शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

मूठभर मराठा सत्ताधाऱ्यांनीच मराठा समाजाला गरीब ठेवले : सदाभाऊ खोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 20:33 IST

इस्लामपूर : सध्या राज्यभरात मराठा आरक्षणाचा विषय संवेदनशील बनला आहे. आरक्षण मिळावे ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही इच्छा आहे. राज्यात-देशात काही मूठभर मराठा घराण्यांच्या हाती सत्ता होती, त्यावेळी त्यांनी न्याय दिला नाही. मराठा समाजाला जाणीवपूर्वक गरीब ठेवण्याचे काम याच मराठा संस्थानिकांनी केले, अशी टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शनिवारी ...

ठळक मुद्देआंदोलनाच्या आडून कॉँग्रेस-राष्टवादी स्वत:ची पोळी भाजून घेत आहेत.

इस्लामपूर : सध्या राज्यभरात मराठा आरक्षणाचा विषय संवेदनशील बनला आहे. आरक्षण मिळावे ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही इच्छा आहे. राज्यात-देशात काही मूठभर मराठा घराण्यांच्या हाती सत्ता होती, त्यावेळी त्यांनी न्याय दिला नाही. मराठा समाजाला जाणीवपूर्वक गरीब ठेवण्याचे काम याच मराठा संस्थानिकांनी केले, अशी टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शनिवारी केली.

आरक्षणापासून वंचित असणाºयांच्या पाठीशी सरकार आहे. त्यामुळे आरक्षण प्रक्रियेत मराठा समाजाने सहभागी होताना आत्महत्या किंवा हिंसक मार्गाचा स्वीकार करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

इस्लामपूर येथे आपल्या निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, पूर्वीच्या आघाडी सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जाता-जाता अध्यादेशाद्वारे दिलेले आरक्षण टिकणार नाही, याची माहिती त्यांना होती. त्यांना आरक्षण द्यायचे होते तर सभागृहात विधेयक का आणले नाही? त्याउलट मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात विधेयक मांडून त्याला मंजुरी घेतली. त्यालाही न्यायालयात स्थगिती मिळाली. पुन्हा गुणवत्तेवर आरक्षण देण्याची माहिती न्यायालयात सादर करून मागासवर्गीय आयोगाची स्थापना केली.

खोत म्हणाले, या आयोगाने आतापर्यंत राज्यातील १ लाख ८६ हजार नागरिकांच्या साक्षी नोंदवत लेखी निवेदनेही घेतली आहेत. सॅँपल सर्व्हे सादर झाला आहे. तज्ज्ञांच्या समितीमार्फत या साक्षी व निवेदनांची छाननी करून त्याचा अहवाल आयोगाकडून सरकारला सादर होईल. राज्यातला शेतकरी हा कुणबीच आहे. त्यासाठी शिवकालीन काळापासूनचे पुरावे जमा केले आहेत. मराठा समाजाला कायदेशीरपणे टिकणारे आरक्षण देण्याबाबत गतीने काम सुरू आहे. मराठा समाजाने या प्रक्रियेत सहभागी व्हावे. आत्महत्या करणे अथवा हिंसक मार्ग स्वीकारू नये. आंदोलनाच्या आडून कॉँग्रेस-राष्टवादी स्वत:ची पोळी भाजून घेत आहेत.

मराठा समाजातील संस्थानिक नेत्यांनी सर्व संस्था आपल्या ताब्यात ठेवून समाजाला नागवले, वेठीस धरले. चारी बाजूंनी समाजाची कोंडी केली. स्वत: सत्ता भोगताना समाजाला मात्र जाणीवपूर्वक गरीब ठेवले. सत्तेवरून घालवल्यानंतर त्यांनी श्रावण बाळाचा अवतार घेतला आहे. ते आता कावड घेऊन काशीला निघाले आहेत, असा टोला सदाभाऊ खोत यांनी विरोधकांना मारला.यावेळी पं. स. सदस्य राहुल महाडिक, विकास आघाडीचे नेते विक्रम पाटील, माजी जि. प. सदस्य सम्राट महाडिक, जि. प. सदस्य जगन्नाथ माळी, अ‍ॅड. पोपट पवार उपस्थित होते.

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत PoliticsराजकारणSangliसांगलीmarathaमराठा