शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

वादळी पावसाचा तडाखा, 5 जण जखमी, घरांचे नुकसान अन् कंपन्यांवरील पत्रेही उडाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 21:41 IST

शनिवार आज रोजी दुपारी चार च्या दरम्यान तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. मात्र, त्यात औद्योगिक वसाहतीमध्ये मोठे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देमुंबई येथील रजनी पोपट यांची कंपनीचे जवळपास ६ हजार स्केअर फूट संपूर्ण इमारत जमीनदोस्त झाली आहे. तर सर्व पत्रे उडून गेले आहेत. घनश्याम माने यांचे एक शेड पूर्ण उडून गेले आहे.

सांगली/शिराळा - येथील औद्योगिक वसाहत आणि भटवाडी गावामध्ये वादळी वाऱ्यासह पडलेल्या पाऊस व वाऱ्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. औद्योगिक वसाहतीतील तीन मुली, एक महिला तर भटवाडी येथील एक महिला असे पाच जण जखमी झाले असून मेघा लक्ष्मण पाटील (वय २३ रा.थावडे,  ता शाहूवाडी जि कोल्हापूर ) या गंभीर जखमी आहेत. रस्त्यावर, सगळीकडे पाणीच पाणी तसेच दूरवर पत्रे उडतानाचे भयावह दृश्य दिसत होते. भटवाडी येथील शेतातील बांध फुटून शेतांचेही ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

शनिवार आज रोजी दुपारी चार च्या दरम्यान तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. मात्र, त्यात औद्योगिक वसाहतीमध्ये मोठे नुकसान झाले आहे. इकोराईज बायो फर्टिलयझर कंपनीची भिंत पडली व पत्रे उडून गेले. त्यामध्ये मेघा पाटील या गंभीर जखमी झाल्या आहेत. तसेच नूतन महादेव डांगे (वय २३, रा.शिराळा), सविता बाजीराव निकम (वय ४०), स्नेहल आनंदराव मस्के (वय २३) यांनाही डोक्यास मार लागून तर नूतन महादेव डांगे (वय २३, रा.शिराळा) यांचे दोन्ही हात फॅक्चर होऊन जखमी झाल्या आहेत. तसेच, घनश्याम आवटे यांच्या ऐज टीव्ही कंपनीचे इमारतीचे पत्रे उडून गेले आणि भिंतही कोसळली. 

मुंबई येथील रजनी पोपट यांची कंपनीचे जवळपास ६ हजार स्केअर फूट संपूर्ण इमारत जमीनदोस्त झाली आहे. तर सर्व पत्रे उडून गेले आहेत. घनश्याम माने यांचे एक शेड पूर्ण उडून गेले आहे. दिलीप पाटील तसेच आणखी एकाच्या राईस मिलचे पत्रे उडून गेले आहेत. त्याचबरोबर आणखी ३-४ कंपन्या ज्यांचे इमारतीचे काम सुरू आहे, अश्या नवीन कंपनीचे शेड उडून गेले आहेत. एक दोन किलोमीटर पत्रे उडून शेतात जाऊन पडले तर काही विद्युत पुरवठा करणाऱ्या तारांवर अडकले होते. पावसामुळे ही दाणादाण उडाली, सर्वत्र रस्त्यावर, कंपनीच्या आवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले.  या औद्योगिक वसाहतीच्या शेजारीच असणाऱ्या भटवाडी गावातील नरसिंह टेक वस्तीमधील १० ते १५ घरांच्या भिंती पडल्या आहेत तर काही घरांचे छत उडून गेले आहेत. तसेच घराचा छत डोक्यावर पडल्याने अर्चना प्रकाश चव्हाण या जखमी झाल्या आहेत. येथील शेतांमध्ये बांध फुटून शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे.

घरांचेही नुकसान

भटवाडी येथील प्रकाश विश्वास चव्हाण, विकास विश्वास चव्हाण, दिपक विश्वास चव्हाण, सुभाष बाळू चव्हाण, हंबीर बाळू चव्हाण, शीला शंकर चव्हाण, युवराज शामराव चव्हाण, राजाराम लक्ष्मण चव्हाण, अकाराम लक्ष्‍मण चव्‍हाण, बाबासो शंकर फडतरे यांच्या घरांचे पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडून गेले आहेत, त्यांच्या घरांचेही नुकसान झाले आहे.  

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसcycloneचक्रीवादळ