकांनी पान, तंबाखू खाऊन रंगविलेल्या भिंतींचे कोपरे स्वच्छ करण्यात आले.दरम्यान, आता यापुढील काळात इमारतीतील आवारात कचरा व अस्वच्छता दिसल्यास संबंधित विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे तहसीलदार मरोड यांनी सांगितले. (वार्ताहर)नागरिकांवर दंडात्मक कारवाईइमारतीत बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांवर ‘वॉच’ ठेवण्यासाठी इमारतीच्या आवारात दहा सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. प्रशासकीय कार्यालयात अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांवरही दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत विटा येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत आता चकाचक दिसू लागली आहे.इमारतीचे सर्वच कोपरे पान, तंबाखू, गुटखा, मावा खाणाऱ्या नागरिकांनी रंगवून टाकले होते. ते कर्मचाऱ्यांनी स्वच्छ केले.