शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

चांदोली धरणात साडेपाच टीएमसी उपयुक्त पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 19:23 IST

चांदोली धरणात सध्या केवळ साडेपाच टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्याची टक्केवारी १९.९३ अशी आहे. आठ दिवसांत एक टीएमसी पाणी वापर झाला आहे.

वारणावती : चांदोली धरणात सध्या केवळ साडेपाच टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्याची टक्केवारी १९.९३ अशी आहे. आठ दिवसांत एक टीएमसी पाणी वापर झाला आहे.

शिराळा तालुक्याचे पश्चिम विभागातील चांदोली धरण पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने भरलेले असते. पावसाचे आगार असलेल्या भागात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच आहे. दुष्काळी भागातील शेती व पिण्याच्या पाण्यासाठी वारणा धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. तर कालव्याद्वारे शेतीसाठी व वाकुर्डे योजनेसाठी गेल्या महिन्याभरापासून पाणी सोडले आहे.

धरणात ८ मे रोजी पाणी पातळी ५९९.५० मीटर आहे. पाणीसाठा १५५.३० दशलक्ष घनमीटर म्हणजे ५.४८ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे, तर मृतसंचय (डेडवॉटर) ६.८८ टीएमसी पाणीसाठा आहे. कालव्याद्वारे २०० क्युसेक व वारणा नदीपात्रात ११६५ क्युसेक असा एकूण १३६५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.ही वस्तुस्थिती अशीच राहिल्यास येत्या काही दिवसांत धरणाच्या पाण्याने तळ गाठलेला असेल.

टॅग्स :DamधरणSangliसांगली