शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

वादळी पावसाचा तडाखा, 5 जण जखमी, घरांचे नुकसान अन् कंपन्यांवरील पत्रेही उडाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 21:41 IST

शनिवार आज रोजी दुपारी चार च्या दरम्यान तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. मात्र, त्यात औद्योगिक वसाहतीमध्ये मोठे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देमुंबई येथील रजनी पोपट यांची कंपनीचे जवळपास ६ हजार स्केअर फूट संपूर्ण इमारत जमीनदोस्त झाली आहे. तर सर्व पत्रे उडून गेले आहेत. घनश्याम माने यांचे एक शेड पूर्ण उडून गेले आहे.

सांगली/शिराळा - येथील औद्योगिक वसाहत आणि भटवाडी गावामध्ये वादळी वाऱ्यासह पडलेल्या पाऊस व वाऱ्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. औद्योगिक वसाहतीतील तीन मुली, एक महिला तर भटवाडी येथील एक महिला असे पाच जण जखमी झाले असून मेघा लक्ष्मण पाटील (वय २३ रा.थावडे,  ता शाहूवाडी जि कोल्हापूर ) या गंभीर जखमी आहेत. रस्त्यावर, सगळीकडे पाणीच पाणी तसेच दूरवर पत्रे उडतानाचे भयावह दृश्य दिसत होते. भटवाडी येथील शेतातील बांध फुटून शेतांचेही ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

शनिवार आज रोजी दुपारी चार च्या दरम्यान तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. मात्र, त्यात औद्योगिक वसाहतीमध्ये मोठे नुकसान झाले आहे. इकोराईज बायो फर्टिलयझर कंपनीची भिंत पडली व पत्रे उडून गेले. त्यामध्ये मेघा पाटील या गंभीर जखमी झाल्या आहेत. तसेच नूतन महादेव डांगे (वय २३, रा.शिराळा), सविता बाजीराव निकम (वय ४०), स्नेहल आनंदराव मस्के (वय २३) यांनाही डोक्यास मार लागून तर नूतन महादेव डांगे (वय २३, रा.शिराळा) यांचे दोन्ही हात फॅक्चर होऊन जखमी झाल्या आहेत. तसेच, घनश्याम आवटे यांच्या ऐज टीव्ही कंपनीचे इमारतीचे पत्रे उडून गेले आणि भिंतही कोसळली. 

मुंबई येथील रजनी पोपट यांची कंपनीचे जवळपास ६ हजार स्केअर फूट संपूर्ण इमारत जमीनदोस्त झाली आहे. तर सर्व पत्रे उडून गेले आहेत. घनश्याम माने यांचे एक शेड पूर्ण उडून गेले आहे. दिलीप पाटील तसेच आणखी एकाच्या राईस मिलचे पत्रे उडून गेले आहेत. त्याचबरोबर आणखी ३-४ कंपन्या ज्यांचे इमारतीचे काम सुरू आहे, अश्या नवीन कंपनीचे शेड उडून गेले आहेत. एक दोन किलोमीटर पत्रे उडून शेतात जाऊन पडले तर काही विद्युत पुरवठा करणाऱ्या तारांवर अडकले होते. पावसामुळे ही दाणादाण उडाली, सर्वत्र रस्त्यावर, कंपनीच्या आवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले.  या औद्योगिक वसाहतीच्या शेजारीच असणाऱ्या भटवाडी गावातील नरसिंह टेक वस्तीमधील १० ते १५ घरांच्या भिंती पडल्या आहेत तर काही घरांचे छत उडून गेले आहेत. तसेच घराचा छत डोक्यावर पडल्याने अर्चना प्रकाश चव्हाण या जखमी झाल्या आहेत. येथील शेतांमध्ये बांध फुटून शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे.

घरांचेही नुकसान

भटवाडी येथील प्रकाश विश्वास चव्हाण, विकास विश्वास चव्हाण, दिपक विश्वास चव्हाण, सुभाष बाळू चव्हाण, हंबीर बाळू चव्हाण, शीला शंकर चव्हाण, युवराज शामराव चव्हाण, राजाराम लक्ष्मण चव्हाण, अकाराम लक्ष्‍मण चव्‍हाण, बाबासो शंकर फडतरे यांच्या घरांचे पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडून गेले आहेत, त्यांच्या घरांचेही नुकसान झाले आहे.  

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसcycloneचक्रीवादळ