शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

चांदोली धरणात साडेपाच टीएमसी उपयुक्त पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 19:23 IST

चांदोली धरणात सध्या केवळ साडेपाच टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्याची टक्केवारी १९.९३ अशी आहे. आठ दिवसांत एक टीएमसी पाणी वापर झाला आहे.

वारणावती : चांदोली धरणात सध्या केवळ साडेपाच टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्याची टक्केवारी १९.९३ अशी आहे. आठ दिवसांत एक टीएमसी पाणी वापर झाला आहे.

शिराळा तालुक्याचे पश्चिम विभागातील चांदोली धरण पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने भरलेले असते. पावसाचे आगार असलेल्या भागात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच आहे. दुष्काळी भागातील शेती व पिण्याच्या पाण्यासाठी वारणा धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. तर कालव्याद्वारे शेतीसाठी व वाकुर्डे योजनेसाठी गेल्या महिन्याभरापासून पाणी सोडले आहे.

धरणात ८ मे रोजी पाणी पातळी ५९९.५० मीटर आहे. पाणीसाठा १५५.३० दशलक्ष घनमीटर म्हणजे ५.४८ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे, तर मृतसंचय (डेडवॉटर) ६.८८ टीएमसी पाणीसाठा आहे. कालव्याद्वारे २०० क्युसेक व वारणा नदीपात्रात ११६५ क्युसेक असा एकूण १३६५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.ही वस्तुस्थिती अशीच राहिल्यास येत्या काही दिवसांत धरणाच्या पाण्याने तळ गाठलेला असेल.

टॅग्स :DamधरणSangliसांगली