शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेले मराठा आरक्षण सरकार कसे देणार?, संभाजीराजेंचा राज्य सरकारला सवाल

By अशोक डोंबाळे | Updated: January 6, 2024 18:38 IST

मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

सांगली : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, म्हणून २००७ पासून महाराष्ट्र पिंजून काढला आहे. मराठा समाजाला कसे आरक्षण दिले जाऊ शकते, या बाबतीत अनेक वेळा मी भूमिका मांडली आहे. सध्या सरकार आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरू आहे; पण सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यामुळे आता राज्य सरकार मराठा समाजाला कसे आरक्षण देणार आहे?, असा सवाल स्वराज्य संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष व माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थित केला.सांगलीतील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात शनिवारी आर्ट सर्कल प्रस्तुत ‘युवारंग २०२४’च्या उद्घाटनप्रसंगी संभाजीराजे छत्रपती बोलत होते. आर्ट सर्कलचे अध्यक्ष सर्वज्ञ मोरे यांनी त्यांची मुलाखत घेतली.संभाजीराजे म्हणाले, सरकार आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने एकदा मराठा समाजाचे आरक्षण रद्द केले आहे. पूर्वी रद्द झाल्यानंतर पुन्हा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात गेला तर तिथे ते टिकणार आहे का? या सर्व गोष्टींचा विचार करण्याची गरज आहे. तसेच सध्या मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्यांच्या या घोषणेच स्वागत करतो; पण मराठा समाजाला कसे आरक्षण देणार आहे, ते सरकारने जाहीर करण्याची गरज आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या मनातील शंका संपणार आहेत. तसेच शेवटी भावना आणि न्यायिक याचा समतोल साधून गरीब मराठा समाजाला आरक्षण दिलं जावं, ही माझी अपेक्षाच आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आमचा फोकस विधानसभासध्या आमच्या स्वराज्य संघटनेचा फोकस विधानसभा निवडणुकांवर आहे. लोकसभा निवडणुकांबाबत सध्या तरी कोणताही निर्णय घेतला नाही. अजून वेळ आहे; पण सध्या तरी स्वराज्य संघटनेचे लक्ष विधानसभा निवडणूकच असणार आहे, असेही संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीMaratha Reservationमराठा आरक्षणSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय