शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

इस्लामपुरातील 'त्या' विवाहितेचा खून, दोन मुलीच झाल्याच्या रागातून पतीने विहिरीत दिलं ढकलून

By श्रीनिवास नागे | Updated: September 19, 2022 14:00 IST

पहाटे फिरायला जाण्याचा बहाणा करत पत्नी राजनंदिनी हिला आपल्या दुचाकीवरून कापूसखेड रस्त्यावरून घेऊन गेला. अन् विहिरीत ढकलून दिले.

सांगली : इस्लामपूर येथील कोळी मळा परिसरातील विवाहितेचा दोन मुलीच झाल्याच्या कारणातून पतीने विहिरीत ढकलून देत खून केल्याचे उघडकीस आले. ही घटना रविवारी पहाटे सव्वापाचच्या सुमारास घडली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.राजनंदिनी कौस्तुभ सरनोबत (२९) असे खून करण्यात आलेल्या विवाहितेचे नाव आहे. तिचे नातेवाईक मिलिंद नानासाहेब सावंत (२६, रा. रमण मळा, कसबा बावडा, कोल्हापूर) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती कौस्तुभ कृष्णराव सरनोबत (३१, कोळी मळा, इस्लामपूर) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.राजनंदिनीला पहिल्या दोन्ही मुली झाल्याचा राग कौस्तुभच्या मनात होता. त्यातून त्याने रविवारी पहाटे फिरायला जाण्याचा बहाणा करत पत्नी राजनंदिनी हिला आपल्या दुचाकीवरून कापूसखेड रस्त्यावरून घेऊन गेला. कापूसखेड गावच्या हद्दीत रस्त्यापासून ३०-४० फूट अंतरावर असलेल्या शेतात तिला सोबत घेऊन गेला. तेथे त्याने पाण्याने काठोकाठ भरलेल्या विहिरीत राजनंदिनीला ढकलून दिले. तिला पोहता येत नसल्याने तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. उत्तरीय तपासणी केल्यावर तिचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीislampur-acइस्लामपूर