शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

ऐतिहासिक तटबंदीचे दगड नालाबंडिंगसाठी!

By admin | Updated: August 26, 2014 22:20 IST

बाणूरगड येथील प्रकार : प्रशासनासह पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष

दिलीप मोहिते - विटा --शिवकालीन इतिहासाच्या पाऊलखुणा सांगणाऱ्या खानापूर तालुक्यातील बाणूरगड येथील ऐतिहासिक शिवकालीन तटबंदी व बुरूजांच्या दगडांचा वापर नालाबंडिंगसाठी सुरू केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या बाणूरगड (भूपाळगड) व कोळदुर्ग या दोन किल्ल्यांची मोठी वाताहत झाली असून, येथील शिवकालीन तटबंदी व बुरूजांचे मोठे दगड फोडून या दगडाचे नालाबंडिंग बांधले आहेत. मात्र, प्रशासनाच्या सर्वच विभागांनी या प्रकाराबाबत कानावर हात ठेवले असून ‘ते आमचे कामच नाही’, असे सांगून तक्रार करणाऱ्यांनाच हाकलून लावले असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे प्रशासन व पुरातत्त्व विभागाने या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.खानापूर तालुक्यातील बाणूरगड म्हणजेच भूपाळगड व शुकाचार्य परिसरातील कोळदुर्ग हे दोन किल्ले शिवकालीन आहेत. मात्र, कोळदुर्ग हा किल्ला सध्या नामशेष झाला आहे, तर थोड्या फार इतिहासाच्या पाऊलखुणा सांगणाऱ्या बाणूरगड किल्ल्याची हीच अवस्था होण्याचा धोका निर्माण झाला आहे. बाणूरगड येथे शिवकालीन तटबंदी व मोठे बुरूज आहेत. शासनाची नालाबंडिंग कामे या परिसरात सुरू आहेत. त्यामुळे ऐतिहासिक तटबंदी व बुरूजांच्या मोठ्या दगडांवर घाव घालून या दगडातून नालाबंडिंगची कामे सुरू केली आहेत. दरम्यान, खानापूर येथील ओंकार तोडकर व खंडोजी तोडकर या गडाच्या अभ्यासकांनी बाणूरगड येथे भेट दिली. त्यावेळी ऐतिहासिक तटबंदी व बुरूजांचे मोठे दगड काढून ते फोडून नालाबंडिंगला वापरल्याचे दिसून आले. त्यामुळे तोडकर यांनी तातडीने प्रांताधिकारी व तहसीलदारांना निवेदन देऊन हा प्रकार घडत असल्याचे सांगितले. मात्र, प्रशासनासह पुरातत्त्व विभागाने या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत याबाबत ठोस निर्णय घेतला गेला नसल्याची तक्रार तोडकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली. ऐतिहासिक तटबंदी व बुरूजांची मोठी तोडफोड सुरू असताना पुरातत्त्व विभाग झोपी गेला आहे का? असा संतप्त सवाल नागरिकांतून विचारला जात आहे. बाणूरगड येथे ऐतिहासिक भूपालगड शिवकालीन किल्ला आहे. ऐतिहासिक तटबंदी व बुरूज येथील इतिहासाचे आजही साक्षीदार आहेत. गेल्या दोन महिन्यांपूर्वी बाणूरगड परिसरात गेलो असता, तेथील चिलखती बुरूजाशेजारी चोर दरवाजाचे अवशेष सापडले. त्याठिकाणी जुन्या अनेक बुजलेल्या व पडलेल्या पाऊलवाटाही निदर्शनास आल्या. त्यानंतर काही दिवसांनी मी पुन्हा त्याठिकाणी गेलो असता तेथे असलेल्या ऐतिहासिक तटबंदी व बुरूजाचे दगड फोडून ते नालाबंडिंग व तालीसाठी वापरले जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे मी याबाबत प्रशासनाकडे तक्रार केली; परंतु त्याबाबत प्रशासनाने अद्याप कोणतीही कार्यवाही केली नाही.- ओंकार तोडकर, गडाचे अभ्यासक, खानापूरपुरातत्त्व विभाग गांधारीच्या भूमिकेत खानापूर येथील ऐतिहासिक दर्गा जतन करण्यासाठी पुरातत्त्व विभागाने काम हाती घेतले आहे. दर्गा परिसरात असलेल्या लोकांच्या इमारतींचे अतिक्रमण झाल्याचे सांगत पुरातत्त्व विभागाने अतिक्रमण केलेल्या लोकांवर पोलिसांत गुन्हे दाखल केले; मात्र बाणूरगड येथे शिवकालीन इतिहासाच्या पाऊलखुणा जतन करण्याचा प्रयत्न पुरातत्त्व विभागाकडून होत नसल्याची प्रतिक्रिया उमटू लागली आहे. शासकीय नालाबंडिंग कामासाठी पुरातन बाणूरगड (भूपालगड) किल्ल्याची तटबंदी व बुरूज उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू असताना पुरातत्त्व विभागाने गांधारीची भूमिका का घेतली आहे? असा संतप्त सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.