शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत नवे राजकारण शिकायला मिळाले : दिलीपतात्या पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 19:39 IST

शेती, शेतीपूरक व्यावसायास हातभार लावताना परंपरागत उद्योगांना अर्थसहाय्य करून कोरोनामुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न राहणार आहे. बँकेने यासाठी अभ्यासपूर्ण नियोजन केले आहे. बँकेने यंदा अशाच नियोजनातून नफ्याचा विक्रम नोंदविला आहे.

ठळक मुद्देकोरोना, नोटाबंदीसह अनेक संकटातही बँकेला सक्षम बनविले, पाच वर्षाच्या कारकिर्दीबद्दल समाधानी

सांगली : आजवर वाळवा तालुक्यातील अनेक संस्थांमध्ये नेतृत्व करण्याची संधी मिळाली, मात्र सांगली जिल्हा बँकेत जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांबरोबर काम करताना राजकारणातल्या अनेक नव्या गोष्टींचे दर्शन घडले. नवे स्वरुप शिकायला मिळतानाच त्यात टिकायचे कसे हे समजले. दिग्गज नेत्यांना सांभाळून पारदर्शी कारभार करण्यात यशसुद्धा मिळाले, असे मत सांगली जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.  

विविध कारणांनी कमी झालेली रोकड तरलता सुरळीत करण्यासाठी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने नाबार्डकडे १00 कोटी रुपयांची मागणी केली होती. नाबार्डने बुधवारी बँकेस ७१ कोटी रुपये मंजूर केले आहेत, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले की, अध्यक्षपदाला बुधवारी पाच वर्षे पूर्ण झाली. जयंत पाटील यांच्या सुचनेनुसार चांगला कारभार करता आला याचे समाधान आहे. बँकेतील संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचाºयांनीही अपेक्षित साथ दिल्याने सलग पाच वर्षे बँकेने उद्दीष्टापेक्षा चांगली कामगिरी केली आहे. जिल्ह्यातील शेतकºयांना बँकेच्या माध्यमातून न्याय देता आल्यानेही समाधानी आहे.ते म्हणाले की, सांगली जिल्हा बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम असून नफ्याच्या बाबतीत राज्यातील आघाडीच्या बँकांमध्ये तिचा समावेश होतो. गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असल्यामुळे सर्वच क्षेत्रांमधील उलाढाल पूर्णपणे ठप्प झाली आहे.

अन्य वित्तीय संस्थांप्रमाणे जिल्हा बँकेलाही रोकड तरलतेची अडचण जाणवत आहे. त्यामुळेच बँकेने नाबार्डकडे शंभर कोटी रुपये मागितले होते. त्यांनी ७१ कोटी रुपये मंजूर केले आहेत. ५ टक्के व्याजदराने हे अर्थसहाय्य होणार आहे. सांगली जिल्हा बँकेमार्फत यावर्षी कृषी संवर्धन योजना आखण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्यात दोन कृषी अधिकारी नियुक्त करून नाबार्डच्या योजनांचा लाभ तसेच मोफत शेतीविषयक मार्गदर्शन त्यांना दिले जाणार आहे. यासाठी २५ लाखाची तरतूद बँकेने केली आहे.

जिल्हा बँकेत भरती झालेल्या उमेदवारांमध्ये कृषी पदवीधरांची तसेच कृषीपूरक योजनांबाबत विशेष प्राविण्य मिळविलेल्या लोकांचा समावेश आहे. त्यांचा समावेश कृषी संवर्धन योजनेत केला आहे. शेती, शेतीपूरक व्यावसायास हातभार लावताना परंपरागत उद्योगांना अर्थसहाय्य करून कोरोनामुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न राहणार आहे. बँकेने यासाठी अभ्यासपूर्ण नियोजन केले आहे. बँकेने यंदा अशाच नियोजनातून नफ्याचा विक्रम नोंदविला आहे.

टॅग्स :bankबँकPoliticsराजकारणMONEYपैसाbusinessव्यवसायFarmerशेतकरी