शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

बेकायदेशीर थकीत कर्ज वसुलीची डोकेदुखी : सांगली वसंतदादा बँक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 01:04 IST

विनातारण, कमी तारण, एकाच तारणावर अनेक कर्जप्रकरणे, दुसऱ्याच्या मालमत्तेवर तिसºयाला कर्ज... अशा अनेक बेकायदेशीर गोष्टींनी व्यापलेली व थकीत गेलेली कर्जप्रकरणे आता अवसायकांसाठी डोकेदुखी

ठळक मुद्देतारण मालमत्तांचाच गोंधळ अधिक; विनातारण, कमी तारण, एकाच तारणावर अनेक कर्जप्रकरणे

अविनाश कोळी ।सांगली : विनातारण, कमी तारण, एकाच तारणावर अनेक कर्जप्रकरणे, दुसऱ्याच्या मालमत्तेवर तिसºयाला कर्ज... अशा अनेक बेकायदेशीर गोष्टींनी व्यापलेली व थकीत गेलेली कर्जप्रकरणे आता अवसायकांसाठी डोकेदुखी ठरणार आहेत. शासनाने एकरकमी परतफेड योजना लागू केली असली तरी, या असुरक्षित कर्जांची वसुली होणार तरी कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

थकीत कर्जाचा १६0 कोटींचा डोंगर सध्या बँकेच्या डोईवर आहे. त्याची जलदगतीने वसुली व्हावी यासाठी सहकार विभागाने एकरकमी परतफेड योजना लागू केली आहे. या योजनेचा लाभ घेणाºया थकबाकीदार कर्जदाराला केवळ ८ टक्के सरसकट व्याज लावण्यात येणार आहे. त्यामुळे अवसायक वसुलीबाबत आशावादी आहेत. त्यांनी संबंधित थकबाकीदारांना आवाहनही केले आहे. त्यास कितपत प्रतिसाद मिळणार, हा आता चर्चेचा विषय आहे. वसंतदादा बँक अवसायनात जाण्यास मुळात ही बेकायदेशीर प्रकरणेच कारणीभूत आहेत.

कर्जप्रकरणे सुरक्षित नसल्याने कोणत्या मालमत्तांची जप्ती करायची?, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. थकबाकीदार बेपत्ता असल्याची फिर्यादही या बँकेला द्यावी लागली आहे. त्यामुळे अशा कर्जप्रकरणात वसुली होणार तरी कशी?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

घोटाळ्यात अडकलेल्या माजी संचालक व अधिकाºयांचा विचार केला, तर त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर वसुली होण्याची शक्यता नाकारता येत नाही. माजी संचालक असलेल्या राजकारण्यांकडून त्यांच्या कारकीर्दीचा विचार करीत, एकरकमी परतफेड योजनेस प्रतिसाद दिला जाऊ शकतो. मात्र अन्य कर्जप्रकरणांची डोकेदुखी मोठी आहे. बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाने चार मोठ्या सहकारी साखर कारखान्यांना दिलेले कर्ज सर्वात जास्त वादग्रस्त बनले आहे. विनातारण, अपुरे तारण आणि थकबाकीत असताना पुन्हा कर्जवितरण, अशा गोष्टींमुळे या साखर कारखान्यांकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी आजअखेर कायम आहे.

अनेक लोकांनी व्यक्तिगत व संस्थांच्या नावे मोठ्या प्रमाणावर कर्ज उचलण्याचे प्रकार केले. कर्जाची थकबाकी असतानाही संबंधित खातेदारांना पुन्हा कर्ज देण्यात आले. काहींना वर्षानुवर्षे मुदतवाढ देण्याचा खेळही केला. एकाच मालमत्ता तारणावर स्वतंत्र दहा संस्थांना कर्जवाटपाची किमयासुद्धा बँकेने केली आहे.शहरातील नामांकित व्यापारी, उद्योजक, राजकीय व्यक्ती, बिल्डर यांच्यावर कर्जरूपाने पैशाची अक्षरश: बरसात करण्यात आली. पाऊस जमिनीत मुरावा, तसे हे पैसे अनेक कर्जदारांनी विविध वाटांनी मुरविण्याचे काम केले. परतफेडीच्या बाबतीत मात्र त्यांनी ठेंगा दर्शविला.कारवाई : झालीच पाहिजे!एकरकमी परतफेड योजनेची मात्रा लागू होईल, अशी आशा अवसायकांसह बँकेप्रती आस्था असणाºयांना व कर्मचाºयांनाही वाटते. थकीत कर्जप्रकरणांचा आढावा घेतला, तर या वसुलीबाबत मोठे प्रश्नचिन्ह डोळ्यासमोर उभे राहते. कारण असुरक्षित कर्जांचाच भरणा यात अधिक आहे. ओटीएस योजनेत संबंधित कर्जदारांनी लाभ घेतला नाही, तर अशा कर्जदारांच्या मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली, तर त्याबाबतही अनेक अडचणी आहेत. काहींच्या मालमत्ता अधिकृतरित्या तारण नाहीत, काहींच्या कर्जाची रक्कम तारण मालमत्तेपेक्षा अधिक आहे. तरीही अशा कर्जदारांवर कोणत्याही माध्यमातून कारवाई व्हावी, अशी अपेक्षा आता व्यक्त होत आहे.चौकशीही रेंगाळलीशासनाने एका बाजूला कर्जवसुलीसाठी एकरकमी परतफेड योजना लागू केली असताना, दुसरीकडे येथील कर्जघोटाळ्यांची कलम ८८ ची सुरू असलेली चौकशीही शासनाच्याच दुर्लक्षामुळे रेंगाळली आहे. चौकशी प्रक्रिया गतीने सुरू असताना, अनेकजणांनी कर्जाचे थकीत पैसे भरण्याची तयारी सुरू केली होती. चौकशीच रेंगाळल्यामुळे आता थकबाकीदारांची मानसिकता बदलताना दिसत आहे. शासनाने चौकशीतून काही अधिकाºयांची नावेही वगळली आहेत. मोठ्या प्रमाणावर अपिले दाखल होत असताना, शासन त्याकडे बघ्याच्या भूमिकेतून पाहत आहे. त्यामुळे कर्जवसुलीच्या अडचणी वाढल्या आहेत.

टॅग्स :bankबँकSangliसांगली