शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

सांगलीत नवे राजकारण शिकायला मिळाले : दिलीपतात्या पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 19:39 IST

शेती, शेतीपूरक व्यावसायास हातभार लावताना परंपरागत उद्योगांना अर्थसहाय्य करून कोरोनामुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न राहणार आहे. बँकेने यासाठी अभ्यासपूर्ण नियोजन केले आहे. बँकेने यंदा अशाच नियोजनातून नफ्याचा विक्रम नोंदविला आहे.

ठळक मुद्देकोरोना, नोटाबंदीसह अनेक संकटातही बँकेला सक्षम बनविले, पाच वर्षाच्या कारकिर्दीबद्दल समाधानी

सांगली : आजवर वाळवा तालुक्यातील अनेक संस्थांमध्ये नेतृत्व करण्याची संधी मिळाली, मात्र सांगली जिल्हा बँकेत जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांबरोबर काम करताना राजकारणातल्या अनेक नव्या गोष्टींचे दर्शन घडले. नवे स्वरुप शिकायला मिळतानाच त्यात टिकायचे कसे हे समजले. दिग्गज नेत्यांना सांभाळून पारदर्शी कारभार करण्यात यशसुद्धा मिळाले, असे मत सांगली जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.  

विविध कारणांनी कमी झालेली रोकड तरलता सुरळीत करण्यासाठी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने नाबार्डकडे १00 कोटी रुपयांची मागणी केली होती. नाबार्डने बुधवारी बँकेस ७१ कोटी रुपये मंजूर केले आहेत, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले की, अध्यक्षपदाला बुधवारी पाच वर्षे पूर्ण झाली. जयंत पाटील यांच्या सुचनेनुसार चांगला कारभार करता आला याचे समाधान आहे. बँकेतील संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचाºयांनीही अपेक्षित साथ दिल्याने सलग पाच वर्षे बँकेने उद्दीष्टापेक्षा चांगली कामगिरी केली आहे. जिल्ह्यातील शेतकºयांना बँकेच्या माध्यमातून न्याय देता आल्यानेही समाधानी आहे.ते म्हणाले की, सांगली जिल्हा बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम असून नफ्याच्या बाबतीत राज्यातील आघाडीच्या बँकांमध्ये तिचा समावेश होतो. गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असल्यामुळे सर्वच क्षेत्रांमधील उलाढाल पूर्णपणे ठप्प झाली आहे.

अन्य वित्तीय संस्थांप्रमाणे जिल्हा बँकेलाही रोकड तरलतेची अडचण जाणवत आहे. त्यामुळेच बँकेने नाबार्डकडे शंभर कोटी रुपये मागितले होते. त्यांनी ७१ कोटी रुपये मंजूर केले आहेत. ५ टक्के व्याजदराने हे अर्थसहाय्य होणार आहे. सांगली जिल्हा बँकेमार्फत यावर्षी कृषी संवर्धन योजना आखण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्यात दोन कृषी अधिकारी नियुक्त करून नाबार्डच्या योजनांचा लाभ तसेच मोफत शेतीविषयक मार्गदर्शन त्यांना दिले जाणार आहे. यासाठी २५ लाखाची तरतूद बँकेने केली आहे.

जिल्हा बँकेत भरती झालेल्या उमेदवारांमध्ये कृषी पदवीधरांची तसेच कृषीपूरक योजनांबाबत विशेष प्राविण्य मिळविलेल्या लोकांचा समावेश आहे. त्यांचा समावेश कृषी संवर्धन योजनेत केला आहे. शेती, शेतीपूरक व्यावसायास हातभार लावताना परंपरागत उद्योगांना अर्थसहाय्य करून कोरोनामुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न राहणार आहे. बँकेने यासाठी अभ्यासपूर्ण नियोजन केले आहे. बँकेने यंदा अशाच नियोजनातून नफ्याचा विक्रम नोंदविला आहे.

टॅग्स :bankबँकPoliticsराजकारणMONEYपैसाbusinessव्यवसायFarmerशेतकरी