शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बारावी निकालात वाढत्या टक्क्यांचा फुगा फुटला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 23:36 IST

गेल्यावर्षापर्यंत दहावी-बारावी परीक्षांच्या विक्रमी टक्क्यांसह लागत असलेल्या निकालाच्या परंपरेला यंदा ‘ब्रेक’ लागला आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षा पध्दतीत केलेला बदल व त्याचे पुरेसे आकलन विद्यार्थ्यांना झाले नसल्याने निकालाचा टक्का घसरला आहे.

ठळक मुद्देनिकालात सरासरी दहा टक्के घट : बदलत्या परीक्षा पध्दतीचा परिणाम

- शरद जाधव ।सांगली : गेल्यावर्षापर्यंत दहावी-बारावी परीक्षांच्या विक्रमी टक्क्यांसह लागत असलेल्या निकालाच्या परंपरेला यंदा ‘ब्रेक’ लागला आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षा पध्दतीत केलेला बदल व त्याचे पुरेसे आकलन विद्यार्थ्यांना झाले नसल्याने निकालाचा टक्का घसरला आहे. शिवाय विद्यार्थ्यांचे परीक्षेपेक्षा जेईई मेन्स, नीटकडे लक्ष असल्यानेही निकालावर परिणाम झाला आहे.

गेल्या काही वर्षांपासून दहावी, बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना भरभरून मिळणाऱ्या टक्केवारीची चर्चा होत असे. यंदा मात्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कृतिपत्रिका आधारित मूल्यमापन पध्दतीची अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे विज्ञान शाखेसह भाषा विषयांच्या प्रश्नपत्रिकांचे स्वरूप बदलले आहे. बदललेल्या या पध्दतीचे पुरेसे आकलन विद्यार्थ्यांना झाले नसल्याचे दिसून येत आहे.त्यातच विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचाही परिणाम जाणवत आहे. विज्ञान शाखेचे विद्यार्थी फिजिक्स-केमिस्ट्री-मॅथ्स् व फिजिक्स-केमिस्ट्री-बायॉलॉजी या ग्रूपिंगपुरता अभ्यास करून जास्तीत-जास्त वेळ नीट व जेईई मेन्सच्या तयारीकडे लक्ष देत आहेत. प्रश्नपत्रिकेचे बदललेले स्वरूप, काठिण्य पातळीतील वाढ झाली असताना, त्याकडे लक्ष देण्याऐवजी विद्यार्थ्यांनी इतर परीक्षांना प्राधान्य दिल्यानेच निकालात घसरण झाली आहे.

राज्य मंडळाने बदललेल्या प्रश्नपत्रिकांचे स्वरूप विद्यार्थ्यांसाठी आव्हानात्मक ठरत असल्याचेही चित्र आहे. नवीन पध्दतीत वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी प्रश्न कमी करण्यात आले आहेत. विज्ञान शाखेत तीन तासात २९ प्रश्न सोडवावे लागत होते. जे पूर्वीच्या पध्दतीत पेपर एक व पेपर दोन असे विभागले होते. याचा परिणाम होऊन ९० टक्क्यावर गुण मिळविणाºया विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. कला व वाणिज्य शाखांच्या गुणांवर याचा तितकासा परिणाम झालेला नाही.बदलत्या ‘ट्रेंड’मुळेच : निकाल घसरलाविद्यार्थ्यांनी आलेल्या नवीन परीक्षा पध्दतीचे पुरेसे आकलन न करता, ‘नीट’ व जेईई मेन अ‍ॅडव्हान्सच्या तयारीकडे अधिक लक्ष दिल्यानेही परिणाम झाला आहे. दोन्ही परीक्षांसाठी एनसीईआरटीच्याच पाठ्यपुस्तकांचा वापर वाढत आहे. त्यामुळे राज्य मंडळाच्या पाठ्यपुस्तकांचा अभ्यास विद्यार्थ्यांकडून झाला नाही. गेल्या काही वर्षांत केवळ ग्रूपिंगसाठी बारावी परीक्षा द्यायची व बहुतांशवेळा वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेशासाठी एनसीईआरटी अभ्यासक्रमाचा अभ्यास करण्याचा ‘ट्रेंड’ विद्यार्थ्यांत आल्यामुळेही निकाल घसरला आहे. 

दहावीच्या निकालावर होणार परिणामबारावीच्या निकालावर सरासरी दहा टक्क्याचा परिणाम झाला असल्याने आता दहावीच्या निकालाकडेही लक्ष लागले आहे. दहावीसाठी तोंडी परीक्षा बंद झाल्याने इंग्रजीच्या निकालावर परिणाम जाणवणार आहे.‘सीबीएसई’शी स्पर्धा

सीबीएसई, आयसीएसई व इतर बोर्डाचा टक्का वेगाने वाढत आहे. त्यामुळे बारावीच्या गुणांवर प्रवेश मिळणाºया अभ्यासक्रमांसाठी राज्य परीक्षा मंडळाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना मोठी स्पर्धा सहन करावी लागणार आहे. त्यात टक्केवारी घसरल्याने अडचणी वाढल्या आहेत.

 

घसरलेल्या निकालाला बदलती परीक्षा पध्दत हे एकच कारण नाही. पहिल्यांदाच कृतिपत्रिकांचा वापर केला. बुध्दिमत्तेला, कल्पनाशक्तीला, गुणवत्तेला वाव देण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यात त्याचे महत्त्व लक्षात येईल.- महेश चोथे, शिक्षणाधिकारी.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालSangliसांगली