शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

बेकायदेशीर थकीत कर्ज वसुलीची डोकेदुखी : सांगली वसंतदादा बँक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 01:04 IST

विनातारण, कमी तारण, एकाच तारणावर अनेक कर्जप्रकरणे, दुसऱ्याच्या मालमत्तेवर तिसºयाला कर्ज... अशा अनेक बेकायदेशीर गोष्टींनी व्यापलेली व थकीत गेलेली कर्जप्रकरणे आता अवसायकांसाठी डोकेदुखी

ठळक मुद्देतारण मालमत्तांचाच गोंधळ अधिक; विनातारण, कमी तारण, एकाच तारणावर अनेक कर्जप्रकरणे

अविनाश कोळी ।सांगली : विनातारण, कमी तारण, एकाच तारणावर अनेक कर्जप्रकरणे, दुसऱ्याच्या मालमत्तेवर तिसºयाला कर्ज... अशा अनेक बेकायदेशीर गोष्टींनी व्यापलेली व थकीत गेलेली कर्जप्रकरणे आता अवसायकांसाठी डोकेदुखी ठरणार आहेत. शासनाने एकरकमी परतफेड योजना लागू केली असली तरी, या असुरक्षित कर्जांची वसुली होणार तरी कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

थकीत कर्जाचा १६0 कोटींचा डोंगर सध्या बँकेच्या डोईवर आहे. त्याची जलदगतीने वसुली व्हावी यासाठी सहकार विभागाने एकरकमी परतफेड योजना लागू केली आहे. या योजनेचा लाभ घेणाºया थकबाकीदार कर्जदाराला केवळ ८ टक्के सरसकट व्याज लावण्यात येणार आहे. त्यामुळे अवसायक वसुलीबाबत आशावादी आहेत. त्यांनी संबंधित थकबाकीदारांना आवाहनही केले आहे. त्यास कितपत प्रतिसाद मिळणार, हा आता चर्चेचा विषय आहे. वसंतदादा बँक अवसायनात जाण्यास मुळात ही बेकायदेशीर प्रकरणेच कारणीभूत आहेत.

कर्जप्रकरणे सुरक्षित नसल्याने कोणत्या मालमत्तांची जप्ती करायची?, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. थकबाकीदार बेपत्ता असल्याची फिर्यादही या बँकेला द्यावी लागली आहे. त्यामुळे अशा कर्जप्रकरणात वसुली होणार तरी कशी?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

घोटाळ्यात अडकलेल्या माजी संचालक व अधिकाºयांचा विचार केला, तर त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर वसुली होण्याची शक्यता नाकारता येत नाही. माजी संचालक असलेल्या राजकारण्यांकडून त्यांच्या कारकीर्दीचा विचार करीत, एकरकमी परतफेड योजनेस प्रतिसाद दिला जाऊ शकतो. मात्र अन्य कर्जप्रकरणांची डोकेदुखी मोठी आहे. बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाने चार मोठ्या सहकारी साखर कारखान्यांना दिलेले कर्ज सर्वात जास्त वादग्रस्त बनले आहे. विनातारण, अपुरे तारण आणि थकबाकीत असताना पुन्हा कर्जवितरण, अशा गोष्टींमुळे या साखर कारखान्यांकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी आजअखेर कायम आहे.

अनेक लोकांनी व्यक्तिगत व संस्थांच्या नावे मोठ्या प्रमाणावर कर्ज उचलण्याचे प्रकार केले. कर्जाची थकबाकी असतानाही संबंधित खातेदारांना पुन्हा कर्ज देण्यात आले. काहींना वर्षानुवर्षे मुदतवाढ देण्याचा खेळही केला. एकाच मालमत्ता तारणावर स्वतंत्र दहा संस्थांना कर्जवाटपाची किमयासुद्धा बँकेने केली आहे.शहरातील नामांकित व्यापारी, उद्योजक, राजकीय व्यक्ती, बिल्डर यांच्यावर कर्जरूपाने पैशाची अक्षरश: बरसात करण्यात आली. पाऊस जमिनीत मुरावा, तसे हे पैसे अनेक कर्जदारांनी विविध वाटांनी मुरविण्याचे काम केले. परतफेडीच्या बाबतीत मात्र त्यांनी ठेंगा दर्शविला.कारवाई : झालीच पाहिजे!एकरकमी परतफेड योजनेची मात्रा लागू होईल, अशी आशा अवसायकांसह बँकेप्रती आस्था असणाºयांना व कर्मचाºयांनाही वाटते. थकीत कर्जप्रकरणांचा आढावा घेतला, तर या वसुलीबाबत मोठे प्रश्नचिन्ह डोळ्यासमोर उभे राहते. कारण असुरक्षित कर्जांचाच भरणा यात अधिक आहे. ओटीएस योजनेत संबंधित कर्जदारांनी लाभ घेतला नाही, तर अशा कर्जदारांच्या मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली, तर त्याबाबतही अनेक अडचणी आहेत. काहींच्या मालमत्ता अधिकृतरित्या तारण नाहीत, काहींच्या कर्जाची रक्कम तारण मालमत्तेपेक्षा अधिक आहे. तरीही अशा कर्जदारांवर कोणत्याही माध्यमातून कारवाई व्हावी, अशी अपेक्षा आता व्यक्त होत आहे.चौकशीही रेंगाळलीशासनाने एका बाजूला कर्जवसुलीसाठी एकरकमी परतफेड योजना लागू केली असताना, दुसरीकडे येथील कर्जघोटाळ्यांची कलम ८८ ची सुरू असलेली चौकशीही शासनाच्याच दुर्लक्षामुळे रेंगाळली आहे. चौकशी प्रक्रिया गतीने सुरू असताना, अनेकजणांनी कर्जाचे थकीत पैसे भरण्याची तयारी सुरू केली होती. चौकशीच रेंगाळल्यामुळे आता थकबाकीदारांची मानसिकता बदलताना दिसत आहे. शासनाने चौकशीतून काही अधिकाºयांची नावेही वगळली आहेत. मोठ्या प्रमाणावर अपिले दाखल होत असताना, शासन त्याकडे बघ्याच्या भूमिकेतून पाहत आहे. त्यामुळे कर्जवसुलीच्या अडचणी वाढल्या आहेत.

टॅग्स :bankबँकSangliसांगली