शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आतापर्यंत खाणाऱ्यांमुळे सरकार पडले, आता पिकवणाऱ्यांमुळेही सरकार पडेल; बच्चू कडू यांची टीका

By शरद जाधव | Updated: August 24, 2023 16:29 IST

...त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घ्यावा, असे आवाहन आमदार बच्चू कडू यांनी गुरूवारी सांगलीत केले.

सांगली : ऐंशीच्या दशकात कांद्याचे दर वाढल्याने सरकार पडले, वाजपेयी सरकारही याचमुळे पडले. आतापर्यंत खाणाऱ्या वर्गाच्या असंतोषाचा परिणामातून सरकार पडले आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, अडचणीवर बोलायला सरकार अजिबातच तयार नाही. त्यामुळे आतापर्यंत खाणाऱ्यांच्यामुळे सरकार पडल्याचा अनुभव आहे आता पिकवणाऱ्यांच्यामुळेही सरकार पडू शकते. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घ्यावा, असे आवाहन आमदार बच्चू कडू यांनी गुरूवारी सांगलीत केले.

‘दिव्यांग विभाग दिव्यांगांच्या दारी’ अभियानासाठी सांगलीत आलेल्या आ. कडू यांनी पत्रकारांशी संवाद साधतान सरकारच्या भूमिकेवर सडकून टिका केली. आ. कडू म्हणाले की, कांदा आणि टोमॅटोच्या दरवाढीवरून सरकारमध्ये निर्णय घेतले जात आहेत. यात डिसेंबरचा विचार करून कांद्यावर लावण्यात आलेला ४० टक्के अतिरिक्त शुल्काची काहीच गरज नव्हती. तरीही शासनाने हा निर्णय घेतलाच असेलतर आता यातून मिळणारे शुल्क कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाच द्यावे.

सरकारकडून नेहमीच खाणाऱ्याचाच विचार केला जातो. ७५ वर्षांपासून आपण हीच व्यवस्था पाहत आलो आहे. आजवर कधीही पिकवणाऱ्याचा विचार केला जात नाही. त्यामुळेच आतापर्यंतची सरकारे ही खाणाऱ्या वर्गामुळे पडल्याचा अनुभव आपल्याला आहे. अगदी तसेच आता पिकवणाऱ्यांमुळेही पडू शकते. यासाठी शेतकऱ्यांमध्ये मात्र, जागृती होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांची एकजूट राहावी यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.मुळात कांदा खाल्लाच पाहिजे असे काहीच नाही. कांदा न खाल्ल्याने कोणी मरतही नाही. कांद्याऐवजी लसूण खावा अथवा मुळा खावावा. शासनाकडूनच आता प्रत्येक घटकाला खऱ्या न्यायाची प्रतिक्षा असल्याचेही ते म्हणाले.दरवाढीसाठीही हस्तक्षेप कराआ. बच्चू कडू म्हणाले की, जेव्हाही केव्हा शेतमालाचे दर वाढतात. तेव्हा लगेच शासन त्यामध्ये हस्तक्षेप करते. मात्र, ज्यावेळी त्याच शेतमालाचे दर कमी झाले तर ते वाढवावेत आणि शेतकऱ्यांनाही काहीतरी पदरात पडावे यासाठी शासन काही करताना दिसत नाही. 

 

 

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूFarmerशेतकरीGovernmentसरकार