जत तालुक्यात भूजल पातळीत ३.०७ मीटरची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:22 IST2021-01-02T04:22:42+5:302021-01-02T04:22:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क संख : जत तालुक्यात यावर्षी पाऊस दमदार पडल्याने ३.०७ मीटरने भूजल पातळीत वाढ झाली आहे. पाच ...

Ground water level in Jat taluka increased by 3.07 meters | जत तालुक्यात भूजल पातळीत ३.०७ मीटरची वाढ

जत तालुक्यात भूजल पातळीत ३.०७ मीटरची वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क

संख : जत तालुक्यात यावर्षी पाऊस दमदार पडल्याने ३.०७ मीटरने भूजल पातळीत वाढ झाली आहे. पाच वर्षांतील उच्चांकी पाणी पातळी आहे. तलाव, बंधारे तुडुंब भरले आहेत. रब्बी हंगामातील पिके, द्राक्षे, डाळिंब व उन्हाळी पिकांना लाभ होणार आहे. यावर्षी पाणीटंचाई जाणवणार नाही. असे चित्र आहे. उन्हाळ्यात द्राक्ष बागांची खरड छाटणीही वेळेवर होणार आहे. डाळिंब बागांचा बहर धरला जाणार आहे. याबाबत ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.

तालुक्यात पाच वर्षांपासून पाऊस कमी पडल्यामुळे पाण्याची पातळी ७०० ते ८०० फुटांपर्यंत खाली गेली आहे. पावसाअभावी रब्बी व खरीप हंगाम वाया गेला होती. पाण्याअभावी द्राक्षे, डाळिंब बागा काढून टाकल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाराची समस्या निर्माण झाली होती. जनावरांची संख्या कमी झाली होती.

पाऊस कमी असल्याने जिराईत व कोरडवाहू जमिनीचे क्षेत्र अधिक आहे. २००९ नंतर ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली. यावर्षी ७७८ मि.मी इतका पडला आहे. मुचंडी, शेगाव, संख, जत, कुंभारी, तिकोंडी या मंडल विभागात अतिवृष्टी तर उमदी, माडग्याळ मंडळात कमी पाऊस झाला आहे. तालुक्यातील संख मध्यम प्रकल्प व २५ तलाव, १२ कोल्हापूर बंधारा व सिमेंट बंधारे पूर्ण क्षमतेने तुडुंब भरले आहेत. बोर नदीवरील सर्व बंधारे भरले आहेत. यावर्षी पुरेशी ओल झाल्याने ६२ हजार ६२२ हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामातील पिकांची पेरणी झाली आहे. डाळिंबांचा हंगाम एप्रिल मे महिन्यात बहर धरला जाणार आहे. उन्हाळी हंगामातील कापूस, भुईमूग, सुर्यफूल, हायब्रीड ही पिके येणार आहेत.

शेतकरी जनावरांना उन्हाळ्यात शेतकरी व्हांडी, कडवळ, हत्ती गवत करणार असल्याने दुभत्या जनावरांना ओल्या चा-याची सोय होणार आहे.

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला

दरवर्षी उन्हाळ्यात टँकरने पाणी पुरवठा केला जातो. यावर्षी पाणी पातळी वाढल्याने टँकरची आवश्यकता भासणार आहे. शासनाचे लाखो रुपये वाचणार आहेत.

फोटो : ०१ संख १..२

ओळ : दरीबडची (ता. जत) येथील कोल्हापूर बंधारा व सिमेंट बंधारे पूर्ण क्षमतेने तुडूंब भरले आहेत.

Web Title: Ground water level in Jat taluka increased by 3.07 meters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.