शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Sangli: विट्यात राबताहेत शेकडो परप्रांतीय बालकामगार; प्रशासनाचे दुर्लक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 15:58 IST

संबंधित व्यावसायिकांवर कारवाईची मागणी

दिलीप मोहितेविटा : दारिद्र्य आणि सततची भटकंती यामुळे शाळेकडे पाठ फिरवलेल्या परप्रांतीय चिमुकल्यांनी विट्यात आश्रय घेतला आहे. आई-वडिलांनी घेतलेली पैशांची उचल फेडण्यासाठी शेकडो परप्रांतीय बालकामगार राबत आहेत. शहरातील हॉटेल्स, चायनीज खाद्यपदार्थांचे स्टाॅल्स, बांधकाम तसेच भंगार व्यवसायासह अन्यत्र या बालकामगारांचा सर्रास वापर होत आहे.विटा शहरात भंगार व्यवसायात उत्तर प्रदेश, बिहार तर बेकरी व्यवसायात राजस्थान, गुजरात तसेच उडपी आणि सुवर्णालंकार व्यवसायात बंगाली कामगार काम करत आहेत. बांधकाम व्यवसायात कर्नाटकातील बेळगाव परिसरातील अनेक बालकामगार सध्या राबत असल्याचे दिसून येत आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी तुटपुंज्या पगारावर तर काही बालकामगार केवळ दोनवेळचे जेवण आणि राहण्याची सोय होत असल्याने काम करत आहेत. अनेक परप्रांतीय व्यावसायिकांनी आपापल्या राज्यातून बालकामगार आणले आहेत. रात्रंदिवस त्यांना कामात जुंपले जाते.या बालकामगारांचे आर्थिक व शारीरिक शोषण होत असतानाही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याच्या तक्रारी आहेत. परप्रांतातून आणताना चिमुरड्यांच्या आई-वडिलांसह अन्य नातेवाईकांच्या हातावर वर्षाकाठी केवळ पाच ते दहा हजार एकरकमी ठेवले जातात. त्यामुळे मालक या कामगारांना खरेदी केल्यासारखी वागणूक देतात.बेकरी व्यवसायातील बालकामगारांना आगीच्या भट्टीसमोर तर सुवर्ण व्यवसायात ॲसिडच्या धुरात काम करावे लागते. भंगार जमा करतानाही लोखंडी साहित्याची वाहतूक करावी लागते.हॉटेल्स व कोल्ड्रिंक्स या व्यवसायातही अनेक बालकामगार राबताना दिसतात. बालकामगारांचा सर्वाधिक वापर बांधकाम व्यवसायात होत असून, या बालकामगारांना उंच मजल्यांवर सिमेंट, वाळू, वीट, खडी अशा जड साहित्याच्या वाहतुकीसाठी वापरले जाते. अशा बालकामगारांचा प्रशासनाने तातडीने शोध घ्यावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

सुटका कोण करणार?अडगळीच्या एका दहा बाय दहाच्या खोलीत १२ ते १५ बालकांची राहण्याची व्यवस्था केली जाते. त्यांना शिक्षण तर नाहीच पण पुरेसे जेवण, विश्रांती व आरोग्य सुविधाही मिळत नाहीत. या बालकामगारांना व्यक्तिगत स्वातंत्र्य नसल्याने त्यांची यातून कोण सुटका करणार? हा प्रश्न आजही अनुत्तरीतच आहे.

टॅग्स :Sangliसांगली