शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

बारावी निकालात वाढत्या टक्क्यांचा फुगा फुटला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 23:36 IST

गेल्यावर्षापर्यंत दहावी-बारावी परीक्षांच्या विक्रमी टक्क्यांसह लागत असलेल्या निकालाच्या परंपरेला यंदा ‘ब्रेक’ लागला आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षा पध्दतीत केलेला बदल व त्याचे पुरेसे आकलन विद्यार्थ्यांना झाले नसल्याने निकालाचा टक्का घसरला आहे.

ठळक मुद्देनिकालात सरासरी दहा टक्के घट : बदलत्या परीक्षा पध्दतीचा परिणाम

- शरद जाधव ।सांगली : गेल्यावर्षापर्यंत दहावी-बारावी परीक्षांच्या विक्रमी टक्क्यांसह लागत असलेल्या निकालाच्या परंपरेला यंदा ‘ब्रेक’ लागला आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षा पध्दतीत केलेला बदल व त्याचे पुरेसे आकलन विद्यार्थ्यांना झाले नसल्याने निकालाचा टक्का घसरला आहे. शिवाय विद्यार्थ्यांचे परीक्षेपेक्षा जेईई मेन्स, नीटकडे लक्ष असल्यानेही निकालावर परिणाम झाला आहे.

गेल्या काही वर्षांपासून दहावी, बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना भरभरून मिळणाऱ्या टक्केवारीची चर्चा होत असे. यंदा मात्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कृतिपत्रिका आधारित मूल्यमापन पध्दतीची अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे विज्ञान शाखेसह भाषा विषयांच्या प्रश्नपत्रिकांचे स्वरूप बदलले आहे. बदललेल्या या पध्दतीचे पुरेसे आकलन विद्यार्थ्यांना झाले नसल्याचे दिसून येत आहे.त्यातच विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचाही परिणाम जाणवत आहे. विज्ञान शाखेचे विद्यार्थी फिजिक्स-केमिस्ट्री-मॅथ्स् व फिजिक्स-केमिस्ट्री-बायॉलॉजी या ग्रूपिंगपुरता अभ्यास करून जास्तीत-जास्त वेळ नीट व जेईई मेन्सच्या तयारीकडे लक्ष देत आहेत. प्रश्नपत्रिकेचे बदललेले स्वरूप, काठिण्य पातळीतील वाढ झाली असताना, त्याकडे लक्ष देण्याऐवजी विद्यार्थ्यांनी इतर परीक्षांना प्राधान्य दिल्यानेच निकालात घसरण झाली आहे.

राज्य मंडळाने बदललेल्या प्रश्नपत्रिकांचे स्वरूप विद्यार्थ्यांसाठी आव्हानात्मक ठरत असल्याचेही चित्र आहे. नवीन पध्दतीत वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी प्रश्न कमी करण्यात आले आहेत. विज्ञान शाखेत तीन तासात २९ प्रश्न सोडवावे लागत होते. जे पूर्वीच्या पध्दतीत पेपर एक व पेपर दोन असे विभागले होते. याचा परिणाम होऊन ९० टक्क्यावर गुण मिळविणाºया विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. कला व वाणिज्य शाखांच्या गुणांवर याचा तितकासा परिणाम झालेला नाही.बदलत्या ‘ट्रेंड’मुळेच : निकाल घसरलाविद्यार्थ्यांनी आलेल्या नवीन परीक्षा पध्दतीचे पुरेसे आकलन न करता, ‘नीट’ व जेईई मेन अ‍ॅडव्हान्सच्या तयारीकडे अधिक लक्ष दिल्यानेही परिणाम झाला आहे. दोन्ही परीक्षांसाठी एनसीईआरटीच्याच पाठ्यपुस्तकांचा वापर वाढत आहे. त्यामुळे राज्य मंडळाच्या पाठ्यपुस्तकांचा अभ्यास विद्यार्थ्यांकडून झाला नाही. गेल्या काही वर्षांत केवळ ग्रूपिंगसाठी बारावी परीक्षा द्यायची व बहुतांशवेळा वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेशासाठी एनसीईआरटी अभ्यासक्रमाचा अभ्यास करण्याचा ‘ट्रेंड’ विद्यार्थ्यांत आल्यामुळेही निकाल घसरला आहे. 

दहावीच्या निकालावर होणार परिणामबारावीच्या निकालावर सरासरी दहा टक्क्याचा परिणाम झाला असल्याने आता दहावीच्या निकालाकडेही लक्ष लागले आहे. दहावीसाठी तोंडी परीक्षा बंद झाल्याने इंग्रजीच्या निकालावर परिणाम जाणवणार आहे.‘सीबीएसई’शी स्पर्धा

सीबीएसई, आयसीएसई व इतर बोर्डाचा टक्का वेगाने वाढत आहे. त्यामुळे बारावीच्या गुणांवर प्रवेश मिळणाºया अभ्यासक्रमांसाठी राज्य परीक्षा मंडळाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना मोठी स्पर्धा सहन करावी लागणार आहे. त्यात टक्केवारी घसरल्याने अडचणी वाढल्या आहेत.

 

घसरलेल्या निकालाला बदलती परीक्षा पध्दत हे एकच कारण नाही. पहिल्यांदाच कृतिपत्रिकांचा वापर केला. बुध्दिमत्तेला, कल्पनाशक्तीला, गुणवत्तेला वाव देण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यात त्याचे महत्त्व लक्षात येईल.- महेश चोथे, शिक्षणाधिकारी.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालSangliसांगली