शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
2
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
3
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा
4
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
5
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
6
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
7
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
8
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
9
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
10
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
11
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
12
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
13
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
14
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
15
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
16
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
17
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
18
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
19
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
20
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'

जिल्ह्यात तृणभक्षी वन्यप्राण्यांत वाढ--वन कायद्याचा धाक आणि उपाययोजनांचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2017 10:21 PM

कुपवाड : सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि दुष्काळी पट्ट्यातील खुरट्या वनस्पतींनी व्यापलेल्या जिल्ह्यातील वन विभागाच्या परिक्षेत्रात वन्यजीवांच्या संख्येत गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे पंधरा टक्के वाढ

ठळक मुद्दे नागरिकांनी या प्राण्यांना आपले मित्र म्हणून वागणूक द्यावीप्रगणनेवेळी मागीलवर्षी सहाशे वन्यप्राणी आढळून आले

महालिंग सलगर ।लोकमत न्यूज नेटवर्ककुपवाड : सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि दुष्काळी पट्ट्यातील खुरट्या वनस्पतींनी व्यापलेल्या जिल्ह्यातील वन विभागाच्या परिक्षेत्रात वन्यजीवांच्या संख्येत गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे पंधरा टक्के वाढ झाली आहे. वन विभागाच्या उपाययोजना आणि वन कायद्याच्या धाकामुळे ही वाढ होऊ लागली आहे. या वन विभागाच्या सर्वेक्षणात मांसभक्षी प्राण्यांबरोबरच तृणभक्षी प्राण्यांचीही वाढ झाली आहे. रानडुक्कर, ससा, वानर या प्राण्यांची संख्या तर सततच वाढू लागली आहे.

जिल्ह्यात वन विभागाच्या अधिपत्याखाली ४२ हजार हेक्टर वनक्षेत्र कार्यरत आहे. हे वनक्षेत्र एकूण भौगोलिक क्षेत्राच्या तुलनेत पाच टक्के आहे. या वनक्षेत्रामध्ये सह्याद्रीच्या पर्वतरांगांवरील हरित वृक्ष आणि दुष्काळी पट्ट्यातील खुरट्या वनस्पतींनी व्यापलेल्या जिल्ह्यातील वनांचा समावेश आहे. या वृक्षांमध्ये लिंब, बाभूळ, खैर, बोर, करंज आदी वृक्षांचा समावेश आहे. वन विभागाच्या अखत्यारित जिल्ह्यात एका बाजूला सधन आणि एका बाजूला दुष्काळी पट्ट्यांचा समावेश आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील वनक्षेत्रात या प्रकारचे वृक्ष आढळून येतात.

जिल्ह्यातील वनक्षेत्रात वन विभागाच्या उपाययोजना आणि वन कायद्याच्या धाकामुळे वन्यप्राण्यांच्या संख्येत चांगली वाढ होऊ लागली आहे. यामध्ये मांसभक्षी प्राण्यांबरोबर तृणभक्षी प्राण्यांचीही वाढ चांगल्या प्रमाणात होऊ लागली आहे.

जिल्ह्यात शिराळा, खानापूर-विटा, आटपाडी, जत, कडेगाव, सांगली या वन परिक्षेत्राचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक प्राणी असलेल्या वन परिक्षेत्रामध्ये खानापूर-विटा या तालुक्याचा क्रमांक लागतो, तर सर्वात कमी संख्या असलेल्या वन परिक्षेत्रामध्ये सांगलीचा समावेश होतो. प्रगणनेवेळी मागीलवर्षी सहाशे वन्यप्राणी आढळून आले, तर यंदा करण्यात आलेल्या प्रगणनेवेळी ६७४ वन्यप्राणी आढळून आले.

वन विभागाकडून जंगलातील पाणवठे आणि वन्यप्राण्यांचा अधिवास असलेल्या ठिकाणांवरील प्राण्यांच्या पायांच्या ठशांवरून ही गणना केली आहे. जिल्ह्यातील सर्वेक्षणात रानडुक्कर, ससा, वानर, माकड, कोल्हा, साळिंदर, गवा, लांडगा, शेकरू या वन्यप्राण्यांचा समावेश आढळून आला आहे. वन विभाग क्षेत्रात रानडुक्कर, ससा, वानर या प्राण्यांची संख्या सतत वाढत आहे.नदीकिनाºयावर १५ मगरी आढळल्या...सांगली आणि शिराळा वन परिक्षेत्रामध्ये नदीकिनाºयावर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात वन विभागाला सुमारे १५ मगरी आढळून आल्याचीही माहिती संबंधित वन परिक्षेत्र विभागातून मिळाली. या प्राण्यांकडून मानवावर हल्ले होऊ नयेत म्हणून हे वन्यप्राणी आढळल्यास त्यांना सुरक्षित ठिकाण असलेल्या त्यांच्या अधिवास क्षेत्रात सोडण्याचे कामही वन विभागाकडून केले जात आहे.काटेकोर अंमलबजावणीवन्यप्राण्यांचा वावर आढळून आल्यावर या वन्यप्राण्यांना त्यांच्या अधिवासात सुरक्षित ठिकाणी सोडले जात आहे. तसेच वन्यप्राण्यांकडून मानवाची हत्या झाल्यास त्वरित आठ लाखांची मदत दिली जाऊ लागली आहे. अपंगत्व आल्यास चार लाखांची मदत मिळते. पिकांचे नुकसान झाल्यासही त्वरित मदत दिली जाऊ लागली आहे. त्यामुळेही प्राण्यांच्या हत्या कमी होऊ लागल्या आहेत. वन विभागाच्या क्षेत्रात मांसभक्षीबरोबरच तृणभक्षी प्राण्यांत चांगली वाढ होऊ लागली आहे. नागरिकांनी या प्राण्यांना आपले मित्र म्हणून वागणूक द्यावी. त्यांचे संरक्षण करावे, असे आवाहन जिल्हा वन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.