शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
2
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
3
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
4
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
5
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
6
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
7
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
8
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा
9
७ सीटर Kia Carens CNG मध्ये झाली लॉन्च; जाणून घ्या फिचर्स अन् किंमत, Ertiga ला देणार टक्कर
10
Video: ७ महिन्याच्या गर्भवतीनं उचललं तब्बल १४५ किलो वजन; कसा अन् कुणी केला हा पराक्रम?
11
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?
12
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
13
अस्थिर बाजारात 'सुझलॉन'ची मोठी झेप! तिमाही निकालापूर्वीच भाव वाढला; दुसऱ्यांदा मल्टीबॅगर ठरणार?
14
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
15
‘त्यांनी आपल्या २ मुली पळवल्या तर तुम्ही त्यांच्या १० जणीं घेऊन या’, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान  
16
अर्जुन तेंडुलकर चमकला; पण 'या' गोलंदाजाने दिला त्रास! रन काढू दिलीच नाही, विकेटही घेतली...
17
महागडे मोबाइल अन् मोठे टीव्हीच हवेत; या दिवाळीत 'प्रीमियम' खरेदीचा नवा पॅटर्न समोर
18
कोण आहे रंजना प्रकाश देसाई?; ज्यांना ८ व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी
19
रणबीरच्या 'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयचीही भूमिका, अभिनेत्याने दान केलं मानधन; म्हणाला...
20
बाजारात मोठी अस्थिरता! सेंसेक्स-निफ्टी सपाट पातळीवर बंद; महिंद्रा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले

पालकमंत्रीच म्हणतात सांगलीत कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा, पोलीस अधिकाऱ्यांना दिला इशारा

By श्रीनिवास नागे | Updated: September 30, 2022 16:27 IST

मोठे उद्योग राज्याबाहेर गेल्यानंतर पंतप्रधान राज्याला मोठा प्रकल्प देण्याचे गाजर दाखवत असल्याची विरोधक टीका करीत आहेत. यावर मंत्री खाडे यांनी पंतप्रधान मोदी गाजर दाखवत नाहीत, ते विरोधकांना बांबूच दाखवतात, असे सांगितले.

सांगली : जिल्ह्यात खून, चोऱ्या घरफोड्या, अवैध व्यवसायांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून पोलिसांसाठी हे शोभनीय नाही, असे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी मिरजेत पत्रकार परिषदेत सांगितले. जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांनी यात सुधारणा करावी अन्यथा गृहविभागाला कळविणार असल्याचा इशारा खाडे यांनी दिला.पालकमंत्री खाडे यांनी जिल्ह्यातील नियोजन समितीसह सर्व शासकीय समित्या बरखास्त करण्यात आल्या असून नवीन समित्यांवर भाजप व शिंदे गटाच्या कार्यकर्त्याच्या निवडी करण्यात येणार असल्याचे सांगितले. जिल्हा नियोजन समितीने यापूर्वी मंजुरी दिलेल्या कामांना स्थगिती दिली आहे, मात्र त्यातील जनतेसाठी आवश्यक असलेली कामे सुरु करण्यात येतील. कामगारमंत्री म्हणून पूर्वीच्या कोणत्याही योजनांना स्थगिती दिलेली नाही. प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन व कामगारांसाठी रुग्णालय उभारण्यात येणार आहे. संघटित कामगारांसाठी घरकुल योजना राबविण्यात येणार असून प्रधानमंत्री आवास योजनेतून पावणेतीन लाख कामगार मंत्रालयाकडून दोन लाख रुपये कामगारांच्या घरांसाठी देण्यात येतील. यापेक्षा अधिक लागणारी रक्कम कामगारांना कर्जरुपाने देण्याची योजना आहे. कामगारांना प्रशिक्षण व त्यांची परीक्षा घेण्याची योजना राबविण्यात येणार असल्याचेही मंत्री खाडे यांनी सांगितले.महाविकास आघाडी शासनाने माझ्या मिरज मतदारसंघासाठी अडीच वर्षात काहीच निधी दिला नाही.मात्र मी मंत्री झाल्यानंतर अडीच महिन्यात तब्बल ९२ कोटी रुपये विकासनिधी आणला आहे. यात मिरज सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत सेवा रस्त्यांसाठी ३२ कोटी व प्रमुख जिल्हा मार्ग, राज्यमार्ग, महापालिका क्षेत्रात रस्त्यांसाठी ५५ कोटी व ग्रामीण भागात मुलभूत सोयीसुविधांसाठी ५ कोटी रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती मंत्री खाडे यांनी दिली.पंतप्रधान मोदी गाजर नाही, विरोधकांना बांबूच दाखवतात!मोठे उद्योग राज्याबाहेर गेल्यानंतर पंतप्रधान राज्याला मोठा प्रकल्प देण्याचे गाजर दाखवत असल्याची विरोधक टीका करीत आहेत. यावर मंत्री खाडे यांनी पंतप्रधान मोदी गाजर दाखवत नाहीत, ते विरोधकांना बांबूच दाखवतात, असे सांगितले. उद्योग बाहेर जाण्यास पूर्वीचे सरकारच कारणीभूत असल्याचे त्यांनी सांगितले. भाजप शिंदे गटाचे सरकार पुढील २५ वर्षे टिकेल व मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता येईल. सांगलीत पूर्वीच्या पालकमंत्र्यांनी नियोजन समिती बैठकीस पाचारण केले नसल्याच्या आ. गोपीचंद पडळकर यांच्या तक्रारीबाबत विचारणा केली असता जिल्हाधिकारी जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींना बैठकीस आमंत्रण देत असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीguardian ministerपालक मंत्रीPoliceपोलिस