शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

एकाच गाडीतून आलो, तर बिघडले कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:26 AM

इस्लामपूर : मिरज येथील कार्यक्रमासाठी एकत्र आलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी आणि माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी काही काळ एकाच वाहनातून प्रवास केला. याचे राजकीय मंडळींनी भांडवल केले. यावर खा. शेट्टी यांनी ‘खासदार-आमदार एका गाडीतून आले, तर बिघडले कुठे? आम्ही काय एकमेकांचे बांध रेटले आहेत का?’ ...

इस्लामपूर : मिरज येथील कार्यक्रमासाठी एकत्र आलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी आणि माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी काही काळ एकाच वाहनातून प्रवास केला. याचे राजकीय मंडळींनी भांडवल केले. यावर खा. शेट्टी यांनी ‘खासदार-आमदार एका गाडीतून आले, तर बिघडले कुठे? आम्ही काय एकमेकांचे बांध रेटले आहेत का?’ असा टोला मारला.खासदार राजू शेट्टी ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले की, देशातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आमची संघटना लढा देत आहे. आघाडी सरकारच्या विरोधातही आम्ही आवाज उठवला आहे. शेतकºयांना न्याय देण्यासाठी प्रसंगी तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, लालूप्रसाद यादव यांनाही आम्ही विरोध केला आहे. आमदार जयंत पाटील अर्थमंत्री असताना २००७ मध्ये कोल्हापूर-सांगली हा महामार्ग होणार होता. यामध्ये जयसिंगपूरमधील काही घरे पाडली जाणार होती. त्यावेळी मी स्वत: विरोध केला होता. या प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी त्यावेळीही मी आणि जयंत पाटील एकाच गाडीत बसलो होतो.मिरज येथील कार्यक्रमावेळी एकाच गाडीतून प्रवास करण्याचा योगही असाच आला होता. त्याचे कोणीही राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न करू नये. लोकसभा निवडणुकीला अद्याप कालावधी आहे. जयंत पाटील ज्या मतदारसंघाचे आमदार आहेत, त्याच मतदारसंघाचा खासदार आहे. आता आमचे विचार शेतकºयांच्या हिताचेच आहेत. मात्र भाजप शेतकºयांच्या विरोधात आहे. निवडणुकीत भाजपकडून मिळालेली आश्वासने पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळेच मी त्यांच्यापासून फारकत घेत स्वतंत्रपणे शेतकºयांचा लढा सुरू केला आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अद्याप कोणत्याही पक्षाला साथ देण्याबाबत विचार केलेला नाही, असेही खा. शेट्टी यांनी स्पष्ट केले.