शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
2
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
3
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
4
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
5
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
6
IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
7
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
8
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
9
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
10
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
11
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
12
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट
13
भारत इलेक्ट्रॉनिक्स ते पॉलीकॅब... 'या' ५ स्टॉक्सवर ब्रोकरेज 'बुलिश'; आगामी काळात तगडा परतावा देणार?
14
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
15
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
16
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
17
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
18
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
19
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
20
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

बेकायदेशीर थकीत कर्ज वसुलीची डोकेदुखी : सांगली वसंतदादा बँक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 01:04 IST

विनातारण, कमी तारण, एकाच तारणावर अनेक कर्जप्रकरणे, दुसऱ्याच्या मालमत्तेवर तिसºयाला कर्ज... अशा अनेक बेकायदेशीर गोष्टींनी व्यापलेली व थकीत गेलेली कर्जप्रकरणे आता अवसायकांसाठी डोकेदुखी

ठळक मुद्देतारण मालमत्तांचाच गोंधळ अधिक; विनातारण, कमी तारण, एकाच तारणावर अनेक कर्जप्रकरणे

अविनाश कोळी ।सांगली : विनातारण, कमी तारण, एकाच तारणावर अनेक कर्जप्रकरणे, दुसऱ्याच्या मालमत्तेवर तिसºयाला कर्ज... अशा अनेक बेकायदेशीर गोष्टींनी व्यापलेली व थकीत गेलेली कर्जप्रकरणे आता अवसायकांसाठी डोकेदुखी ठरणार आहेत. शासनाने एकरकमी परतफेड योजना लागू केली असली तरी, या असुरक्षित कर्जांची वसुली होणार तरी कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

थकीत कर्जाचा १६0 कोटींचा डोंगर सध्या बँकेच्या डोईवर आहे. त्याची जलदगतीने वसुली व्हावी यासाठी सहकार विभागाने एकरकमी परतफेड योजना लागू केली आहे. या योजनेचा लाभ घेणाºया थकबाकीदार कर्जदाराला केवळ ८ टक्के सरसकट व्याज लावण्यात येणार आहे. त्यामुळे अवसायक वसुलीबाबत आशावादी आहेत. त्यांनी संबंधित थकबाकीदारांना आवाहनही केले आहे. त्यास कितपत प्रतिसाद मिळणार, हा आता चर्चेचा विषय आहे. वसंतदादा बँक अवसायनात जाण्यास मुळात ही बेकायदेशीर प्रकरणेच कारणीभूत आहेत.

कर्जप्रकरणे सुरक्षित नसल्याने कोणत्या मालमत्तांची जप्ती करायची?, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. थकबाकीदार बेपत्ता असल्याची फिर्यादही या बँकेला द्यावी लागली आहे. त्यामुळे अशा कर्जप्रकरणात वसुली होणार तरी कशी?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

घोटाळ्यात अडकलेल्या माजी संचालक व अधिकाºयांचा विचार केला, तर त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर वसुली होण्याची शक्यता नाकारता येत नाही. माजी संचालक असलेल्या राजकारण्यांकडून त्यांच्या कारकीर्दीचा विचार करीत, एकरकमी परतफेड योजनेस प्रतिसाद दिला जाऊ शकतो. मात्र अन्य कर्जप्रकरणांची डोकेदुखी मोठी आहे. बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाने चार मोठ्या सहकारी साखर कारखान्यांना दिलेले कर्ज सर्वात जास्त वादग्रस्त बनले आहे. विनातारण, अपुरे तारण आणि थकबाकीत असताना पुन्हा कर्जवितरण, अशा गोष्टींमुळे या साखर कारखान्यांकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी आजअखेर कायम आहे.

अनेक लोकांनी व्यक्तिगत व संस्थांच्या नावे मोठ्या प्रमाणावर कर्ज उचलण्याचे प्रकार केले. कर्जाची थकबाकी असतानाही संबंधित खातेदारांना पुन्हा कर्ज देण्यात आले. काहींना वर्षानुवर्षे मुदतवाढ देण्याचा खेळही केला. एकाच मालमत्ता तारणावर स्वतंत्र दहा संस्थांना कर्जवाटपाची किमयासुद्धा बँकेने केली आहे.शहरातील नामांकित व्यापारी, उद्योजक, राजकीय व्यक्ती, बिल्डर यांच्यावर कर्जरूपाने पैशाची अक्षरश: बरसात करण्यात आली. पाऊस जमिनीत मुरावा, तसे हे पैसे अनेक कर्जदारांनी विविध वाटांनी मुरविण्याचे काम केले. परतफेडीच्या बाबतीत मात्र त्यांनी ठेंगा दर्शविला.कारवाई : झालीच पाहिजे!एकरकमी परतफेड योजनेची मात्रा लागू होईल, अशी आशा अवसायकांसह बँकेप्रती आस्था असणाºयांना व कर्मचाºयांनाही वाटते. थकीत कर्जप्रकरणांचा आढावा घेतला, तर या वसुलीबाबत मोठे प्रश्नचिन्ह डोळ्यासमोर उभे राहते. कारण असुरक्षित कर्जांचाच भरणा यात अधिक आहे. ओटीएस योजनेत संबंधित कर्जदारांनी लाभ घेतला नाही, तर अशा कर्जदारांच्या मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली, तर त्याबाबतही अनेक अडचणी आहेत. काहींच्या मालमत्ता अधिकृतरित्या तारण नाहीत, काहींच्या कर्जाची रक्कम तारण मालमत्तेपेक्षा अधिक आहे. तरीही अशा कर्जदारांवर कोणत्याही माध्यमातून कारवाई व्हावी, अशी अपेक्षा आता व्यक्त होत आहे.चौकशीही रेंगाळलीशासनाने एका बाजूला कर्जवसुलीसाठी एकरकमी परतफेड योजना लागू केली असताना, दुसरीकडे येथील कर्जघोटाळ्यांची कलम ८८ ची सुरू असलेली चौकशीही शासनाच्याच दुर्लक्षामुळे रेंगाळली आहे. चौकशी प्रक्रिया गतीने सुरू असताना, अनेकजणांनी कर्जाचे थकीत पैसे भरण्याची तयारी सुरू केली होती. चौकशीच रेंगाळल्यामुळे आता थकबाकीदारांची मानसिकता बदलताना दिसत आहे. शासनाने चौकशीतून काही अधिकाºयांची नावेही वगळली आहेत. मोठ्या प्रमाणावर अपिले दाखल होत असताना, शासन त्याकडे बघ्याच्या भूमिकेतून पाहत आहे. त्यामुळे कर्जवसुलीच्या अडचणी वाढल्या आहेत.

टॅग्स :bankबँकSangliसांगली