शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
4
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
5
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
6
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
7
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
8
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
9
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
10
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
11
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
12
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
13
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
14
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
15
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
16
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
17
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
18
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
19
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
20
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार

मुंबईतील राजभवनाचे हाऊसकिपिंग सांगलीतील मेघना कोरे यांच्याकडे; सांगलीकरांचा बहुमान; प्रतिष्ठेची, अभिमानाची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 01:24 IST

त्यातून आत्मविश्वास दुणावल्याने थेट राजभवनाचीच जबाबदारी आव्हान म्हणून स्वीकारली आहे. महाराष्ट्राच्या संविधानिक प्रमुखांचे निवासस्थान असणाऱ्या राजभवनाची वास्तू सौंदर्याचा अद्वितीय नमुना आहे. मलबार हिलवर पन्नास एकरांत पसरलेल्या राजभवनाचे व्यवस्थापन ही अभिमानाची आणि तितकीच जबाबदारीचीही कामगिरी आहे.

ठळक मुद्दे. दुर्मीळ वृक्ष, फुलझाडे, लॉन यांची विशेष काळजी घ्यावी लागते.

संतोष भिसे ।सांगली : अवघ्या महाराष्ट्राच्या प्रशासनाचा अवाढव्य डोलारा सांभाळणाऱ्या मुंबईतील राजभवनाचे व्यवस्थापन करण्याची प्रतिष्ठेची जबाबदारी सांगलीतील महिलेकडे आली आहे. प्रतिथयश उद्योजिका मेघना कोरे नव्या वर्षात राजभवनाचे ‘हाऊसकिपिंग’ करणार आहेत. सांगलीकरांसाठी ही अभिमानाची आणि बहुमानाची कामगिरी ठरली आहे.या कामासाठी राज्यातून सहा आस्थापनांनी तयारी दर्शविली होती. त्यातून मेघना कोरे यांच्या सूर्या सेन्ट्रल ट्रिटमेन्ट फॅसिलिटी फर्मने बाजी मारली. त्यांचा एमआरके ग्रुप पश्चिम महाराष्ट्रात विविध व्यावसायिक क्षेत्रात अग्रेसर आहे. त्याअंतर्गत सूर्या फर्म काम करते. प्रामुख्याने सेवा क्षेत्रात अनेक वर्षांपासून तिची स्वतंत्र ओळख आहे. व्यवसायाच्या निमित्ताने जगभर फिरणाºया मेघना कोरे यांनी देशोदेशीच्या सेवाक्षेत्राचा जवळून अनुभव घेतला. त्यातून आत्मविश्वास दुणावल्याने थेट राजभवनाचीच जबाबदारी आव्हान म्हणून स्वीकारली आहे. महाराष्ट्राच्या संविधानिक प्रमुखांचे निवासस्थान असणाऱ्या राजभवनाची वास्तू सौंदर्याचा अद्वितीय नमुना आहे. मलबार हिलवर पन्नास एकरांत पसरलेल्या राजभवनाचे व्यवस्थापन ही अभिमानाची आणि तितकीच जबाबदारीचीही कामगिरी आहे. राज्याचे प्रमुख या नात्याने राज्यपालांना भेटण्यासाठी देशोदेशींचे राजदूत, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ सनदी अधिकारी, तसेच उद्योजकांचा दररोज राबता असतो. त्यामुळे राजभवनाची अतिथ्यशीलता अत्यंत जबाबदारीचा भाग ठरते. समुद्राच्या खाºया वाºयामुळे राजभवनातील फ्रेंच बनावटीचे फर्निचर नियमितपणे स्वच्छ करावे लागते. त्यासाठी खास झिलाईगार ठेवावे लागतील. विस्तीर्ण उद्यान पाहण्याऱ्यांचे डोळे निववतात; मात्र त्याचे सौैंदर्य जपण्यासाठी, खुलविण्यासाठी लागणारे परिश्रमही तितकेच मोठे आहेत. उद्यान व्यवस्थापनाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेले माळी त्यासाठी उपलब्ध करावे लागतात. दुर्मीळ वृक्ष, फुलझाडे, लॉन यांची विशेष काळजी घ्यावी लागते.

राजभवनातील दरबार हॉल आणि दिवाणखाना हे सर्वांत महत्त्वाचे भाग आहेत. बहुतांशी राजकीय व प्रशासकीय घडामोडी, बैठका, महत्त्वाच्या भेटीगाठी व सल्लामसलती येथेच होतात. प्रसंगी सरकारचे, मंत्र्यांचे शपथविधीही येथेच होतात. त्यादृष्टीने त्यांचे महत्त्व खूपच मोठे आहे. त्यांचेही व्यवस्थापन केले जाणार आहे. राजभवनाची वास्तू हेरिटेज तथा ऐतिहासिक वारसा स्थळांमध्ये मोडते. त्यामुळे त्याची देखभाल अन्य सामान्य इमारतींसारखी करून चालत नाही. त्यासाठीचे विशेष कौशल्य असणारे कर्मचारी पुरवावे लागणार आहेत. ही सारी कामगिरी आता मेघना कोरे करणार आहेत.

  • स्वातंत्र्यानंतर प्रथमच आऊटसोर्सिंग

राजभवनाचे व्यवस्थापन स्वातंत्र्यकाळापासून शासकीय कर्मचारी करीत आहेत. आता प्रथमच त्याचे आऊटसोर्सिंग करण्यात आले आहे. संवेदनशील अणि महत्त्वाचे विभाग वगळता अन्य विभागांचे व्यवस्थापन आऊटसोर्सिंगचे कर्मचारी करतील. 

कर्तबगारी सिद्ध करून दाखवूराजभवनाचे व्यवस्थापन ही आमच्यासाठी प्रतिष्ठेची व आव्हानात्मक जबाबदारी आहे. महिला म्हणून स्वत:ची कर्तबगारी सिद्ध करून दाखविण्याची संधी, या दृष्टिकोनातून त्याकडे मी पाहते. माहेरच्या आरवाडे आणि सासरच्या कोरे कुटुंबियांनी दिलेला सामाजिक कामांचा वारसा व आत्मविश्वास याकामी उपयोगी पडणार आहे.- मेघना कोरे, सांगली.

टॅग्स :SangliसांगलीMumbaiमुंबई