शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

पालकमंत्रीच म्हणतात सांगलीत कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा, पोलीस अधिकाऱ्यांना दिला इशारा

By श्रीनिवास नागे | Updated: September 30, 2022 16:27 IST

मोठे उद्योग राज्याबाहेर गेल्यानंतर पंतप्रधान राज्याला मोठा प्रकल्प देण्याचे गाजर दाखवत असल्याची विरोधक टीका करीत आहेत. यावर मंत्री खाडे यांनी पंतप्रधान मोदी गाजर दाखवत नाहीत, ते विरोधकांना बांबूच दाखवतात, असे सांगितले.

सांगली : जिल्ह्यात खून, चोऱ्या घरफोड्या, अवैध व्यवसायांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून पोलिसांसाठी हे शोभनीय नाही, असे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी मिरजेत पत्रकार परिषदेत सांगितले. जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांनी यात सुधारणा करावी अन्यथा गृहविभागाला कळविणार असल्याचा इशारा खाडे यांनी दिला.पालकमंत्री खाडे यांनी जिल्ह्यातील नियोजन समितीसह सर्व शासकीय समित्या बरखास्त करण्यात आल्या असून नवीन समित्यांवर भाजप व शिंदे गटाच्या कार्यकर्त्याच्या निवडी करण्यात येणार असल्याचे सांगितले. जिल्हा नियोजन समितीने यापूर्वी मंजुरी दिलेल्या कामांना स्थगिती दिली आहे, मात्र त्यातील जनतेसाठी आवश्यक असलेली कामे सुरु करण्यात येतील. कामगारमंत्री म्हणून पूर्वीच्या कोणत्याही योजनांना स्थगिती दिलेली नाही. प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन व कामगारांसाठी रुग्णालय उभारण्यात येणार आहे. संघटित कामगारांसाठी घरकुल योजना राबविण्यात येणार असून प्रधानमंत्री आवास योजनेतून पावणेतीन लाख कामगार मंत्रालयाकडून दोन लाख रुपये कामगारांच्या घरांसाठी देण्यात येतील. यापेक्षा अधिक लागणारी रक्कम कामगारांना कर्जरुपाने देण्याची योजना आहे. कामगारांना प्रशिक्षण व त्यांची परीक्षा घेण्याची योजना राबविण्यात येणार असल्याचेही मंत्री खाडे यांनी सांगितले.महाविकास आघाडी शासनाने माझ्या मिरज मतदारसंघासाठी अडीच वर्षात काहीच निधी दिला नाही.मात्र मी मंत्री झाल्यानंतर अडीच महिन्यात तब्बल ९२ कोटी रुपये विकासनिधी आणला आहे. यात मिरज सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत सेवा रस्त्यांसाठी ३२ कोटी व प्रमुख जिल्हा मार्ग, राज्यमार्ग, महापालिका क्षेत्रात रस्त्यांसाठी ५५ कोटी व ग्रामीण भागात मुलभूत सोयीसुविधांसाठी ५ कोटी रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती मंत्री खाडे यांनी दिली.पंतप्रधान मोदी गाजर नाही, विरोधकांना बांबूच दाखवतात!मोठे उद्योग राज्याबाहेर गेल्यानंतर पंतप्रधान राज्याला मोठा प्रकल्प देण्याचे गाजर दाखवत असल्याची विरोधक टीका करीत आहेत. यावर मंत्री खाडे यांनी पंतप्रधान मोदी गाजर दाखवत नाहीत, ते विरोधकांना बांबूच दाखवतात, असे सांगितले. उद्योग बाहेर जाण्यास पूर्वीचे सरकारच कारणीभूत असल्याचे त्यांनी सांगितले. भाजप शिंदे गटाचे सरकार पुढील २५ वर्षे टिकेल व मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता येईल. सांगलीत पूर्वीच्या पालकमंत्र्यांनी नियोजन समिती बैठकीस पाचारण केले नसल्याच्या आ. गोपीचंद पडळकर यांच्या तक्रारीबाबत विचारणा केली असता जिल्हाधिकारी जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींना बैठकीस आमंत्रण देत असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीguardian ministerपालक मंत्रीPoliceपोलिस