शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

मलाही मुख्यमंत्री व्हावे वाटते! - रामदास आठवले  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2023 18:48 IST

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ‘पक्षातून जाणाऱ्यांनी जावे’ म्हणतात, मला वाटते पवार यांनीच भाजपत यावे

सांगली : मला आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह अनेकांना मुख्यमंत्री व्हावे, असे वाटणे स्वाभाविक आहे. मात्र, सध्या तरी भाजप-शिवसेना सरकार बहुमतात व स्थिर आहे. आमदार अपात्रतेबाबत न्यायालयाचा निकालही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूनेच लागेल, असे वाटते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ‘पक्षातून जाणाऱ्यांनी जावे’ म्हणतात, मला वाटते पवार यांनीच भाजपत यावे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी सांगलीत पत्रकार परिषदेत व्यक्त केले.आठवले म्हणाले, भावी मुख्यमंत्री म्हणून सध्या राज्यात सुरू असलेले पोस्टरयुध्द हास्यास्पद आहे. मुख्यमंत्री होण्याची अनेकांची अपेक्षा असली तरी मुख्यमंत्री शिंदे यांचे स्थान भक्कम आहे. बहुमत असताना बदलाचा विषयच नाही. शिंदे मुख्यमंत्री म्हणून २०२४ पर्यंत पदावर राहतील. सत्ता गेल्यामुळे उध्दव ठाकरे यांच्यासह काहीजण शिंदे यांच्यावर टीका करीत आहेत. आमदार अपात्रतेबाबतही शिंदे यांच्या बाजूनेच निकाल लागेल, असे वाटते. अजित पवार यांना मुख्यमंत्री व्हावे, असे वाटत असले तरी भविष्यात बहुमत असेल तरच मुख्यमंत्रिपद मिळेल.

दलितांना खोट्या गुन्ह्यात अडकवू नकाआठवले यांनी जनधन योजना, मुद्रा कर्ज योजना, उज्ज्वला गॅस आदी योजनांचा आढावा घेतला. जिल्ह्यातील दलितांवरील चोरीचे गुन्हे, ॲट्रॉसिटीबाबत आढावा घेतला. दलितांना खोट्या गुन्ह्यांत अडकवू नका, अशा सूचना प्रशासनाला केल्या.

पूरपट्ट्यातील लोकांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव द्या

मंत्री आठवले म्हणाले, कृष्णा नदीच्या पूरपट्ट्यात दरवर्षी कुटुंबांचे मोठे नुकसान होत आहे. वसाहतीत, गावांत मोठ्या संख्येने दलित, मागासवर्गीय लोक राहतात. त्यांच्या पूर्ण पुनर्वसनाचा प्रस्ताव तातडीने राज्य सरकारकडे द्यावा, या कामासाठी पाठपुरावा करू.

कार्यकर्त्यांना संधी देणारआठवले म्हणाले, राज्यात आगामी विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका भाजप-शिवसेनेसोबत आरपीआय लढविणार आहे. आमच्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचा प्रयत्न असेल.

टॅग्स :SangliसांगलीRamdas Athawaleरामदास आठवलेChief Ministerमुख्यमंत्री