शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
2
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
3
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
4
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
5
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
6
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
7
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
8
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?
9
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
10
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
13
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
14
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
15
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
16
"लोकांना हाच समज आहे की माझं लग्नच झालं होतं..", भाग्यश्री मोटे मोडलेल्या नात्यावर स्पष्टच बोलली
17
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
18
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
19
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
20
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...

पालकमंत्रीच म्हणतात सांगलीत कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा, पोलीस अधिकाऱ्यांना दिला इशारा

By श्रीनिवास नागे | Updated: September 30, 2022 16:27 IST

मोठे उद्योग राज्याबाहेर गेल्यानंतर पंतप्रधान राज्याला मोठा प्रकल्प देण्याचे गाजर दाखवत असल्याची विरोधक टीका करीत आहेत. यावर मंत्री खाडे यांनी पंतप्रधान मोदी गाजर दाखवत नाहीत, ते विरोधकांना बांबूच दाखवतात, असे सांगितले.

सांगली : जिल्ह्यात खून, चोऱ्या घरफोड्या, अवैध व्यवसायांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून पोलिसांसाठी हे शोभनीय नाही, असे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी मिरजेत पत्रकार परिषदेत सांगितले. जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांनी यात सुधारणा करावी अन्यथा गृहविभागाला कळविणार असल्याचा इशारा खाडे यांनी दिला.पालकमंत्री खाडे यांनी जिल्ह्यातील नियोजन समितीसह सर्व शासकीय समित्या बरखास्त करण्यात आल्या असून नवीन समित्यांवर भाजप व शिंदे गटाच्या कार्यकर्त्याच्या निवडी करण्यात येणार असल्याचे सांगितले. जिल्हा नियोजन समितीने यापूर्वी मंजुरी दिलेल्या कामांना स्थगिती दिली आहे, मात्र त्यातील जनतेसाठी आवश्यक असलेली कामे सुरु करण्यात येतील. कामगारमंत्री म्हणून पूर्वीच्या कोणत्याही योजनांना स्थगिती दिलेली नाही. प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन व कामगारांसाठी रुग्णालय उभारण्यात येणार आहे. संघटित कामगारांसाठी घरकुल योजना राबविण्यात येणार असून प्रधानमंत्री आवास योजनेतून पावणेतीन लाख कामगार मंत्रालयाकडून दोन लाख रुपये कामगारांच्या घरांसाठी देण्यात येतील. यापेक्षा अधिक लागणारी रक्कम कामगारांना कर्जरुपाने देण्याची योजना आहे. कामगारांना प्रशिक्षण व त्यांची परीक्षा घेण्याची योजना राबविण्यात येणार असल्याचेही मंत्री खाडे यांनी सांगितले.महाविकास आघाडी शासनाने माझ्या मिरज मतदारसंघासाठी अडीच वर्षात काहीच निधी दिला नाही.मात्र मी मंत्री झाल्यानंतर अडीच महिन्यात तब्बल ९२ कोटी रुपये विकासनिधी आणला आहे. यात मिरज सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत सेवा रस्त्यांसाठी ३२ कोटी व प्रमुख जिल्हा मार्ग, राज्यमार्ग, महापालिका क्षेत्रात रस्त्यांसाठी ५५ कोटी व ग्रामीण भागात मुलभूत सोयीसुविधांसाठी ५ कोटी रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती मंत्री खाडे यांनी दिली.पंतप्रधान मोदी गाजर नाही, विरोधकांना बांबूच दाखवतात!मोठे उद्योग राज्याबाहेर गेल्यानंतर पंतप्रधान राज्याला मोठा प्रकल्प देण्याचे गाजर दाखवत असल्याची विरोधक टीका करीत आहेत. यावर मंत्री खाडे यांनी पंतप्रधान मोदी गाजर दाखवत नाहीत, ते विरोधकांना बांबूच दाखवतात, असे सांगितले. उद्योग बाहेर जाण्यास पूर्वीचे सरकारच कारणीभूत असल्याचे त्यांनी सांगितले. भाजप शिंदे गटाचे सरकार पुढील २५ वर्षे टिकेल व मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता येईल. सांगलीत पूर्वीच्या पालकमंत्र्यांनी नियोजन समिती बैठकीस पाचारण केले नसल्याच्या आ. गोपीचंद पडळकर यांच्या तक्रारीबाबत विचारणा केली असता जिल्हाधिकारी जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींना बैठकीस आमंत्रण देत असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीguardian ministerपालक मंत्रीPoliceपोलिस