शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

आतापर्यंत खाणाऱ्यांमुळे सरकार पडले, आता पिकवणाऱ्यांमुळेही सरकार पडेल; बच्चू कडू यांची टीका

By शरद जाधव | Updated: August 24, 2023 16:29 IST

...त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घ्यावा, असे आवाहन आमदार बच्चू कडू यांनी गुरूवारी सांगलीत केले.

सांगली : ऐंशीच्या दशकात कांद्याचे दर वाढल्याने सरकार पडले, वाजपेयी सरकारही याचमुळे पडले. आतापर्यंत खाणाऱ्या वर्गाच्या असंतोषाचा परिणामातून सरकार पडले आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, अडचणीवर बोलायला सरकार अजिबातच तयार नाही. त्यामुळे आतापर्यंत खाणाऱ्यांच्यामुळे सरकार पडल्याचा अनुभव आहे आता पिकवणाऱ्यांच्यामुळेही सरकार पडू शकते. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घ्यावा, असे आवाहन आमदार बच्चू कडू यांनी गुरूवारी सांगलीत केले.

‘दिव्यांग विभाग दिव्यांगांच्या दारी’ अभियानासाठी सांगलीत आलेल्या आ. कडू यांनी पत्रकारांशी संवाद साधतान सरकारच्या भूमिकेवर सडकून टिका केली. आ. कडू म्हणाले की, कांदा आणि टोमॅटोच्या दरवाढीवरून सरकारमध्ये निर्णय घेतले जात आहेत. यात डिसेंबरचा विचार करून कांद्यावर लावण्यात आलेला ४० टक्के अतिरिक्त शुल्काची काहीच गरज नव्हती. तरीही शासनाने हा निर्णय घेतलाच असेलतर आता यातून मिळणारे शुल्क कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाच द्यावे.

सरकारकडून नेहमीच खाणाऱ्याचाच विचार केला जातो. ७५ वर्षांपासून आपण हीच व्यवस्था पाहत आलो आहे. आजवर कधीही पिकवणाऱ्याचा विचार केला जात नाही. त्यामुळेच आतापर्यंतची सरकारे ही खाणाऱ्या वर्गामुळे पडल्याचा अनुभव आपल्याला आहे. अगदी तसेच आता पिकवणाऱ्यांमुळेही पडू शकते. यासाठी शेतकऱ्यांमध्ये मात्र, जागृती होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांची एकजूट राहावी यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.मुळात कांदा खाल्लाच पाहिजे असे काहीच नाही. कांदा न खाल्ल्याने कोणी मरतही नाही. कांद्याऐवजी लसूण खावा अथवा मुळा खावावा. शासनाकडूनच आता प्रत्येक घटकाला खऱ्या न्यायाची प्रतिक्षा असल्याचेही ते म्हणाले.दरवाढीसाठीही हस्तक्षेप कराआ. बच्चू कडू म्हणाले की, जेव्हाही केव्हा शेतमालाचे दर वाढतात. तेव्हा लगेच शासन त्यामध्ये हस्तक्षेप करते. मात्र, ज्यावेळी त्याच शेतमालाचे दर कमी झाले तर ते वाढवावेत आणि शेतकऱ्यांनाही काहीतरी पदरात पडावे यासाठी शासन काही करताना दिसत नाही. 

 

 

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूFarmerशेतकरीGovernmentसरकार